धुक्यात हरवली वाट...
मागच्या महिन्यात कोडाईकनालला जायचा योग आला. ऑफिसमधल्या सहकार्यांसोबत एक रात्र मुक्कामी सहल केली. कोडाईकनाल छानच आहे. मस्त 8-10 डिग्री तापमान होते. प्रचंड प्रमाणात धुक्याची दुलई पसरलेली सर्व सभोवतालावर. त्यावेळी मागच्या पोस्टमधल्या भुछत्रांचे फोटो काढून परत येताना ही धुक्याची दुलई अतिशय दाट झाली आणि धुक्यात हरवली वाट...
महात्मा गांधींना १४३ व्या जयंतीनिमित्त आदरांजली
आज २ ऑक्टोबर २०१२-- महात्मा गांधींची १४३ वी जयंती. महात्मा गांधींच्या खुनानंतर पंडित नेहरू म्हणाले होते: "The light has gone out of our lives and there is darkness everywhere. I do not know what to tell you and how to say it. Our beloved leader, Bapu as we called him, the father of the nation, is no more. Perhaps I am wrong to say that....The light has gone out, I said, and yet I was wrong. For the light that shone in this country was no ordinary light.
गणपतीबाप्पा येता आमच्या घरी
अरे समस्त गुणी जनांनो...
अरे समस्त गुणी जनांनो, आता तरी जागे व्हा
देश विकायची वेळ देशद्रोह्यांनी आणली आहे.
लुळ्या पांगळ्या झालेल्या देशावर
भिक मागायची वेळ आणली आहे.
आता नाही तर कधीच नाही अस म्हणत
देश वाचायची वेळ आली आहे.
फुटीरपणाच्या निराशेचा विषप्याला रिचवत रिचवत
मरणासन्न झालेल्या देशाला,
एकसंध आशेचा जीवनप्याला पाजुन
नवसंजीवनी द्यायची वेळ आली आहे.
लाचलुचपत, सत्तांद्यपणा, जातियवाद, गरीबी,
ह्यामुळे पोखरलेल्या देशाला,
प्रामाणिकपणा, बंधुभाव, ईश्वरवाद, उदारपणा,
ह्यांचा चव्यन प्राश द्यायची वेळ आली आहे.
देशबुडव्या, दांभिक देशद्रोह्यांना हाकलुन लावत
देशप्रेमाची हाक द्यायची वेळ आली आहे.
अरे समस्त गुणी जनांनो, आता तर
नियती
कुणी पाहिली भोर उद्याची अवचित होइल भेट
किती भांडणे तंडुन घेशी अखेर अंत समेट
कोण्या नशिबी असे न संचित धुके हरवली वाट
नसे दूर; अंधारी उमले रोज नवीन पहाट
भंगुर हे क्षण भोगाचे उपभोगाचे वा दाट
नियतीचे चिरअनंत फिरते आशा एक रहाट
......................अज्ञात
काव्यरस
देव नाही देवळात
देव आहे, का देव नाहीच !
एक शंका घुटमळणारी,
सदैव मनाला पोखरत आहे -
देवळाबाहेर लंगडा माणूस
एका आंधळ्याच्या ताटलीत
आदबीने जवळचे नाणे टाकत आहे -
हे असे का, ते तसे का
अपंग नसतांना माझे मन
पंगु बनायला सरावत आहे -
देव जवळून गेला तरीही
रांगेतल्या लोकांसोबत
आस्तिक-नास्तिक चर्चा रंगत आहे !
.
काव्यरस
शिवरायांची शस्त्रे व संभाजी महाराजांचे साहित्य
छत्रपती शिवरायांच्या शस्त्रांपैकी ढाल,अंगरखा,बिचवा अशी अनेक शस्त्रे आज उपलब्ध नाहीत.परंतु त्यांच्या काही तलवारींपैकी तीन तलवारी जगदंबा,भवानी आणि तुळजा या आजही अस्तित्वात आहेत.वाघनखे व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयात आहेत. तलवारींपैकी जगदंबा हि तलवार लंडन मध्ये आहे.ती स्वतः बाबासाहेब पुरंदरे यांनी पाहिल्याचे नमूद केले आहे.दुसरी भवानी तलवार सध्याचे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे आहे,तर तुळजा तलवार हि सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिरात आहे.
कॉन्स्पिरसी थिअरीज
.आत्ताच फेसबुकवर एक कॉन्स्पिरसी थिअरी वाचली.
गणपती झाले...
दसरा दिवाळी येत आहे.
मिष्टान व मिठाईचे दिवस..
विदेशी चॉकलेट्स चा खप वाढावा म्हणून आता खव्या वर धाडीचे सत्र सुरु होणार..
बनावटी खवा,.भेसळ युक्त खवा जप्त अश्या बातम्या झळकणार..
उद्देश हाच की चोकलेट्स भेट म्हणून द्या ..
पारंपारिक मिठाई नको...............................
म्हटलं आपल्याला अशा कॉन्स्पिरसी थिअर्या बनवता येतात का पाहू.
मी पण बनवल्या आहेत काही थिअर्या.
१. स्त्रीमुक्तीचा प्रचार सुरू झाला.
मिसळपाव