Skip to main content

राहुल गांधी

राहुल गांधी

Published on शनीवार, 29/01/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
राहुल गांधी यांनी तरुणांना राजकारणात येण्याचे आवाहन केले आहे...जीवनातली १० वर्षे योगदान द्यावे असे त्यांचे विचार आहेत.. आपल्या समुहातील तरुण याचा विचार करणार का? कदाचित उद्याचा नेता मिसळ पाव समुहातला असेल आपल्या काय प्रतिक्रिया आहेत..?

याद्या 4574
प्रतिक्रिया 22

In reply to by युयुत्सु

सध्या मला त्याच्या फक्त लग्नाची काळजी आहे... हा युयुत्सुंचा प्रतिसाद आहे म्हणून विचारावेसे वाटले. ;) नक्की काळजी कशाबद्दल? लग्न करणार म्हणून का अजून करत नाहीत म्हणून? बाकी मूळ चर्चेसंदर्भात : राहुल गांधी म्हणतात म्हणून नाही पण नक्कीच प्रत्येकाने काहीतरी समाजासाठी करावेसे वाटते. आजकाल पब्लीकसर्व्हीस मधे लोकं कमी येत आहेत म्हणून अमेरिकेतपण प्रोत्साहन दिले जाते....

बहुतेक बागवेगिरी करायला लोक कमी पडत असावेत , चप्पल उचलायला , सतरंज्या उचलायला लोक हवे असतील , राहुल बाळ ला म्हणव employment News मध्ये जाहिरात दे " कार्यकर्ते हवेत , सेवा करायला , सतरंजी , खुर्च्या , जोडे उचलण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य " कृपया नेते मंडळींच्या नातेवाईकांनी किंवा मुलांनी अर्ज करू नये त्यांच्या जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत ....मंत्रिमंडळात .........

In reply to by jaydip.kulkarni

बागवे गेले म्हणून काही मंत्र्यांची कमतरता पडलेली नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सगळी कामे सोडून औरंगाबादपासून महाडपर्यंत मागोमाग हिंडत आहेतच की ! शरद

युवराज महारष्ट्रातील नेत्याना मार्गदर्शन देण्यासाठी आले आहेत. त्यांनी केलेले खालचे स्टेटमेन्ट त्यांची प्रगल्भता दिसून येते. त्यानी सरकारला चक्क सुचना केली आहे की सोनावणे जळीत हत्या प्रकरणात कडक कारवाई करावी.

राजकारण हे मला दलदलीसारखे वाटते ,शक्य तितके राजकारणापासुन दूर राहण्याचा प्रयत्न करेल्.आणी समाजासाठी काहीतरी करायचेच असेल तर ते राजकारणापासुन दूर राहुनही करता येईल .

माझे बाबा नेहमी सांगायचे - राजकारण हा नालायक लोकांचा शेवटचा धंदा असतो, त्यामुळे आम्ही नालायक असलो तरी हा धंदा करणार नाही हां आता दहा वर्षे फिक्स पगारावर घेणार असतील राहुल गांधी तर चालेल मला. एकुण सिटिसि च्या ५% देउ कि रेफरलचे, आपली ना नाही त्याला.

महात्मा गांधी महाराष्ट्राला कार्यकर्त्यांचे मोहोळ म्हणायचे. राजकारणी माणसेच देश बदलु शकतात असे राहुल गांधींना वाटत असावे. एकही काळा पैसा न वापरता लोकसभेची निवडणूक कशी जि़ंकायची ह्यावर राहूल गांधी मार्गदर्शन करु शकतील का? जात्,धर्म,पैशाचा विचार न करता राहुल गांधी उमेदवार उभे करु शकतील काय? ह्या दोन प्रश्नांची उत्तरे समाधानकारक मिळाली तर बघुया!नायतर नोकरी जय हो.

