Skip to main content

दोन लेकांमधील अंतर

लेखक सुनील यांनी शुक्रवार, 10/06/2011 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
भारतातील शहरी मध्यमवर्गीय सध्या आम्ही दोन, आमचे एक ह्या मोडवर आहेत. परंतु, कुटुंब नियोजनाच्या सुरुवातीच्या काळात "हम दो हमारे दो" किंवा "पहला जल्दी नही, दुसरा अभी नही, तीसरा कभी नही" अशा जाहिराती प्रसिद्ध होत. दोन मुलांमध्ये किती अंतर ठेवावे ह्याची चर्चा करणारा एक रोचक लेख नुकताच वाचनात आला. आदिमानवदेखिल आपल्या अपत्यांत ३-४ वर्षांचे अंतर ठेवी, हे कळून आश्चर्य वाटले.

आज पहाटे

लेखक विश्वेश यांनी शुक्रवार, 10/06/2011 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
आज पहाटे, आळसावल्या मनात सखये उरला तुझाच बंध आज पहाटे, सुकल्या राताराणीस सखये उरला तुझाच गंध ... आज पहाटे, सोडले शरीर अन भिरभिरले मन तुझ्याच मागे आज पहाटे, संपला शिशिर, फुलवितो वसंत नवस्वप्नांचे थवे आज पहाटे, सरला काळोख, उजळले मन्मनात सोनेरी रंग आज पहाटे, झालो वैरागी, अन झालो पुन्हा मोहरानात दंग आज पहाटे, पुन्हा एकदा, बोलले किती एरवीचे तुझे नयन मुके आज पहाटे, पुन्हा एकदा, दाटले डोळ्यासमोर वास्तवाचे धुके - विश्वेश

घाव

लेखक प्यारे१ यांनी शुक्रवार, 10/06/2011 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
लोक्स चारोळीचे धागे बनवताहेत. म्हटले आपण पण न लाजता (कोण हसतोय रे तो? आहे. आहे मला थोडीशी का होईना लाज) जे काही आहे ते प्रकाशावे. वादसंवाद करताना निर्मिती झालेली आहे त्यामुळे श्रेय अर्थातच मला नाहीये. प्रस्तावना पुरे झाली. तर सादर आहे माझे शेरोशायरीतले पहिले अपत्य. घाव तो होता जुना पण वर्मी नव्याने लागला पुसटल्या जखमांना जणू आज स्पर्श कुणाचा जाहला आली अशी कळ उरी, आली उरी कळ अशी जणू अंत मी स्वतःचा, आज जवळ पाहिला
काव्यरस

स्पंदन

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 10/06/2011 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
वर्षे सुकली गुच्छ बांधले काडी एक तयातिल चंदन वळून मागे शोधू पाहे; गंध मंडली; शापित मन उगाळली आयुष्ये परि ना वात सरे ना ऋतुमंथन काळावरती ठसे अबाधित; तलम रेशमी हे बंधन घटअमृतसय निराकार; उभयांना विरहाचे प्राक्तन शोध निरागस क्षतापलिकडे; रोज सागराचे स्पंदन .............................अज्ञात
काव्यरस

दोन लेखांमधील अंतर

लेखक शरद यांनी शुक्रवार, 10/06/2011 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
१) नविन लेखकांच्या बरोबरच जुन्या लेखकांनी देखील आपल्या दोन लेखात किती अंतर ठेवावे ह्याची स्पष्ट सूचना देण्याची वेळ आली आहे असे वाटते. 'हळुहळु समजतील, लक्षात घेतील' असे वाटणे चुकीचे आहे असे वाटते. २) अनेक नवे लेखक / सदस्य हे ब्लॉगधारक असतात. मिपाचे व्यासपीठ मिळाल्याबरोब्बर ते रोज २/४ लेख ब्लॉगवरुन सरळ उचलुन आणतात आणि इथे रतिब चालु करतात. (१) श्री. परासाहेब यांच्या वरील प्रतिसादावरून मला बरेच दिवस पडलेला प्रश्न समोर आला आहे. किती लिहावे ? केव्हा थांबावे ? आपण लिहतो ते वाचकांना आवडते का ? त्याचा दर्जा काय आहे ? या सारखे अनेक प्रश्न अनुत्तरित रहातात. कोण देणार यांची उत्तरे ?

भंगलेल्या मनाचा अभंग ..२

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शुक्रवार, 10/06/2011 00:26 या दिवशी प्रकाशित केले.
फव्वारा सुगंधी लावतो शरिरा आणि त्याचा तोरा मिरवितो... तरी येइ घाम थांबवू हा कसा..? किती जरी पुसा घमघमे.. असे किती लेप माझ्या मुखावरी गंध पावडरी भस्म माझे.. पुटावरी पुटे सत्यासंगे खोटे समागमे खाटे लाज आली....

मन

लेखक सामान्य वाचक यांनी गुरुवार, 09/06/2011 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
आता माझा छान वेळ जातो मनाशी खेळ्ण्यात, ते दडी मारुन बसले की त्याला शोधून काढण्यात

साडे माडे....

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 09/06/2011 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा आपल्यालाही जमायला हवं 'बाबां'सारखं वागायला पोलिस आले पकडायला तर पाय लावून पळायला

नवीन सदस्यांप्रति जून्या सदस्यांचे वर्तन.

लेखक नीलकांत यांनी गुरुवार, 09/06/2011 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आज मिसळपाववर येणार्‍या नवीन सदस्यांच्या अडचणी आणि त्याबाबत जूण्या सदस्यांचे वर्तन यावर चर्चा करावी म्हणून हा लेख आहे. असे साधारण निरीक्षण आहे की नवीन लोक साधारण ६ महिने ते १ वर्ष केवळ वाचनमात्र अवस्थेत असतात. त्यानंतर कधीतरी ते सदस्यं होतात. ते झाल्यावर सुध्दा प्रतिक्रिया लिहीण्यापासून ते लेख लिहीण्यापर्यंतचा प्रवास नवीन सदस्यासाठी जरा अडचणीचाच असतो. त्यामुळे हा प्रवाह जरा हळू चालतो. असं सगळं करून एखादा नवीन सदस्यं जेव्हा एखादा लेख लिहीतो तेव्हा तो पहिलाच लेख खूपच चांगला व्हावा किंवा अतिशय मुद्देसुद वगैरे व्हावा अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे असं वाटतं.

सांप्रदायिक और लक्षित हिंसा ( न्याय तक पहुंच और हानीपूर्ती) अधिनियम २०११

लेखक JAGOMOHANPYARE यांनी गुरुवार, 09/06/2011 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
सांप्रदायिक और लक्षित हिंसा ( न्याय तक पहुंच और हानीपूर्ती) अधिनियम २०११ हा नवीन कायदा येणार आहे.