Skip to main content

पृथ्वी फिरायची थांबली तर ...

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी सोमवार, 19/04/2010 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
समजा पृथ्वी फिरायची थांबली तर ... समजा पृथ्वी ४ वाजता एकदमच थांबली ...तर तुमच्याइथे कायम ४ च वाजलेले असणार . मग तुम्हाला अशी कोणती वेळ आवडेल - जी आयुष्यभर तुमची साथ करेल ? अन का ? कोणाला पहाटेची वेळ आवडेल , कोणाला सूर्यास्त ... तुमची आवड काय ? बाकी पृथ्वी थांबल्यामुळे वातावरणावर होणारे परिणाम , त्याचा कुंडल्यावर होणारा परिणाम, नाड्यावर होणारा परिणाम यासाठी आपण स्वतंत्र धागा काढू ...

अरे ! अरे s s s रे ! ! !

लेखक निरन्जन वहालेकर यांनी सोमवार, 19/04/2010 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
अरे ! अरे s s s रे ! ! ! जन्मलो तेव्हांच मृत्यो अरे ! भेट अपुली ठरली असे. यौवानांत मी, अन अचानक, आज तू द्वारी वसे. अधिरता तुज, काय वेडी मिलनाची आपल्या. लोक म्हणतील हाय हाय, मिलनासी आपल्या. . गेले आज विपरीत समयी, खंत ह्याची इतुकी नसे. गेले तुजसवे मी यौवनी शोक याचा सकलां असे. निरंजन वहाळेकर

प्रेमभंग ???? छे छे हे काही औरच......

लेखक सांजसखी यांनी सोमवार, 19/04/2010 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेमभंग हा शब्द कोणत्या शहाण्या माणसाने (गाढवाने) शोधला कोण जाणे???? जर प्रेम करणारे दोघंही खरे असतील तर त्यांचे प्रेम एवढेही दुबळे नसावे की त्याचा भंग व्हावा ??? हां....त्यांचे लग्न होणार नाही कदाचित???? आपल्या समाजात काही संदर्भ परस्परांना उगाचचं जोडलेले असतात... जसे दोन प्रेम करणा-यांचे लग्न झाले तरचं त्यांचे प्रेम यशस्वी झाले..... तरच ते खरे होते.... पण काही अडचणींंमुळे नाही होऊ शकले तर फार मोठे नुकसान वगैरे....

"विस्कटलेल्या विचारांचा गुंता"

लेखक सांजसखी यांनी सोमवार, 19/04/2010 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
वेळ साधारण रात्री ७.३० वाजताची.... तिन्ही सांजेची.... लाईट गेली त्यामुळे डोक्यावर गरागरा फिरणारे पंखॆ अचानक बंद झाले.... म्हणून जीवाची काहिली थंड करण्यासाठी शांत निवांत अंगणात पहुडले... इतक्यात लक्ष्य आकाशात शांतपणे हसणा-या चंद्रकोरे कडे गेले.... नाजूक.. विवर्धमान... तेजस्वी... हसरी..सोबतच्या चांदण्याबरोबर सुखात हितगुज करणारी....चंद्रकोर माझ्याकडे मिस्किलपणे हसत असल्यासारखी वाटली... ती म्हणाली, " काय गं ?? अशी का तू अस्वस्थ??? माझ्याकडे पाहून आनंद नाही का होत तुला??" मला काय ऊत्तरावे हेच कळेना!!!!

शिर्षकांच्या आयचा घो(ळ)!

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 19/04/2010 09:57 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल मराठी, हिंदी चित्रपटांची शिर्षके ही तीन नावांची बनलेली असतात. तशी फॅशनच आली आहे. उदा: मी, मन आणि ध्रुव; लव, * और धोका; हम, तुम और घोस्ट; मै, मेरी पत्नी और वो! मग जरा माझ्यासारख्या व्यंगचित्रकाराच्या तिरसट चष्म्यातून (किंवा डोळ्यातून म्हणा) मला अशीच त्रिनावी शिर्षके अजून सुचू लागलीत आणि चष्म्यातून थेट उतरली मिसळपाव च्या ताटात... ती, तो आणि हो!

सा S S प!!!

