श्री. स्पा,
राजा जयपाल यांच्या 'चरित्र फलकाचा' फोटो कृपया अजून मोठा करून टाकता आला तर बघा ना, फलक व्यवस्थित वाचता येईल.
बाकी लेख आवडला हे वेगळे सांगायला नको.
पुढच्या भागातील वेरूळ दर्शनाच्या प्रतीक्षेत.................
सगळेच फोटो आणि वर्णन सुंदर आलंय. वेरूळला फोटो काढायला परवानगी असली तर तो भाग आणखीच छान येईल, यात शंका नाही!
(बाल की खालः मेंढ्या म्हणून फोटो दिलायस तो शेळ्यांचा आहे.)
अरे वा वा वा..
अचानक गावाची सैर घडवून आणलित मालक..
मुकुंदराजाच्या समाधीला जाउन तर मला अनेक वर्ष झालीत. तसे आता अंबाजोगाई/परळीला जाउनही ३-४ वर्ष नक्कीच झालीत.
एकदाचे ३.१५ ला आम्ही पोहोचलो, सकाळ पासून फक्त "पोह्यावर " होतो. पोटात भूकेचा आगडोंब उसळला होता ,गेल्या गेल्या सिताफलांचे ढीग दिसले, मग काय त्याच्यावरच ताव मारला ,
अहमदपुर जादा गाडी म्हणजे नक्की मस्साजोग ला थांबते. पोहे तिथेच खाल्ले का??? तिथले पोहे खुप प्रसिद्ध आहेत.
वैजनाथाच्या मंदिर बरेच वेळेस शांत असते. तिथे चांगले शांत दर्शन होउ शकते. या मंदिरात त्या उजवी कडे जाणार्या बाणाच्या आसपासच आमच्या एका पुर्वजाची समाधी आहे. त्यामागची कथा एकदा माहित करुन घ्यायला हवी.
अंबाजोगाईला देवीचा मंदिराच्या बाहेर कलमी पेढा घेतला की नाही?????
आता पुढे वेरुळ म्हणताय.. लवकर येउद्या वाट पाहतोय...
अंबाजोगाईला देवीचा मंदिराच्या बाहेर कलमी पेढा घेतला की नाही?????
होय खूप चव सुंदर होती त्यांची.....
अहमदपुर जादा गाडी म्हणजे नक्की मस्साजोग ला थांबते. पोहे तिथेच खाल्ले का??? तिथले पोहे खुप प्रसिद्ध आहेत.
पोहे औरंगाबादेतच खाल्ले होते....,बीड ला फक्त चहा प्यायला थांबलो होतो.....
आता पुढे वेरुळ म्हणताय.. लवकर येउद्या वाट पाहतोय...
वेरुळच्या आधी दौलताबाद लिहीन म्हणतो...... :)
मी मुळ अंबेजोगाईचा आहे.. शिक्षण १२ वी. पर्यंत तिकडेच झाले योगेश्वरी शाळा आणी कॉलेजातुन..
माझ्या वेळेसचे नं१ चे कॉलेज होते.. ई.स. २००१ .. १२ वी ला कॉलेजातुन १८ जण मेरीट ला होतो :)
तेंव्हा अंबाजोगाईला मराठवाड्याचे पुणे म्हणुन ओळखायचे
फोटु टाकल्याबद्दल आभारी ..
सीताफळ / कार (करवंद) आणी रामफळ साठी बीड जिल्हयातील धारुर(माझे जन्मगाव) प्रसिध्द आहे :)
रिक्षाने जाण सर्वात सोप्पं.... पण तिकडचे रस्ते एवढे वाईट होते कि.... बस रे बस... होडीत बसल्यासारखं वाटत होतं. अतिपाव्साने म्हणे रस्ते उखडले गेले होते...
एवढे वाईट रस्ते तर मुंबईत पण बघितले नव्हते. बैलगाडीच्या वेगाने तो रिक्षा चालवत होता, १ तासाच्या अंतराला त्याने २ तास घेतले, >>>>>>>
३ वर्षांपुर्वी रस्ते खुप चांगले होते.. नंतर पावसाने व पी डब्लु डी च्या मेंटेंनन्स विभागाने वाटुळे केले आहे..
आणि हो
अहमदपुर जादा गाडी म्हणजे नक्की मस्साजोग ला थांबते. पोहे तिथेच खाल्ले का??? तिथले पोहे खुप प्रसिद्ध आहेत.
>> १०१% बरोबर.. तिकडे सर्व एस टी ट्रॅव्हेल्स च्या गाड्या थांबतात म्हणजे थांबतातच .. अहमद्पुर गाडी मस्साजोग लाच थांबते
पुन्हा कधी गेलात तर पोहे आणी स्पे. चहा मिस करु नका :)
असो त्या रस्त्याची पण आता पार वाट लागली आहे.. :(
दोन दोन मुख्यमंत्री येऊन गेले मराठवाड्याचे पण साले स्वता:चेच कल्याण करतात.. :(
एक पंचवटी नावाचं हाटेल दिसलं. बरं वाटलं म्हणून गेलो . थाळीची ओर्देर दिली.
पण हाय रे किस्मत ... एवढं बकवास जेवण मी कुठेही बघितलं नव्हतं आणि खाल्लंही(अन्नाला नाव ठेवू नयेत हे मान्य तरी सुद्धा.........) दिलेली रोटी ही घडी केलेल्या "टर्किश टॉवेल" सारखी होती.... भाजण्याची क्रिया केली होती कि नाही देव जाणे.
>>>>>
ऐकुन वाईट वाटले.. :(
बघायला पाहिजे कोण आहे हा पंचवटी हॉटेल वाला.. :(
बस स्टॅड च्या जवळ चांगले हॉटेल्स आहेत.. तशी देवीच्या मंदीरा पासुन जवळच शिवाजी चौकात पण खुप मस्त हॉटेल्स आहेत..
अगदी अनलिमिटेड आणी हाय क्वालीटी जेवण मिळाले असते.. ते पण पुण्या मुंबई मधे मिळणार नाही असे..
केवळ ४५ रु. अनलिमिटेड थाळी :) आणी तिथली लस्सी पण फेमस आहे
पुन्हा जाणार असाल तर व्य.नी तुन कळवा सर्व माहीती देईल :)
आमच्या गावाला जाऊन आलात तर...
जेवण वाईट मिळत ह्यात शन्का नाहि... एकदा तिथे माझ्या लहान भावाच्या पानात वेटर नि भाजी वाधलि जि त्याल नको होति...तो लग्गेच ओरडला कि "नकोय मला....." वेटर नि ताबड्तोब तशिच भाजि परत काधुन घेतलि...
मला अजुन्हि सम्जत नाहि कि ते चान्गल होता कि वाइट......
प्रतिक्रिया
छान
स्पा मस्त......अंबाजोगाई आमची
श्री. स्पा, राजा जयपाल
प्रयत्न केलाय....
धन्यवाद. आता माहितीही मिळाली,
स्पा,
आणखी थोडी बाल की खालः
स्पा, वर्णन फारच छान आहे.
फालतू आणि निरर्थक कौल काढणा
धन्यवाद.........
छान रे स्पावड्या! झकास वर्णन
दमदार सुरुवात !!
मस्त रे....
छान
अरे वा वा वा.. अचानक गावाची
अंबाजोगाईला देवीचा मंदिराच्या
वेरुळच्या आधी दौलताबाद लिहीन
फार सुन्दर लेख लिहलात तुमच्या
लेख आवडला. आपल्या राज्याची
धन्यवाद
अभिनन्दन...