Skip to main content

"प्यार का पंचनामा"... सिनेमाची ओळख

लेखक भडकमकर मास्तर यांनी मंगळवार, 26/07/2011 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
प्यार का पंचनामा. दोन महिन्यांपूर्वी "प्यार का पंचनामा" नावाचा सिनेमा येऊन गेला.. आला कधी गेला कधी कळलाही नाही या टाईपातला हा सिनेमा. तूनळीवरती याच्या संवादांच्या काही क्लिप्स पाहिल्या होत्या. हे प्रोमोज आवडलेही होते. पण बर्‍याचदा प्रोमोज बरे असतात आणि सिनेमा कंटाळवाणा असतो त्यामुळे सिनेमाकडून फ़ार अपेक्षा नव्हती...तरीही पाहिला आणि हा सिनेमा चक्क आवडला. मजा आली. तूनळीवरची झलक http://www.youtube.com/watch?v=pwSmmJV1XvY गोष्ट सोपी आहे. रजत, निशांत आणि चौधरी या नावाचे तीन बॅचलर आय्टी इन्जिनियर्स फ़्लॅटमेट्स आहेत.

थेट चित्रगुप्ताच्या मूळ नोंद वहीतून: द्रौपदीची पाचजणात वाटणी का आणि कशी झाली याची हकीगत आणि श्रीकृष्णाचा धावा

लेखक चित्रगुप्त यांनी मंगळवार, 26/07/2011 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आम्ही अधून मधून आमच्या जुन्या-पुराण्या नोंदवह्या चाळत असतो, आणि वेळोवेळी त्यातील काही प्रसंग मनुष्ययोनीत प्रसृत करत असतो. वस्त्रहरण प्रसंगी, द्रौपदीने कृष्णाचा केलेला धावा सर्वविदित असला, तरी यापेक्षा पुष्कळ आधी एकदा द्रौपदीला कृष्णाचा धावा करावा लागला होता, ती घटना अशी: प्रसंग: अर्जुनाने एकट्याने पण जिंकला असून द्रौपदीस पाची जणांची पत्नी बनावे लागले..

क्रांतितै चे अभिनंदन

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 26/07/2011 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या मिपाची सभासद क्रांतितै हिच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन नागपूरला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह, शंकर नगर येथे संपन्न होत आहे. दि. ७-८-२०११रोजी सायंकाळी ६ वाजता,मान्यवर श्री. भीमराव पांचाळे, गझलनवाज यांच्या शुभहस्ते, श्री. गिरीश गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि डॉ. सुलभा हेर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली "असेही-तसेही" हा गझलसंग्रह आणि "अग्निसखा" हा काव्यसंग्रह प्रकाशित होणार आहे.

दोन कविता

लेखक अरूण म्हात्रे यांनी सोमवार, 25/07/2011 20:50 या दिवशी प्रकाशित केले.
मज ठाऊक नव्हते दार कोणते तुझ्या घराचे उन्हे वेचण्यासाठी.... मी खूप श्रमाने दिवस फोडूनी असाच येतो लटकत भटकत उन्ह होउनी तुझ्या घराच्या काठी...... ________________________________ तू पहिल्यांदा भेटलीस ते दिवसच पावसाळी की स्वतःबरोबर आकाश रितं करणारा हा पाऊस सोबत घेऊन यायची तुझी जुनी सवय ! काहीच आठवत नाही--- ----इतकंच लख्ख जाणवतं की कुठूनतरी वीज कोसळली नि पागोळ्यांबरोबर खेळण्याचं माझं वय जळून गेलं ...... (या माझ्या दोन कविता आधी इतरत्र प्रसिध्द झाल्या आहेत.

भानोले/भानवले

लेखक जागु यांनी सोमवार, 25/07/2011 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : पाव किलो गव्हाचे पिठ पाव किलो तांदळाचे पिठ गुळ अंदाजे ओल खोबर वेलची पुड जायफळ पुड चिमुटभर मिठ खायचा सोडा किंवा पापड खार अर्धा चमचा (ऑप्शनल) तेल पाककृती: रात्री गव्हाचे पिठ व तांदळाचे पिठ डोश्याच्या पिठाप्रमाणे पातळ भिजवुन ठेवावे. साकाळी त्यामध्ये गुळ (पाव किलोपेक्षा जास्तच लागेल. ढवळताना गुळाचा चांगला वास आला पाहीजे)वेलची पुड, जायफळ पुड व ओल खोबर, चिमुटभर मिठ स्पंजी होण्यासाठी हवा असल्यास खायचा सोडा किंवा पापड खार घालाव.

विश्वासाचं सार्थक

लेखक प्रास यांनी सोमवार, 25/07/2011 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
मी कोण, काय करतो, माझ्या कामाचं स्वरुप काय, अशा प्रश्नांना खरंच काही अर्थ नसतो. कुणीही, कोणत्याही व्यक्तीची गरजेपेक्षा जास्त खोलात शिरून माहिती जाणून घेऊ इच्छित नाही. कारण प्रत्येकालाच तशी हौस नसते. एरवीही आपलं स्वतःच व्यक्तीगत जीवन घड्याळाच्या काट्यानुसार चालवायची सवय लागलेला माणूस कशाला कुणाच्या फालतू चौकशा करत बसेल? त्याला त्याच्या आयुष्यातल्या चिंता सतावत असताना इतर अनोळखी माणसांच्या दु:खाश्रुंना वाट काढून देण्यासाठी स्वतःचा खांदा देण्याची मनोवृत्ती आजकाल कुणी दाखवत नाही.

कलमाडींना स्मृतीभ्रंश??

लेखक विवेक मोडक यांनी सोमवार, 25/07/2011 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
आपले लाडके नेते मा.श्री. सुरेशभाई कलमाडीजी साहेबांना स्मृतीभ्रंश झाल्याचे तिहारच्या उपमहासंचालकांनी जाहीर केले आहे. Any comments??