जीवनातली १० वर्षे योगदान द्यावे असे त्यांचे विचार आहेत.. त्यांना आणि त्यांच्या घरच्यांना खाउ/पिउ कोण घालणार अविनाशकाका? आपल्या समुहातील तरुण याचा विचार करणार का? तुम्ही तुमच्या नातात्यला किती युवकांना हे सांगीतले आहे?? (उत्तर द्यायला परत या. नेहमीप्रमाणे २-३ ओळींचा एक विषय टाकायचा sorry फेकायचा. आणि मग सगळे कसे भांडतात हे बघत बसायचे हे सोडा.)

राहुल गांधी यांनी तरुणांना राजकारणात येण्याचे आवाहन केले आहे... काय रं राव्हल्या, पोरं कमी पडत्यात काय? २ ट्रक भरूण पोरं पाठवतो की! नाहीतरी काय करत्यात ती, आय.टी. मधी ज्वाब करत्यात आनि राच्च्याला जेवन खाउण झोपत्यात....कदी मस्ती नाय ना पोरीची छेड नाय....!!

या सोनियापुत्रावर मिपा सदस्यांचे एवढे प्रेम का ? सारखा त्याच्या विषयी धागा निघतो. त्याच्या विषयी सारखे बोलायचे म्हणजे त्याला महत्व द्यायचे. म्हणजेच आपणच घराणेशाही मान्य करायची.

In reply to by तिमा

युवराज व त्यांचे अक्कलशुन्य गुरुदेव असल्या टिनपाट व्यक्तींच्या तोंडून बाहेर पडलेल्या बालिश विधानांच्यासंदर्भात धागे काढून (पक्षी-पुड्या सोडून)फुकटच्या चर्चेच्या फैरी झडवण्यात व तथाकथित वैचारीक मंथन करण्यात सदस्यांचा अमुल्य वेळ व क्रयशक्ती खर्ची घालवावी या उद्देशापोटीच धागाप्रवर्तक असले अर्थहिन धागे काढत सुटले आहेत..... रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी 'हा असाच एकुण प्रकार दिसतोय.

चोरून-चोरून परदेशी नेऊन स्विस बँकेत ठेवलेला पैसा गरीब भारतीयांचा आहे आणि यूपीए सरकारने तो त्वरित परत आणण्याची व्यवस्था करावी असे अतीशय मोलाचे मुक्ताफळ परवाच महाराष्ट्रात आलेला असताना राहुलबाळाच्या तोंडून (चुकून) बाहेर पडले. चुकून अशासाठी कीं जे दिल्लीत आपल्या घरी (हळूच) सांगायचे ते महाराष्ट्रात येऊन त्याने मोठ्याने सांगितले! म्हणूनच म्हणतात, "परी तू जागा चुकलासी"! पण कांहींही म्हणा पण 'इतरां'ना उपदेश करून स्वतः मात्र "कोरडे पाषाण" रहाण्यात या दोघांचा हात इतर कुणी धरू शकणार नाहीं! 'लोकसत्ते'त आलेला लेख वाचा व वाचकांच्या ३ प्रतिक्रियाही! http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=128114%3A2011-01-09-15-32-42&catid=212%3A2009-08-18-16-27-53&Itemid=210

त्यांना आणि त्यांच्या घरच्यांना खाउ/पिउ कोण घालणार अविनाशकाका? ------------------------ आई शप्पत..पतांना कावेरीचे तिर्थ दिलेच पाहिजे शांति साठी

दहा वर्षे? म्हणजे सत्तेचा काळ ठरला वाटते?

आज भारताला राहुल जीं सारख्या युवक नेत्या ची गरज आहे. देश सेवेच्या पोटि त्यांनी अजुन लग्न हि केलं नाहि. आजच्या युवकां समोर ते एक आदर्श आहे. त्यांच्या विरुध्द काहि लिहिणं म्हणजे देशद्रोह.

http://www.hindustantimes.com/Court-notice-to-Rahul-Gandhi/Article1-668312.aspx या बातमीवर पण चर्चा करणार का? युवराजांना जाब विचारणारे कुणी नाही ..