किल्ले हडसर - सर!
‘तिनशे वर्ष.....’ वाला फेमस डायलॉग माहितीच असेल अनेकांना. अगदी तसंच... ‘तीन महिने’ असं म्हणावंसं झालेलं आम्हाला. पावसाळ्याच्या अखेरीस केलेला रतनगड पचला होता, जिरला होता. आता पुन्हा जायलाच हवं असा निर्धार झाला. दोन दिवसांचा अट्टाहास न करता २०१३ संपायच्या आत एक दिवसाचा ट्रेक तरी मारायचाच म्हणून आम्ही ठिकाणं शोधायला लागलो. घनगड, प्रबळगड, तुंग-तिकोना, असे पर्याय समोर आले. हडसर हा ही एक पर्याय होता. चावंड केला तेंव्हाच हडसर बद्दल वाचलं होतं. कुतुहल तेंव्हापासून होतंच. मग सगळ्यांना तो पर्याय पटला, आवडला.
मिसळपाव
दुसरी घटना इरावती कर्वेंनी “युगान्त” मध्ये सांगितली आहे. मात्र या घटनेकडे लोकांनी द्यावं तसं लक्ष दिलेलं दिसत नाही. “परधर्मो भयावहः” या लेखात त्यांनी द्रोणवधाचा प्रसंग वर्णिताना द्रोण आपला पुत्र अश्वत्थामा मेला हे ऐकुन देखिल शस्त्र खाली ठेवीत नाही हे मुद्दाम नमुद केलं आहे. मात्र जेव्हा भीम त्वेषाने त्याला ही जाणीव करुन देतो कि तो ब्राह्मण असुन लढणे हा त्याचा धर्म नाही. तेव्हा त्याचे धैर्य गळते. या घटनेचा थोड्या तपशीलाने विचार आवश्यक आहे.