Skip to main content

कधी एकदा...

लेखक वेल्लाभट यांनी रविवार, 26/05/2013 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
मे महिना सरत चाललाय. उन्हाळा जाणवतोय परंतु मधूनच २-४ काळे ढग आकाशात दिसतात. पुढच्या ट्रेक ला लवकरच जायचंय असा दिलासा देऊन जातात. ऑफिसात काम करत असतानाही अचानक राजगडाचा चोर दरवाजा आठवतो, मनातले विचार कीबोर्डपर्यंत पोचतात आणि मग इमेल लिहिताना चुकून 'Dear Rajgad' असं लिहिल्यावर मी जीभ चावतो आणि बॅकस्पेस दाबतो. धीर धर ना राव! असं स्वत:लाच सांगतो. मग फावल्या वेळात फेसबुक वर जाण्याऐवजी ट्रेकवर्णनं वाचतो. ब्लॉग वाचतो. रतनगड, तोरणा, साल्हेर, मुल्हेर, हरिश्चंद्रगड... अशा माझ्यासाठी डिझायर्ड डेस्टिनेशन्स चे फोटो गूगल वर बघून मी इथे असेन तेंव्हा काय करेन, मला काय वाटेल, मी कसा फोटो काढेन..

सत्तेसाठी कायपण

लेखक Bhagwanta Wayal यांनी रविवार, 26/05/2013 19:50 या दिवशी प्रकाशित केले.
दादा कोंडके यांची मनापासुन माफी मागुन... १७/५/२०१३ रोजी गणरायाचरणी मंत्र्याच साकडं ह्या गीतात थोडफार बद्दल करुन व शीर्षक बदलुन पुन्हा प्रकाशीत करीत आहे, तरी सर्व वाचक बंधु-भगिनींनी वाचुन प्रतिक्रिया जरुर कळवाव्यात.(चालः काठी न घोंगड घेऊद्या की र ) शाल आणि श्रीफळ घेऊद्या की र...। मला बी मंत्री होऊ द्या की...॥धॄ॥ मी निवडुन आल्यावर । करेन जनतेचा उध्दार । बंगला बांधीन एक सुंदर । तो तुमच्याच पैशावर । फॉरच्युनर गाडी घेऊ द्या की र...। मला बी मंत्री होऊ द्या की...॥१॥ मग जाईन दिल्लीला । पी.एम्.ला भेटण्याला । मंत्री पद मागण्याला । दिल्या वचना जागण्याला । राजभवनावर शपथ घेऊ द्या की र...। मला बी मंत्र

अंड्याचे फंडे ८ - हरवलेले आवाज

लेखक साळसकर यांनी रविवार, 26/05/2013 19:12 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवसांनी अंड्याचे कॉलेजला जाणे झाले जे तो कधीच मागे सोडून आला होता. होस्टेलला चक्कर मारली पण शुकशुकाट वाटला. बरेच वर्षांनी एखाद्या ओळखीच्या जागी जावे आणि तिथे कोणी आपल्या ओळखीचे दिसू नये की मग एकतर तेथील गजबजाट तरी अंगावर येतो किंवा शुकशुकाट तरी वैताग आणतो. तिथून बाहेर पडलो आणि कॉलेजच्या मुख्य इमारतीकडे वळलो. रात्रीचे साडेदहा वाजले होते. सिनेमा बघून परतत होतो. सोबतीला कॉलेजमधीलच मित्र होते. सारे एकाच कॉलेजचे माजी विद्यार्थी, म्हणून रात्री घरी परतण्याऐवजी कॉलेजलाच मुक्काम टाकून मैहफिल जमवायचा बेत आखला. कॉलेजच्या मुख्य इमारतीचा एक मजला रात्रभर जागत असतो हे सवयीने माहीत होते.

आम्हा घरी धन..

लेखक मोदक यांनी रविवार, 26/05/2013 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
राम्राम मंडळी. खरडफळ्यावर गेले दोन दिवस अनेक जण आपापल्या आवडीच्या कविता देत आहेत.. त्यावरून या धाग्याची कल्पना सुचली. चला.. आपल्याला आवडलेल्या कविता, ओळी, छोटेखानी लेख, वन लाईनर्स, टॅन्जंट्स, सुभाषिते.. अगदी जे जे आवडले आहे ते येथे एकत्र करूया. लेखक आणि पुस्तकाचे नाव द्याच परंतु आवडलेला मजकूर 'का आवडला?' हे ही शक्य असेल तर द्या. मी सुरूवात करतो.. ******************************************************** गोनिदांच्या दुर्गभ्रमणगाथेतून, रायगडावरील आषाढाचे चित्रदर्शी वर्णन... ज्येष्ठ संपतो. आकाश मेघांनी भरभरून येवू लागतं. रायगड ऐन कोकणांत.

एकुलती एक.....

