Skip to main content

निळूभाऊ गेले!

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 13/07/2009 07:22 या दिवशी प्रकाशित केले.
nilu phule निळूभाऊ गेले! माझ्या अतिशय आवडत्या नटांपैकी एक! पण `पुढचं पाऊल', सिंहासन, पिंजरा, सामना, अशा अगदी मोजक्या चित्रपटांचा अपवाद वगळला, तर मराठी चित्रपटस्रुष्टीने त्यांना साच्यातच अडकवले. त्यामुळे त्यांच्यातल्या चतुरस्र अभिनेत्यावर अन्याय झाला. (अमरीश पुरींचेही हेच झाले!) त्यांचे नाटक कधी पाहण्याचा योग आला नाही.

विरंगुळा !!

लेखक अनिल हटेला यांनी सोमवार, 13/07/2009 01:52 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर्स !! चित्रपट हा साधारण सर्वाच्या विरंगुळ्याचं ,मनोरंजनाचं साधन आहे,(असावं) मग तो चित्रपट मराठी भाषेत असो अगर हींदी ! ईंग्रजी असो वा इतर कुठल्याही प्रादेशीक भाषेत.. आज काल तर अगदी जपानी,चीनीतसेच इतरही अनेक विदेशी भाषेतील चांगल्या कलाकॄती आपणास उपलब्ध आहेत. तर मंडळी चित्रपटाच्या नावांकडे कधी आपण लक्ष दिलय का?

प्रेमाची शिदोरी,प्रणयाचा मेवा

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 12/07/2009 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
आज बे-एरियात अत्युतम हवा पडली होती.७०-७२ डि.-म्हणजे २१-२२ डि.सेंटीग्रेड- तापमान भर दुपारच्या उन्हात वाटायचं. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत.
काव्यरस

गराज सेल- लेखिका मीनल गद्रे- चतुरंग पुरवणी लोकसत्ता

लेखक सुवर्णमयी यांनी रविवार, 12/07/2009 01:07 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.loksatta.com/daily/20090711/chchou.htm या दुव्यावर मीनल गद्रे यांचा 'गराजसेल 'यावरील लेख लोकसत्ताच्या 'चतुरंग' पुरवणीत वाचला. लेखाबद्दल मीनलचे अभिनंदन. लेखाखालील पत्ता पाहून मिपाकर मीनल या लेखिका असाव्यात असे वाटले. संपादकांनी मिपावर याची दखल इतरत्र घेतलेली असेल तर हा नोड तिथे जोडावा. हा लेखावर प्रतिसाद, चर्चा करता यावी म्हणून दुवा दिलेला आहे.

((जुळ्या चिंबोर्‍या))

लेखक ऋषिकेश यांनी शनिवार, 11/07/2009 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
सुनीलरावांचा जुळ्या चिंबोर्‍या हा धागा आणि नीधप यांची ही कविता ह्या वरून पुढील विडंबन स्फूरले. आधी प्रतिसादात दिले होते ते इथे (खास लोकाग्रहास्तव) स्वतंत्र धाग्यात देत आहे :) चल!

आठवणी पावसाळ्याच्या

लेखक विमुक्त यांनी शनिवार, 11/07/2009 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाळ्यात, रेवदंड्याच्या पावसाची आणि लहानपण ची खुप आठवण येते. रेवदंड्यात असताना, विहीरीत पोहण्याची, शाळा सुटल्या वर छत्री असुन सुद्धा भिजत घरी येण्याची, पोखरण कीती भरलीय हे रोज बघण्याची आणि पावसात भीजत समुद्रावर हुंदडायची जाम मजा होती. आमचं घर नारळा-पोफळीच्या वाडीत होत. वाडीत एक बय्रापैकी मोठ्ठी विहीर होती. पावसाळा सुरु झाला की रोज विहीरत डोकवुन ती कीती भरलीय हे मी बघायचो. पाऊस पडत असताना विहीरीतल्या पाण्याला एक वेगळाच रंग आलेला असायचा, गढुळ नाही पण एकदम गुढ असा रंग असायचा.

[रोजचीच गोष्ट.]

लेखक Nile यांनी शनिवार, 11/07/2009 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रः काय रे काय गोंधळ चाललाय आज जंगलात? मी: काय नाय रे कोणी तरी श्वापद परत आलंय म्हणे. मित्रः च्यायला! मग एवढी पळापळ कसली? जंगलात काय श्वापदं कमी आहेत काय? मी: मुर्ख आहेस! अरे निम्मे बुरखा पांघरलेले, काही नुसतेच खाजगीत गुरकावणारे. काही उगाच गरीब सश्यांवर वगैरे फोक उगारणारे, काही नुसत्याच जंगलनीतीच्या सभा घेणारे, काही नखांची धार गेलेले अन काही दात पडलेले. मग आता फुकटात काही लचके तोडायला मिळताहेत तर कोण सोडील? मित्रः काय कळलं नाय राव! मी: कीती दिवस झाले तुला जंगलात येउन? तु फक्त तमाशा बघायचा अन हा ला हा जोडायचा, काय समजलास? मित्र: अरे पण साला कोणाला हा जोडायचा हे कसे कळणार?

(( आजचीच गोष्ट ))

लेखक दशानन यांनी शनिवार, 11/07/2009 13:33 या दिवशी प्रकाशित केले.
आजचीच गोष्ट. दोन दोन पेग झालेले. आतल्या बातम्या बाहेर निघण्याची वेळ. मित्रः तो परत आला आहे, नाव बदलून आला आहे म्हणे. मी: मग काय प्रॉब्लेम आहे ? मित्रः तु असे कधी केले आहेस का ? तेथे तर पळापळ होत आहे सर्वत्र. मी: तुझ्या बाने कधी केले होते का ? लोकांना काय झाले पळायला ? अमेरिकेतुन काय हिममानव आला कि काय ? मित्रः ते जाऊ दे. पण हे आपल्याला कसे जमायचे ? मी पण असे करु काय ? जरा गम्मंत- जम्मत, काय म्हणातोस. मी: भाड्या, न जमायला काय झाले ? आणी तो काय तुझी परवानगी घेऊन येईल का ? . आता आला तो आला परत दंगा घालेले येथे. मित्रः चार वर्षात तुझीही वेळ येईलच. मी त्याचे परत येण्याचे मनावर घेतले आहे आता.