Skip to main content

🏟 पुण्याच्या भेटीचे वर्णन ✈

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 02/06/2026 15:19 या दिवशी प्रकाशित केले.

🏟 पुण्याच्या भेटीचे वर्णन ✈

नुकतीच मी👩 भारतात आले होते. मला सुटी उशीरा मिळाल्याने एकटीने प्रवास केला. आमचे हे👨 आधीच पोहोचले होते. सध्याला हिंजवडीतल्या त्यांच्या कंपनीत🏛 ते वर्क💻 फॉम होम करत होते. हे काम संपवून आम्ही सगळे परत अमेरीकेत🏡 परतणार आहोत. 

दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १७: मल्लिपट्टिणम- तंजावूर ६८ किमी

लेखक मार्गी यांनी सोमवार, 01/06/2026 22:04 या दिवशी प्रकाशित केले.

✪ किनारपट्टीवरून सुपीक- संपन्न प्रदेशाकडे राईड 

✪ चौल, पांड्य आणि नायकांच्या प्रदेशात 

✪ तंजावूरमधली पायी केलेली भटकंती 

✪ अविस्मरणीय तंजावूर रॉयल पॅलेस 

✪ बृहदीश्वर मंदिर- अद्भुत, अचाट आणि अशक्य! 

✪ तंजावूर रामकृष्ण मठामध्ये संवाद 

✪ मुलांनी केलेलं योगासनांचं सुंदर आणि नावीन्यपूर्ण प्रात्यक्षिक 

✪ गटांमधून केलेली आसनं आणि एकमेकांचं कौतुक नमस्कार. 

चालू घडामोडी । जून २०२६ । ज्येष्ठ १९४८

लेखक कांदा लिंबू यांनी सोमवार, 01/06/2026 15:11 या दिवशी प्रकाशित केले.

जून २०२६ च्या चालू घडामोडींसाठी हा नवीन धागा काढत आहे. 
 

थोर गायिका पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांचे वयाच्या ८९व्या वर्षी मुंबई येथे निधन झाले. अवीट गोडीची असंख्य गाणी त्यांनी गायिली आहेत. मराठी, हिंदी, आसामी, कन्नड, बंगाली आणि ओडिया यासह अनेक भाषांमध्ये त्यांनी सिनेमागीते, भक्तिगीते, गझला, ठुमरी इ प्रकारांत गाणी गायिली आहेत.

त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 

"सुमन",सुगंध.....

लेखक कर्नलतपस्वी यांनी सोमवार, 01/06/2026 09:54 या दिवशी प्रकाशित केले.

 

ऐकले किती तरीही, कान माझा अतृप्त आहे,

सुमनांच्या गर्दीतले ते "सुमन", वेगळेच आहे....

 

"निंबोणीच्या झाडा मागे",चंद्र मी ही शोधला होता,

"केतकीच्या बनी मधे" ,नाचरा मोरही ऐकला आहे

 

"उठा उठा चिऊताई ",ऐकून जाग मजला येत होती,

"आली बघ गाई गाई"झोप अंगणात अजुनही येत आहे.

 

सरले लहानपण माझे,"उमलली एक नवी भावना",

"मज नकोत अश्रु घाम हवा",दिला,हाच खरा मंत्र आहे.

 

पिवळी पिवळी हळद लागली","नकळत सारे घडले",

"रे क्षणांच्या संगतीने", किती सांगू,सारे मी ऐकले आहे.

 

दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १६: तोंडी- मल्लिपट्टिणम ७४ किमी

लेखक मार्गी यांनी रविवार, 31/05/2026 21:16 या दिवशी प्रकाशित केले.

✪ समुद्र, नौका आणि मंदिरांच्या प्रदेशातील राईड 

✪ सेतूभावछत्रमच्या ऐवजी मल्लिपट्टिणममध्ये मुक्काम 

✪ दूरच्या देशबांधवांसोबत जवळची भेट 

✪ अभिमन्युजींचे नावेवरचे थरारक अनुभव 

✪ रात्रीचा मल्लिपट्टिणम बंदराचा परिसर 

✪ लाटा, समुद्राची गाज, दूरवरच्या बोटींचे दिवे आणि आकाशातले व्याध- अगस्त्य 

५वे जनरेशन वॉर, बॉट नेटवर्क्स आणि नोएडा हिंसाचार

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 31/05/2026 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
भारत जसजसा आर्थिक आणि सामरिक महाशक्ती बनत आहे, तसतसा प्रस्थापित महाशक्तींना हे सहन होणे कठीण होत आहे. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी आता थेट युद्धाऐवजी 'फिफ्थ जनरेशन वॉरफेअर' (5GW), म्हणजेच डिजिटल, मनोवैज्ञानिक आणि सामाजिक युद्धाचा वापर सुरू झाला आहे. हे युद्ध रणभूमीवर नाही, तर मानवी मनाच्या स्क्रीनवर लढले जाते.

पाभे की बात क्र. ९

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 30/05/2026 22:43 या दिवशी प्रकाशित केले.

पाभे की बात क्र. ९

जनगणना २०२६-२७ साठी सरकारने साहित्य दिलंय ते बघितलं का?

टोपी लहान मुलांच्या डोक्याची, मोठ्या शिक्षकांच्या डोक्यावर बसत नाही. पिशवी पहिल्या दिवशीच चेन तुटते. शार्पनर पेन्सिलला टोक लावायच्या आतच तुटतो. पेन आणि मार्कर उठतच नाहीत.  एरीयाच्या झेरॉक्स एकच मिळेल. आपसात झेरॉक्स करून घ्या. कार्यक्षेत्र २० किमी दूर असेल. दोन क्षेत्र असेल तर त्यात ६, ८ किमी अंतर असेल. सगळं सामान अशा अतिशय उत्कृष्ट दर्जाचं.
----------------------------------------------------------------
मितरों,

“माझ्या प्रिय देशवासीयांनो,

दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १५: मंडपम- तोंडी ८४ किमी

लेखक मार्गी यांनी शनिवार, 30/05/2026 15:23 या दिवशी प्रकाशित केले.

✪ पूर्व किनारी मार्गाने प्रवास 

✪ मध्य तमिळ नाडूमधील गावं 

✪ १५ दिवसांमध्ये १३८० किमी झाले 

✪ त्सुनामीच्या वेळच्या गावांची आठवण 

✪ तमिळ नाडूमध्ये प्रजासत्ताक दिवसाचं वेगळं स्वरूप 

✪ मनाला वर्तमानामध्ये ठेवणं! 

चीन:रेशीमगाठी आणि कषायपेयाचा देश - भाग १

लेखक शेखरमोघे यांनी शनिवार, 30/05/2026 08:15 या दिवशी प्रकाशित केले.
चीन हा देश आपल्या देशासारखाच अनेक हजार वर्षांची परंपरा असलेला देश आहे . एकेकाळी या देशाची ओळख पाश्चिमात्यांना रेशीम आणि कषायपेयाचा (म्हणजेच चहाचा) देश अशी होती. ५०० वर्षांपूर्वीपर्यंत या देशातील रेशीम आणि इतर अनेक पदार्थ वाळवंट, डोंगर, दऱ्या, समुद्र अशा हजारो मैलांचा प्रवास करून युरोप खंडात पोचताना वाटेवरच्या अनेक ठिकाणच्या व्यापाऱ्यांना धनवान करत आणखी  अनेकांनाही  या व्यापारांत हजारभर वर्षे आकर्षित करत होते.