लेखक मृणालिनी यांनी शनिवार, 25/05/2013 21:21 या दिवशी प्रकाशित केले.
जर एखाद्या बिकनी घालणाऱ्या मुलीला नव्वारीत पाहिलं तर कस वाटेल? तसच काहीस होत.... या सिनेमाचे प्रोमो पाहताना जे चित्रपटाबद्दलचे पूर्वग्रह मनात तयार होतात, ते सगळे प्रत्यक्ष चित्रपट पाहताना पुसून जातात. सिनेमाची सुरवातच विमान उडण्यापासून सुरु होते. सचिनची (अरुण देशपांडे) आणि सुप्रियाची (नंदिनी देशपांडे) यांची एकुलती एक कन्या श्रीया (स्वरा) विमानाने मुंबईत तिच्या वडिलांना भेटायला १८ वर्षांनंतर येते. {पार्श्वभूमी : कथेतील अरुण देशपांडे प्ले बॅक सिंगर बनण्याकरता परिवार सोडून मुंबईत येतो. त्याची पत्नी चिडून त्याला डिव्होर्स पेपर्स पाठवते.

माहिती हवी आहे - पुण्यातील आयुर्वेदिक केंद्रे /निष्णात वैद्य

लेखक saishwari यांनी शनिवार, 25/05/2013 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ही माझी मिपावर नवीन सुरुवात अहे. चू. भू. सांभाळून घ्यावी. काही दिवसांपूर्वीचा "आयुर्वेदाला वैज्ञानिक ज्ञानशाखा मानावे का?" या विषयाचा धागा आणि प्रतिक्रिया पहिल्या. मिपावर या विषयाचे बरेच जाणकार आहेत हे पाहून आनंद झाला. म्हणूनच या ज्ञानाचा फायदा मला आणि सर्वाना व्हावा म्हणून हा काकू. माझ्या घरी सर्वांना (मी,बहिण, भाऊ,आई ) संप्रेरक असंतुलनाचा (hormonal imbalance)त्रास आहे असे आढळून आले आहे. याची लक्षणे आम्हा भावंडांमध्ये खूपच समान आहेत जसे कि चेहऱ्यावर पुरळ येणे,केस गळणे,केस अकाली पांढरे होणे,जाडी वाढणे,वारंवार तोंड येणे, चिडचिड होणे, कोणत्याही कामात उत्साह नसणे.

कार्या लयात असताना.... ;)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 25/05/2013 00:37 या दिवशी प्रकाशित केले.
कोणत्याही मंगल कार्यालयात,भटजी म्हणून 'लग्न' लावायला जाणे ही एक आनंद दायक प्रक्रीया असते......पण केंव्हा??? तर भटजी त्याच्या स्वतःच्या यजमानातर्फे जातो तेंव्हा!!! हा एकमेव अपवाद सोडला,....तर .... कार्या लयाचा ''गुरुजी'' म्हणून रहाणे, केटरिंगवाल्याकडून लग्न लावायला जाणे, क्वचितवेळी व्हिडिओ शूटींग वाल्यांकडच्याही(लग्नाच्या ;) ) ''सुपार्‍या'' वाजविणे... असले जे काही ''जॉब-कार्ड'' संस्कृतितले प्रकार आहेत... ते मानवी मनाची कसोटी पाहाणारे असतात.
काव्यरस

चिली ऑनियन चसका

लेखक गौरीबाई गोवेकर यांनी शुक्रवार, 24/05/2013 20:42 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः तांदुळ, काश्मिरी लाल मिरच्या, तिखट लाल मिरच्या (दोन्ही मिरच्या मिळून १०० ग्राम) , मिठ., बारीक चिरलेला कांदा. तीन वाट्या तांदुळ स्वच्छ धुवुन दोन दिवस पाण्यात भिजवून ठेवा. पाणि बदलण्याची गरज नाही. तिसर्‍या दिवशी तांदुळातील पाणी ओतून टाकून तांदूळ बारिक वाटून घ्या. दोन्ही प्रकारच्या मिरच्या पाणी घालून मिक्सरला बारीक वाटून घ्या. आता वाटलेल्या तांदुळात तेवढेच पाणी, चिरलेला कांदा, मिरच्यांची पेस्ट, मिठ (जरा जास्तच) घालून गॅसवर ठेवा. उकड काढतो तसे. मधुन मधुन हलवत रहा पिठाची गुठळी होऊ नये.

इराण्याची हॉटेलं ..........

लेखक १००मित्र यांनी शुक्रवार, 24/05/2013 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
कालच दादर टीटी ला होतो. पाहतो तर काय , तिथल्या [पुणे बस-स्थानकासमोरचं] इराण्याच्या जागेवर चक्क वामन-हरी-पेठे आले. एका कोप~यातलं मराठी उद्योजक [निरुद्योजक] मन सुखावलं-उगाचच. की मराठी माणूस सुद्धा टेक-ओव्हर वगैरे करू शकतो ई.ई. पण विषय तो नाही. त्या-निमित्तानी आठवली - नामषेश होत जाणारी इराणी हॉटेल्स ![वा.ह.पेठेंचं आम्हांस कौतूकच आहे - उगाच त्यांचा राग कशाला ?

एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला !

लेखक जॅक डनियल्स यांनी शुक्रवार, 24/05/2013 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता पर्यंत मला लोकांनी अनेक प्रश्न "साप" या विषयावर विचारले पण सगळ्या लोकांचा आवडता प्रश्न म्हणजे "तू साप कसे काय पकडायला लागलास ?" या प्रश्नाचे उत्तर सुरवातीला मी खूप प्रामाणिक पणे द्यायचो, आणि मला खूप वेळा विचित्र (खवचट!) प्रतिक्रिया मिळायच्या. त्यामुळे नंतर नंतर लोकं बघून मी उत्तरे द्यायला शिकलो.