पावसाळी छायाचित्रण....
पावसाळा सुरु झाला की आमच्यासारखे भटके थोडेच गप्प बसतात???? या पावसाळ्यात निसर्गाची काही रुपं मी माझ्या कॅमेर्यात बंदिस्त केली आहेत. आपण आस्वाद घ्याल आणि प्रतिक्रिया द्याल तर आनंद...
एक नवे गीत हवे आहे...
नुकतंच आकाशवाणीवर " हरि हा माझा प्राण विसावा" हे एक सुंदर गी त ऐकण्यात आलं..... हे गीत mp3 मध्ये कुणाकडे मिळेल का???
वाघोबा :)
हा आहे कात्रजच्या प्राणीसंग्रहालयातील वाघ.
एक पांढरा आणि एक पिवळा पट्टेरी.
जरी तो बंद कुंपणा आड असला तरी त्याचा रुबाब कमी नाहि होत.
काय म्हणता खालील फोटु बघुन. :)
एखादा माणुस मंतर मारल्यासारखा गुंग होतो म्हणजे काय होतो ह्याचा अनुभव ह्या कुंपणा आडच्या वाघाने दिला बॉ.
आता ओढ आहे ती असाच वाघ जंगलात बघायची ह्याचीच.
पहिल्यांदा हा पाहिला पांढरा वाघ. एकदम रुबाबात बसला होता. त्याचे डोळे पाहिले का?? वेगळेच आहेत.
एक उसासा.....
ओरिजिनल विडम्बन :
पुष्टावलेला तो उंच ऊस
मला म्हणतो आता नको खाऊस
ओली चिंब झाली झाडे
कपडे ही ओले चिंब झाले
तुझं ते हळुवार खेचणं
माझ्य़ावर टिचकी मारून ऐकणं
आणि हळुच चीर काढणं
आणि माझा रस थेंब थेंब पडणं
नेहमीच हात चिकट चिकट होणं
प्रत्येक उसाला टक लावून बघतोस
आणि एकाला ऊचकतोस
तुझं उचकणं आणि आमचं पडणं
झालय आता संवयीचं शेताला
कधी कळणार रे मुळासकट खाऊं नये उसाला?
अजुन एक विडंबन
कोसळणारा तो धुंद पाऊस,
मनात आली दारु पिण्याची हाउस,
म्हणतेस तु एकटा नको जाऊस,
मला घेउन जा भाव नको खाउस
तुझ ते हळुवार ऑर्डर देण
आणि नंतर बिलाकडे टक लावुन बघण
आणि हळुच इशारा करण
आणि माझ रागाने लालबुंद होण
झालय नेहमीचच गाह्राण
नेहमीच असे करतेस
पी-पी पितेस
आणि मलाच बिल द्यायला लावतेस
झालय आता नेहमीचच मला
परत कधीच नाय नेणार तुला
कधी कळणार तुला ,
एकदा तरी बिल द्याव मला ?
काव्यरस
अर्थ/अनर्थ
काही म्हणी अथवा वाक्प्रचारांमधले वापरल्या जात असणार्या शब्दांबद्दल मला फार दिवसांपासुन प्रश्न पडलेले होते.विजुभाऊंच्या धाग्यापासुन प्रेरणा घेवुन हे प्रश्न विचारत आहेत.
(कृपया त्या धाग्याचे हे विडंबन आहे असे कोणी समजु नये.)
१.हातावर तुरी देवुन निसटणे ह्या वाक्र्पचारातील तुरीचे प्रयोजन काय?
२.तोंडात मूग गिळुन गप्प बसणे... मूगाचा आणि गप्प बसण्याचा संबंध काय?
३.कानामागुन आली आणि तिखट झाली... कोण कानामागुन आले आणि तिखट झाले.?.
४.दत्त म्हणुन हजर होणे ... ह्यामागे काय कथा आहे?
५.लंकेची पार्वती..
उसाश्यांचे भान
तरवारीना मिळते कवितेचे म्यान
जीवघेणी तान होते कट्यारीचे पान
हरपते सारेच ऐकूनी देहभान
हवे कशास मग उसाश्यांचे भान...
तू सभोताली नीळाई होउनी
येतेस सारे आकाश झाकुनी
ऐन पावसात इंद्रधनु घेउनी
हवे कशास मग उसाश्यांचे भान
होवोनी चंद्र मन धुंद होत जाते
पायीचे नाद ताल संगीत होते
काय सय जीव घेऊनी जाते
हवे कशास मग उसाश्यांचे भान
कायांची होती वीणा...गीत अप्सरा गाते
काय चमत्कार होतो..शब्द मूका करते
भाषेवीण संवाद.....मन हिरवे रान होते
हवे कशास मग उसाश्याचे भान
तु येतेस होवोनी रानीचे पान
पावसाळी शहारा.
पाण्यात शिजवलेले अंडे
अंडयाचा एक सोपा आणि पौष्टिक प्रकार.
साहित्य -
अंडे
पाणी
विनेगर
मीठ-मिरी (चवीप्रमाणे)
कृती -
१) पाणी उकळत ठेवावे
२) त्यात थोडे विनेगर घालावे
३) पाण्याला उकळी आली की त्यात अंडे फोडून घालावे आणि आच मंद करावी
४) अंड्याचा पांढरा भाग घट्ट झाला (सुमारे २ मिनिटे) की आचेवरून काढावे
५) पाणी गाळून टाकावे
६) शिजलेल्या अंड्यावर मीठ-मिरी भुरभुरावी
टीप - सध्या श्रावण सुरू असल्यामुळे मला फोटो टाकता येणार नाही, याची नोंद घ्यावी.
मिसळपाव