Skip to main content

तिने केली एक कविता

लेखक दत्ता काळे यांनी शनिवार, 01/08/2009 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
तिने एक कविता केली अन् विचारले "कशी वाटली"? मी म्हणालो "नदी, झरे, चांदण्यांची पान भरुन दाटी झाली" कविता कशी हवी वास्तवदर्शी अन् आरस्पानी काळजाला भिडणारी मनाला जरा पिडणारी विचार करायला लावणारी अन् काळाबरोबर धावणारी (म्हणजे नको नॉस्टेलजिक ) ती म्हणाली " अरे ,आपण वास्तवतर जगतोच आहोत मग कविता हवी कशाला तू वास्तवाच्या ऐदीसाठी स्वप्ने घेतोसच कि उश्याला. कवितासुध्दा एक स्वप्न - मुक्त विचारांना पडलेलं त्यामध्ये मग काहिही येईल पानं, फुलं, टोपड, झबलं कवितेतलं वास्तव म्हणजे नक्की रे असतं काय ? -वास्तवतेच्या भावनांना कल्पनेचेच ना असतात पाय ? नको कविता नॉस्टेलजिक नको आठवणींचे रान पण, प्

खरवस

लेखक मितालि यांनी शनिवार, 01/08/2009 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
गाय/ म्हैशीच्या चीकापासुन ख्ररे तर हा खरवस बनवला जातो. पण हा त्याला पर्यायी म्हणा किंवा त्यासारखा पदार्थ.. कोकणी पद्धतीची पाककृती देत आहे. पाव लीटर साध्या थंड दुधात एक अंडं फेटुन घाला. १/२ चमचा जीरे , १/२ वाटी ओले खोबरे रवाळ वाटुन घ्या. थोडा गुळ किसुन घ्या. हे सगळ दुधात नीट मिसळुन घ्या. गुळाचे खडे रहाता नये, चवीला अतिगोड असता नये. हे मिश्रण कुकर मधे / ढोकळ्या प्रमाणे वाफवुन घ्या.

ध्येय!

लेखक राघव यांनी शनिवार, 01/08/2009 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाकडे बघतांना मनांत आलेले विचार मांडण्याचा हा प्रयत्न. :) आषाढ-श्रावणाची ती गाज सांगते मज, भूमीत वेदनेच्या पेरीत सुख निघावे! अस्तित्व आज माझे उरले कुठे जराही.. मृद्गंध होऊनी मी सर्वां-उरी भिनावे! कोमेजण्यात मजला कसलेच दु:ख नाही..(पण) कुंजातल्या फुलासम बहरून नित्य यावे! प्रत्येक दिस नसावा मृत्यूस याचणारा.. क्षणैक मेघनेसम दिपवून सर्व जावे! कित्येक जन्म सरले काट्यांत रोधलेले..(पण आता) आभाळ न्हायलेली धरती मला खुणावे!! राघव
काव्यरस

तिखट साबुदाणा खिचडी

लेखक मितालि यांनी शनिवार, 01/08/2009 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
खिचडी साठी नेहमी प्रमाणे साबुदाणे भिजवुन घ्या. त्यात दाण्याचे कुट, मीठ मिसळा. तेलावर जीरे, मोहरी, कढीपत्ता घालुन फोडणी करुन घ्या. त्यात मिरचीपुड घाला आणी लगेचच फोडणी करपु न देता साबुदाण्याचे मिश्रण घाला. नीट परतुन शिजवुन घ्या. थोडी साखर घालुन परता. कोथिंबीर व खोबेरे घालुन व लिंबु पिळुन गरमा गरम खिचडी चा आस्वाद घ्या. (ही खिचडी उपवासाल चालेल का याची कल्पना नाही..

कोथिंबीर वडी

लेखक मितालि यांनी शनिवार, 01/08/2009 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
पालेभाजी कोथिंबीर चार चार रुपये ... भाजीवाला अगदी उत्साहात ओरडु लागणे हे ही पावसाळ्याचे एक लक्षण...पावसाळा आला की पालेभाज्या छान मिळतात. त्यातही खास म्हणजे कोथिंबीर. एरवी ७-८ रुपयाना एवढीशी मिळणारी कोथिंबीरीची जुडी पावसात कशी छान जाडजुड होऊन येते. हिरवीगार आणि स्वस्त मिळालेल्या कोथिंबीरीची मोठी जुडी घरी आणली जाते. आणि बेत बनतो कोथिंबीर वडीचा.. मग ती कोथिंबीर एक तास बसुन साफ करता करता आपण कशी एवढ्या ढिगातुन एकदम छान आणि न फुललेली जुडी आणली या बद्द्ल चर्चा करणे आलेच...

चहाची पाने आणि वाफप्रक्रीया

लेखक अजय भागवत यांनी शनिवार, 01/08/2009 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
चहाच्या पानापासुन चहा पावडर करेपर्यंत ज्या अनेक क्रिया-रीतींतुन चहाचे पान जाते त्यावर एक ग्रंथ लिहीता येईल. ह्या रीतींमुळेच चहाचे अगणित प्रकार, चवी, वास, रंग, तयार झाले. ह्या सर्व उत्पादन पद्धती अर्थातच एकदम विकसित झाल्या नाहीत व अनेक डोकेबाज माणसांनी त्यात अनेक आवश्यक बदल घडवून आणले आहेत. अशीच एक छोटीशी गोष्ट. पुर्वी तोडून वाळवलेल्या चहाच्या पानांवर वाफेचा फवारा मारला जाई. वाफेतील उष्णते व आर्द्रतेमुळे, सुरुवातीची अतिशय कडक झालेली चहांची पाने मऊ होऊन त्यात ऑक्सिडेशनची प्रक्रिया सुरु होई. ह्यानंतर पुन्हा ऑक्सिडेशनची प्रक्रिया ठराविक काळानंतर थांबवण्यासाठी ती पाने वाळवली जाई.

तुमच्या मनांत आहे ते माझ्या हातात(ईडंबनात) नाही.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 31/07/2009 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या त्या (अजून आणखी एक ईडंबन केलं आहे.) मधल्या "पुष्टावलेल्या ऊसाच्या" विडंबनाचा जन्म असा झाला.

(गलका!)

लेखक केशवसुमार यांनी शुक्रवार, 31/07/2009 19:53 या दिवशी प्रकाशित केले.

आमची प्रेरणा प्रदीप कुलकर्णी यांची अप्रतिम गझल गलका!

(गलका!)

धक्का बसला तिला जरासा, मला लागला झटका!
सॉरी म्हणता... कानाखाली तिने लावला फटका!

सजावटींच्या दिव्यांत बसतो शांत चाखतो मदिरा...
जरी चघळतो 'मावा', 'पोलो' तिला जाणवे भपका!

उगीच का डोळ्यांत अचानक माझ्या आले पाणी?
नाव घेतले माझे तू अन, मला लागला ठसका!

असा आज का, लंगडतो मी काय तुम्हाला सांगू?
तिच्या घरातिल कुत्र्याचा मी पार घेतला धसका!

झोप हवीशी सुट्टीची... पण सासू ही तडमडते...
जागे होणे भाग अता मज, अन सुट्टीचा पचका!

विवाह परिषदे निमित्त निबंध स्पर्धा

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शुक्रवार, 31/07/2009 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
विवाह परिषदेनिमित्त राज्यस्तरीय निबंधस्पर्धा
" मिळून सा-याजणी" मासिक आणि विमेन्स नेटवर्क संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जानेवारी २०१० मध्ये सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त विवाह परिषदेचे आयोजन केले जाणार आहे.त्याची सुरवात राज्यस्तरीय निबंधस्पर्धेपासुन करीत आहोत. निबंधस्पर्धेचे विषय १) विवाहांतर्गत आनंदी सहजीवनाच्या वाटा २) विवाहप्रथा आणि स्त्री-पुरुष समता ३) विवाहबंधन गरज कि सक्ती ४) विवाहपुर्व शरीरसंबंधांचा अनुभव- सफल वैवाहिक जीवनाकरिता की निव्वळ अनैतिक ५) आंतरजातीय विवाह जातींचा मेळ कि झळ ६) विवाह असुनही एकाकी ७) एक प

जिद्द - मराठी माणसांची

लेखक प्रसन्न केसकर यांनी शुक्रवार, 31/07/2009 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
* मराठी माणुस सहसा स्थितिप्रिय असतो, त्याला धोके घ्यायला आवडत नाही. * छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक मराठी माणसाचे श्रद्धास्थान, स्फूर्तीस्थान असते पण प्रत्येक मराठी मानुस शिवाजी जन्माला यावा पण तो दुसर्‍याच्या घरात असा विचार करतो. * मराठी माणसाकडे धन नसल्यामुळे त्याच्या कतॄत्वाची परिसीमा म्हणजे सरकारी नोकरीत उच्चपद मिळवणे किंवा काबाडकष्ट करुन नावापुढे शेट, अण्णा, सिंग, भैय्या इत्यादी प्रत्यय लावणार्‍यांचे व्यवसाय उर्जितावस्थेत आणुन स्वतःची कमाई शक्य तेव्हढी वाढवणे. * एकुणच स्वतःचा व्यवसाय करणे हे मराठी माणसाचे काम नोहे. असे अनेक समज मराठी लोकांबाबत मराठी लोकांमधे तसेच इतरांमधे