कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता आणि लसूण ..लसूण इथे जरी गड्डाभर दाखवली असली तरी इतकी जास्त नको, नाहीतर झोंबरा व्ह्यायचा पदार्थ.
मिरच्यांची संख्या दुस-या दिवशी सुट्टी आहे की हापिसला जायचे आहे त्यावर आणि आपापल्या भौगोलिक पार्श्वभूमीनुसार ठरवून घ्यावी. (सांगली, कोल्हापूर, कोकण, मुंबई, अमेरिका वगैरे लक्षात घेऊन..) शिवाय आपण विकत घेतलेला मिरचीचा प्रकार कोणता (ब्याडगी, लवंगी, भूत झोलकीया..!!) यावरही ही संख्या अवलंबून ठेवावी. "कॉनसीक्वेन्शियल" ड्यामेजेसना प्रस्तुत लेखक जबाबदार नाही.