Skip to main content

जन्माला येणारा प्रत्येक मनुष्य हा हिंदू असतो

लेखक आवशीचो घोव् यांनी रविवार, 16/05/2010 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाच्या सर्व सभासदांना सप्रेम नमस्कार! मित्राबरोबर बोलता बोलता अचानक विषय निघाला असता त्याने एक असे विधान केले की, "जन्माला येणारा प्रत्येक मनुष्य हा हिंदू असतो." मी विचारले कसं काय? तर तो म्हणाला हिंदू सोडून सर्व धर्मियांवर जन्म झाल्याबरोबर धर्मांतराचे संस्कार होतात. मुसलमान - सुंता ख्रिश्चन - बाप्तिस्मा शिख - अमृत झोराष्ट्रियन - नवजोत जैन - उपदेसम इत्यादी पण हिंदूंवर कोणताही "धर्मांतराचा" संस्कार केला जात नाही. हे विधान कितपत सत्याच्या कसोटीवर उतरणारे आहे याबद्दल मज पामराला काही कल्पना नाही.

आपण अन्न खातो तसेच बनतो का?

लेखक शिल्पा ब यांनी रविवार, 16/05/2010 02:45 या दिवशी प्रकाशित केले.
मी लहानपणी असे ऐकले होते कि आपण जसे अन्न खातो तसे बनतो...म्हणजे सकस अन्न खाल्ले कि सात्विक आणि निकृष्ट उदा..पिझ्झा, खूप तेलकट, रोज शिळे अन्न वगैरे खाल्ले कि निकृष्ट विचार येतात...हे खरे कि नाही माहित नाही...पण कालच आलेला एक अनुभव सांगते...बाळीच्या शाळेत पार्टी होती आणि लहान मुलांचे नाच गाणे झाल्यावर जेवायला म्हणून breadstick सारखा, greasy आणि थंड पिझ्झा होता...आधीच आणल्यामुळे थंड होणारच...पण पिझ्झ्याचा दर्जा काही चांगला नव्हता....आता फक्त $१० मध्ये तिघांचे खाणे म्हंटल्यावर आणि पैसा वसूल करायला मी चांगल्या ६-७ slice खाल्ल्या... दुसर्या दिवशी मला खूपच depressing वाटायला लागले...सकाळचं सगळं उ

मुले आणि खर्च

लेखक शिल्पा ब यांनी रविवार, 16/05/2010 01:44 या दिवशी प्रकाशित केले.
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=67938:… हा आजचा लेख वाचला आणि शेवटचे सुधा मूर्तीचे वाक्याने विचार करायला लावले...घरात पुष्कळ नाही तरी बऱ्यापैकी पैसा असताना मुलांना चैनीची सवय कशी लागू देऊ नये...हे करत असतानाच त्यांना प्रत्येक गोष्टीला "नाही " सुद्धा म्हणायचे नाही हे कसे शक्य करावे? कारण मागितलेल्या सगळ्या....

वाढदिवस

लेखक sur_nair यांनी रविवार, 16/05/2010 01:28 या दिवशी प्रकाशित केले.
वाढदिवस अलीकडे ते एकमेकांचा वाढदिवस साजरा करत नाहीत एकमेकांना छोटासा पुष्पगुच्छ साधसं भेटकार्डही देत नाहीत इतर कुठल्याही दिवसासारखी ती तारीख येते, निघून जाते मित्र मैत्रिणींच्या शुभेच्छामध्ये हरवतात दोघे एकमेकांचे 'वय वजन वाढते त्यात साजरं काय करायचं' ती म्हणते डिनर व केक, सुंदरशी भेट त्याची सर्व इच्छाच मरते कधी तोही असतो हिरमुसलेला तिच्यावर कशास्तव चिडलेला त्याचा आवडीचा पदार्थ करायचा मग तिचाही बेत रद्ध झालेला यावेळेस तो विचार करतोय निदान प्रयत्न तरी करायचा डिनर नको तर चौपाटीव
काव्यरस

अलिपूर/माणिकतोळा अभियोग पर्व (मे १९०८-मे १९०९)