लेखक मीनल यांनी सोमवार, 19/04/2010 08:12 या दिवशी प्रकाशित केले.
होळी विशेषांक -हास्यगाऽऽरवा यात मी लिहिलेल्या अजगर या लेखात `जर-तर` ची गोष्ट होती. कल्पनाविलास करून हसवण्याचा प्रयत्न केला होता. पण आताचे लेखन हे प्रत्यक्ष घेतलेला अनुभव आहे. --- इथे अमेरिकेत स्प्रिंग सिझन सुरू झाल्यावर निसर्गातील चैतन्य जणू आमच्यातही उफाळून आले. आमची बागही हरवीगार करण्याची इच्छा झाली. मागच्याच आठवड्यात नर्सरीत जाऊन छान फुलांची २ मोठी झाडे आणली. टोमॅटो, बारीक मिरची आणि काकडीची इवली इवली रोपे आणली. त्यासाठी ज्यात रोगप्रतिकारक औषधे, फर्टीलाझर्स आहेत अशी महागाईची माती आणली.

कथा: सत्संग गुंतवणूक

लेखक वसंत वडाळकर_मालेगांव यांनी सोमवार, 19/04/2010 07:23 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळचे ५:३० झाले होते. महाराज अद्याप आले नव्हते. सत्संगी बाबांची वाट बघत होते. तोच रोल्स-राईस मधून बाबांचे आगमन झाले. सर्व सत्संगी उठून उभे राहिलेत. महाराज आसनस्थ झाले. महाराजांनी हाताने खुणावून सर्वांना बसावयास सांगीतले. सत्संग सुरू होण्यापूर्वी नामस्मरण करण्यात आले. श्रीराम जय राम जयजय राम! सर्व सत्संगी नामस्मरणात एकरूप झाले. त्यानंतर सत्संग सुरु झाला. महाराज सांगू लागले- "ह्या अनंत कोटी ब्रम्हांडात एका चैतन्याव्यतिरिक्त काही नाही. चैतन्य हेच आपले स्वरुप आहे. चैतन्य स्वरुप आपल्या मध्येच आहे. त्यामुळेच आपले चलन वलन चालू राहाते. शरिरात चैतन्य नसेल तर शरीर जड बनते.

कॉफी शॉप सेशन

लेखक अरुंधती यांनी रविवार, 18/04/2010 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
''रेखे, पोचलीस का गं कॉफी शॉपमधे?'' सुमाचा आवाज ऐकून रेखाने आपला मोबाईल स्पीकर मोडवर ऑन केला. ''तुला काय वाटतंय? तूच ऐक आता... '' रेखाचे वाक्य संपते न संपते तोच मधू व साक्षी दोघींनीही ''सुमे, कुठं अडकली आहेस? अगं कित्ती उशीर लावशील? पोटात कावळे कोकलताहेत, लवकर ये... फाजीलपणा करू नको फार!!! '' अशा आवाजात एकच गजर केला. हसत हसतच कॉल संपवून त्यांनी रेखाकडे पाहिले. रेखा हसत होती खरी, पण त्यात नेहमीचा मोकळेपणा नव्हता. जणू सुमा यायचीच वाट की रेखाच्या मनात कोंडलेली वाफ बाहेर पडायच्या तयारीत होती. सुमा, रेखा, मधू व साक्षी कॉलेजपासूनच्या मैत्रिणी!

निवेदन...

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 18/04/2010 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर मायबापहो, गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक कारणाने मी मिपापासुन दूर आहे. माझ्याही आयुष्यात बर्‍याच त्रासदायक गोष्टी घडल्या/ घडत आहेत. येणारे काही दिवस मी या गोष्टींतच व्यस्त असेन असे वाटते. या आणी अश्याच अजून काही कारणांमुळे मला मिसळपावच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडणे शक्य होणार नाही असे दिसते. दिवसेंदिवस येणारे नवनवीन लेखकांचे तसेच प्रस्थापितांचे लेखन मिपाला समृद्ध करत आहे हे पाहून अत्यंत आनंद होत आहे. आपण सर्वजण मिपाला असेच समृद्ध करत राहाल अशी आशा करतो. यापुढे माझ्याऐवजी नीलकांत सर्व व्यवस्थापन पाहील असे मी येथे जाहीर करत आहे.

"अक्सुमो..!!"(भारतीय रवा पिझ्झा...)

लेखक डावखुरा यांनी रविवार, 18/04/2010 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १)कांदा,टमाटे,कोथिंबिर... कांदा,टमाटे,कोथिंबिर २)बारीक शेव (पिवळी),टमाटा सॉस,पिझ्झा चटणी... बारीक शेव (पिवळी),टमाटा सॉस,पिझ्झा चटणी ३)पिझ्झा तयार करण्याची पुर्वतयारी: अ]पिझ्झा चटणी: दोन कांदे,५-६ पाकळ्या लसुण,१ टेबल स्पून लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ..