Skip to main content

ही चारोळी कोणाची

लेखक धन्या यांनी शुक्रवार, 30/03/2012 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
नका रे घालू काशी अशी कवितांची जरी भीकही मिळे तया प्रतिसादांची एकास झाले की ते दुसर्‍यासही होते कपाळावर हात मारुन घ्यावेसे वाटे ही चारोळी आपल्या एका मिपाकराकडून ६ - ७ मिनिटांपूर्वी ऐकली. हिचे कवी कोण हे कोणी सांगू शकेल का? कोणाकडे त्या कवीचा पत्ता असेल तर कृपया देवू शकाल का?

कायदेशीर सल्ला हवा आहे !

लेखक धुमकेतू यांनी शुक्रवार, 30/03/2012 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या एका स्नेह्याच्या बाबतीत खालील घटना घडली आहे , कृपया जाणकार लोकांनी योग्य तो सल्ला द्यावा ! घटना नीट समजून घेण्यासाठी आपण त्या गृहस्थास "मंगेश" असे नाव देऊ . १) मंगेश हा पुणे मधल्या एका बऱ्यापैकी तंत्रद्यान ( Software ) कंपनी मध्ये साधारण २ वर्षापूर्वी नोकरी करत होता. २) सदरची कंपनी पब्लिक लिमिटेड कंपनी आहे. ३) साधारण २ वर्षापूर्वी काही कारणामुळे कंपनी नियमितपणे पगार देऊ शकत नव्हती , व्यवस्थापनाने लवकरच परिस्थिती पूर्वपदाला येईन असी आश्वासने अनेक वेळा दिली .

ही कविता कोणाची

लेखक स्वानंद वागळे यांनी शुक्रवार, 30/03/2012 16:09 या दिवशी प्रकाशित केले.
वर कोर्‍या आभाळाची भट्टी तापली तापली खाली लेकरांची माय वारा पदराने घाली वार्‍या खाली कसेबसे उभे रोप जवारीचे एक मलूल पोपटी दोन सुकल्या पात्यांचे ... ... ... ... ... ... ... ... उभी कोणाच्या दारात रांग भुकेल्या बाळांची तहाला वाडगा घेवून अशी तिष्ठत केंव्हाची ही कविता आपल्या बालभारती च्या पुस्तकात ६ वी -७ वी ला होती. हिचे कवी कोण हे कोणी सांगू शकेल का? कोणाकडे पूर्ण कविता असेल तर कृपया देवू शकाल का? धन्यवाद स्वानंद वागळे

म्हणून ......!!

लेखक फिझा यांनी शुक्रवार, 30/03/2012 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
म्हणून ............ सावरायचे होते आता सगळ्यांनाच एकमेकांबरोबर स्वतालाच ............. कुठेतरी बिनसले कि सगळे संपले असे नाही ........ नाती अशी सहजासहजी तुटत नाहीत ..म्हणून.............. झाल्या असतील खुळ्या काही चुका सुधारून पाहू ना एकदा.......... नाही जगता येत 'तुझ्याशिवाय' सांगून पाहू एकमेकांना एकदा......... ...म्हणून ................. पाण्यात मिसळलेला रंग जसा वेगळा करता येणार नाही तसाच तुझ्या आठवणीचा पसारा आवरता येणार नाही दोन श्वासातले अंतरही मोजता येणार नाही ..म्हणून........... म्हणून.....

भारतका रहनेवाला हूँ

लेखक तिमा यांनी शुक्रवार, 30/03/2012 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय वाचक, 'भारतकुमार'चे हे डावीकडे लिहिलेले गाणे तेंव्हाही मला पटायचे नाहीच. पण सध्याच्या परिस्थितीत तर ते मला बोचते. मूळ गाणे हिंदीमधे असल्यामुळे विडंबन पण हिंदीतच केले आहे. विडंबन उभे वाचावे. तुलनेसाठी मूळ गीत डावीकडे दिले आहे.संपादकांनी ते मराठी नाही म्हणून उडवायचे असेल तर उडवावे. परन्तु माझ्या वयाच्या लोकांच्या भावना, आपणापर्यंत पोचवायचा मी प्रयत्न केला आहे. - तिरशिंगराव है प्रीत जहाँ की रीत सदा -................ है घूंस जहाँ की रीत सदा मैं गीत वहाँ के गाता हूँ .................
काव्यरस

एक पद्धत..

लेखक गवि यांनी शुक्रवार, 30/03/2012 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
म्हणे मरणाची बातमी देणार्‍या पोस्टकार्डाचा कोपरा कापून पाठवतात.. पोस्टकार्डंच कुठे राहिली आता.. सगळीकडे ईमेल.. अर्थात मी कधी कोपरा कापलेलं पोस्टकार्ड पाहिलं नाही.. पण असेल.. आपली एक पद्धत.. म्हणे मोटरमन रिटायर व्हायच्या लास्टच्या दिवशी त्याला डेक्कनक्वीनवर पाठवतात.. आणि एकही लाल सिग्नल देत नाहीत.. खरं खोटं कोणास ठाऊक.. सगळ्या मोटरमन्सना मिळत असेल हा मान..? मी कधीच डेक्कनक्वीनने गेलो नाही... अर्थात तिचा मोटरमन कधी पाहिला नाही .. पण असेल.. आपली एक पद्धत.. म्हणे फाशी सुनावताच जज निब तोडतात .. सिनेमात पाहिलंय.. .. अर्थ माहीत नाही..

जागो ग्राहक जागो - एक अनुभव

लेखक बाळ सप्रे यांनी शुक्रवार, 30/03/2012 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
दिड एक वर्षापूर्वीची गोष्टं.. टिपिकल ट्रॅप.. बिग बझार/ उत्सव प्रदर्शनात स्लिप भरलेली.. तिथे मिळवलेला फोन नं. वापरून फोन आला.. लकी ड्रॉ मध्ये तुमचा नंबर लागलाय.. ३ दिवस ४ रात्री हॉलिडे फ्री वगैरे वगैरे.. खरं तर फक्त टाइमपास म्हणून गेलो. ठरवलं होतं थोड ऐकायचं.. काय फ्री असेल तर घ्यायचं आणि परत फिरायचं.. भन्नाट दावे केलेले.. ज्या हॉटेल्सचा मार्केट रेट ७०००-८०००रु दर दिवशी आहे अशी हॉटेल्स ७००-८००रुपयात मिळतील.. ते पण फक्त "युटिलिटि चार्जेस"!! भारतात आणि परदेशात हजारो ठिकाणी टायअप्स्.. सर्व बुकिंग सेवा ऑनलाइन उपलब्ध.. परदेशात तर युटिलिटि चार्जेस दर आठवड्याला फक्त $१०० !!

कवितेचा अर्थ हवा आहे..

लेखक सांजसंध्या यांनी शुक्रवार, 30/03/2012 13:37 या दिवशी प्रकाशित केले.
पिपात मेल्या ओले उंदीर असे आणलेसंच कसे, बघितल्याविण फुकट मिळाले म्हणुनी आणशी न बघता तू, बुद्धिहीन बीळ सोडुनी सांग कसे ते पिपात (या) आले ओले होऊन? दिवस सांडला बोंबलत फिरण्यात या गिळायला, आता हातपाय धूऊन अंगात ना काही शक्ती आहे, डोक्यात ना कुणी युक्ती आहे. पोरींवरती लहरी डोळे फेकशी पण मधाळ स्मित; त्या ओठांवरचे, ते ही बेकलाइटी, बेकलाइटी! रागाने करीसी पिंप आडवे, पिपात(ले) उंदीर पळाले! पळाले! बा. सी.

अखेरचा पर्याय

लेखक चाफा यांनी शुक्रवार, 30/03/2012 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय बहीण अनामिका, या आधी तुला बरीच पत्र लिहिली पण एकाही पत्राचं तू उत्तर पाठवलं नाहीस, कदाचित तू ती वाचलीच नसशील तुझं वय नक्कीच पत्र वाचण्याइतकं नसणार तेव्हा, म्हणूनच इतक्या उशीरा तुला हे पत्र लिहीत आहे. तुला कदाचित माहीतही नसेल की तुला एक मोठा दादा आहे. खरंतर मलाही माहीत नव्हतं की मला लहान भाऊ झालाय की बहीण, पण एकदा आत्याला माझ्या आईबद्दल बोलताना मुलगी बद्दल काहीसं बोललेलं ऐकलं, तेव्हा मला कळलं आणि मी माझ्यातर्फे तुला अनामिका हे नाव देऊन टाकलं. आईबाबांनी तुझं नाव काय ठेवलंय? कमीतकमी हे तरी सांगितलंय का की तुला एक मोठा भाऊ आहे म्हणून ? का कुणास ठाऊक पण त्यांना मी कधी आवडलोच नाही.