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 16/05/2010 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
जुलुमी परकिय सत्तेचे अत्याचार व अन्याय जेव्हा जनतेच्या सहनशक्तिची सीमा ओलांडतात तेव्हा असंतोषाचा भडका उडतो आणि क्रांतीच्या ज्वाला धगधगतात. १९०५ साली बांगालची फाळणी झाली. या फाळणीच्या विरोधात सारा बंगाल पेटला. आणि अर्थातच विरोध दडपून टाकण्यासाठी ईंग्रजांनी जनतेवर अमानुष अत्याचार सुरू केले. या अपमानाचा आणि अत्याचाराचा प्रतिशोध घेण्यासाठी बगालचे छावे ’ वंदे मातरम’ च घोष करीत जीवावर उदार झाले. स्वत:ला कर्दनकाळ समजणाऱ्या मदांध ईंग्रज अधिकाऱ्याना कंठस्नान घालुन सरकारला प्रत्त्युत्तर देण्यासाठी क्रांतीकारी संघटनांच्या गुप्त बैठका सुरू झाल्या, खलबते शिजु लागली, शस्त्रे परजु लागली.

चाराणे कमी !!

लेखक टारझन यांनी शनिवार, 15/05/2010 18:53 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स लोक्स , अंतिम वाचक वाचन करार (End Reader Reading Agreement) :- खालील लेखात देवादिकांचे संदर्भ आहेत , अर्थात आम्ही नास्तिक असल्याने ती पात्रे आम्हाला इतर कोणत्याही कथेतल्या पात्रांप्रमाणे आहेत. तेंव्हा आस्तिक लोकांच्या भावना "उगाचंच" दुखावल्या जाण्याचा संभव आहे , एक तर त्यांनी "म्यॅच्युरिटीने" काम घ्यावे , किंवा आत्ताच "स्वगृह" वर क्लिक करावे.

थुंकी

लेखक वडापाव यांनी शनिवार, 15/05/2010 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
आधी सहन करता येत नसे, पण आता सवयच झालीय. भारतात एक अब्ज माणसे आहेत. त्यातले निदान पन्नास-साठ कोटी तरी पुरुष असणारच. त्यातले दहा-वीस कोटी वजा केले, तरी तीस-चाळीस कोटी माणसे तरी रोज येता-जाता रस्त्यावर थुंकत असतात. कोणाच्या थुंकीत कफ असतो, कोणाच्या थुंकीत तंबाखू, पान मसाला, तर कोणाच्या थुंकीत सगळ्याचं एकत्रित मिश्रण! मी रोज कॉलेजला जाण्यासाठी बोरीवलीवरुन ट्रेन पकडतो. किती वाजता कुठे जाणारी ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्म ऐवजी कोणत्या प्लॅटफॉर्मवर किती मिनीटांनी उशिरा येणार आहे हे सांगितल्यावर किंवा सांगायच्या आधी "" यात्रीयोंसें निवेदन है कि वे कृपया इधर उधर ना थुंके. थुंकनेसे बिमारी फैलती है.

कळकळीचे आवाहन - मदत

लेखक पर्नल नेने मराठे यांनी शनिवार, 15/05/2010 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र मैत्रिणिंनो, तुम्ही सगळेच मोठ्या मनाचे आहात. ह्या न त्या कारणाने तुम्ही मदत करता मग ती कुठलीही असो हे हल्लीच सिद्ध झाले आहे. मला सुध्दा एक मदत अपेक्शित आहे. क्रुपया chuchu.marathe10 ह्या माझ्या आय्डीला तुमची शेजारीण म्हणुन तुमच्या शेतात अ‍ॅड करुन घ्या. मला माझे शेत अपग्रेड करायचे आहे. तुम्हाला मी गिफ्ट म्हणुन ह्यान त्या हस्ते ३% आपलं हे न ते काहितरी गिफ्त पाठ्वत जाइन. तुमची, (कश्टकरी) चुचु

कोकणातले `केरळ'...

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 15/05/2010 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईहून गोव्याकडे जाताना, संगमेश्वर ओलांडले, की एक मोठ्ठे वळण पार केल्यावर रस्त्याच्या डाव्या बाजूला `ओझरखोल' नावाचे गाव दिसते. टेकडीएवढ्या हिरव्यागार डोंगरावर, शाळेची एक बैठी इमारत आणि झाडांमध्ये लपलेली कौलारू, केंबळी घरे, उजवीकडे एक रोडावलेली खाडी आणि लहानसा डांबरी रस्ता... राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कै. माधवराव मुळ्ये यांचं हे गाव. इथल्या प्राथमिक शाळेला, माधवरावांचं नाव दिल्यामुळे अनेकांना हे माहीत झालंय. संगमेश्वरच्या अलीकडे गोळवलकर गुरुजींचं गोळवली, आणि पलीकडे माधवराव मुळ्यांचं ओझरखोल...