Skip to main content

काठी

लेखक शिवोऽहम् यांनी सोमवार, 16/03/2015 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी दिवेलागणीच्या वेळी शीळ घालत अंगणात रिंगणं घालत बसलो होतो. आधी काठीनं टायर पळवत नेत होतो तेव्हा कान धरून अनीलदादानी घरी आणलं. पण एका जागी किती वेळ बसणार? म्हणुन ही रिंगणं. पण त्यातही खुस्पटं काढेलच कोणीतरी! काय तर म्हणे संध्याकाळी शिट्ट्या मारू नका. का? तर ती राक्षसांची वेळ! जणु काही माझी शिट्टी ऐकली की येतात ते लगोलग. काहीही करा, आहेच काहीतरी उपदेश. कडी वाजवु नको-भांडणं होतात, पायावर पाय टाकुन झोपु नको-आईबापाला त्रास होईल, पालथी मांडी घालु नको-काय माहित काय होईल. हे सगळं कसं लक्षात ठेवायचं कुणास ठाउक. वर आजी म्हणते की भांडणं व्हायला कारण स्वभाव आहेत, दुसरं काही नाही.

गर्भपातल्या रानी .....!

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 16/03/2015 09:24 या दिवशी प्रकाशित केले.
गर्भपातल्या रानी .....!

गारपीटीच्या अंगसंगाने
गर्भपातल्या रानी
अश्रू होऊन हवेत विरले
पाटामधले पाणी

एका एका झाडावरती
पक्षी हजारो होते
क्षणात पडले सड्याप्रमाणे
सरली सारी कहाणी

हातामधला हात सुटूनी
घरटे विच्छिन्न झाले
बुंध्याभवती जमीन नहाली
रक्ताळल्या पिलांनी

ऊस झोपला, कापूस निजला
खुरटून गेल्या बागा
जगण्या-मरण्यामधले अंतर
उरले नसल्यावाणी

शाबूत उरल्या धान्यवखारी
बंगले, महालमाडया

लयास गेले कधीच ते -

लेखक विदेश यांनी सोमवार, 16/03/2015 09:00 या दिवशी प्रकाशित केले.
लयास गेले कधीच ते रामराज्य ह्या भूमीवरचे आता इथल्या रामातही काही उरला नाही राम .. रावण पैदा झाले इथे सीताही जिकडे तिकडे वानरसेना बहुत जाहली म्हणती न कुणि राम राम .. संकटात जरि असते सीता मदतीला कुणि धावत नाही आता इथल्या सीतेलाही शोधत नाही कुठला राम .. महिमा कलीयुगाचा ऐसा मिळून राहती रावण राम सीता रडते धाय मोकलुन झाले सगळे नमक हराम .. .

'च', 'ज' चा उच्चार

लेखक लई भारी यांनी सोमवार, 16/03/2015 08:18 या दिवशी प्रकाशित केले.
'च' या वर्णाचा उच्चार दोन प्रकारे केला जातो. जसे 'चव', 'चौकशी' इ. मध्ये किंवा 'वाचन', 'चहा' यामध्ये 'च्य' सारखा. चमचा चा उचार दोन्ही साधे 'च' प्रमाणे करत आलोय, पण काही ठिकाणी विशेषतः बोलीभाषेत 'चमच्या' किंवा प्रमाण भाषेत सुद्धा 'चमच्याने' असे ऐकले आहे. तसेच 'ज' चे देखील दिसते. उदा. जवस/जनता, यासाठी काही नियम आहे का? शालेय जीवनात असे काही शिकवले असल्यास निश्चित दुर्लक्ष झाले आहे :) जाणकारांनी प्रकाश टाकावा.

सोनुलं

लेखक ऊध्दव गावंडे यांनी रविवार, 15/03/2015 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
कायं झालं कसं झालं नाई काईचं कयलं, उभ्या पिकाचं वावरं यकायकी उलंगलं १ आता लोकं डोयापुळे होतं चांदनं खेयतं, यकायकी कुठूनं हा आला अंधार पयतं २ रेती थापटूनं खोपे किती पायावरं केले, पायं काळतां भाईरं सारे खचूनचं गेले ३ मनातले मांडे सारे मनातचं रायले , पोटरकी धांडे नाई ते नाईचं निसयले ४ झाळं पळलं वार्यातं आता कुठची सावली, गेला उळूनं सोनुला रडं रडली माऊली ५

कधीही वाजणारे डी.जे. एक डोकेदुखी.......

लेखक चेतन677 यांनी रविवार, 15/03/2015 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
आज रविवार असल्याने सहज बाहेर फेरफटका मारायला चाललो होतो.तर अचानक डी.जे. चा कर्णकर्कश आवाज ऐकु आला.विचार केला की आज काही दसरा दिवाळी नाही,ना कुणाची जयंती वा पुण्यतीथी...मग कळाले की कुणाचा तरी मुलाचा पहिला वाढदिवस होता. खरंच आज काहीही झाले तरी डी.जे. लागतोच का??? ज्या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी गणपती बसवुन गणपती जन्मोत्सव साजरा करायला सांगितला तो उद्देश खरंच सफल झालाय क?? अशा सणांच्या वेळी गणपतीचे गाणे लावण्याऐवजी चिपकादे फेविकॉलसे" यासारखे गीत वाजवले जाते.डॉ.बाबासहेब आंबेडकर हे एक थोर पुरुष होते.परंतु त्यांच्या जयंतीच्या वेळी असाच डी.जे.

दोन वात्रटिका (मार्च १५)

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 15/03/2015 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
झाडूने स्वच्छ केला कचरा कमळ फुलांचा स्वच्छता अभियानाचा राजा तोच ठरला. फ्रीची वीज फ्रीचे पाणी. रात्र अंधारी घाघर रिकामी. (मी जिथे राहतो त्या गल्लीत पाणी येत नाही, पुढील ५ वर्षे पाणी येण्याची संभावना ही नाही- कारण पाणी देण्याचा वादा केलेला नाही -२.५० कोटीच्या दिल्लीत १ कोटी लोकांच्या घरी पाणी येत नाही, अर्थातच पाणी मिळाले तरी लोकांच्या घरी पोहचवता येणार नाही या साठी जवळपास पूर्ण यंत्रणा दुरुस्त करावी लागेल किंवा नवीन यंत्रणा उभारावी लागेल अंदाचे दहा बारा हजार कोटी खर्च येईल.

मेथी उडीद वड्यांची भाजी

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 15/03/2015 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
मेथी उडीद वड्यांची भाजी हे नाव ऐकून काही विचित्र वाटेल, पण आज सकाळी हीच सौच्या कृपेने खायला मिळाली. अत्यंत स्वादिष्ट लागल्यामुळे ही कृती इथे देत आहे. कालपासून दिल्लीत थांबून थांबून पाऊस पडत आहे. १५ मार्च झाला तरी रात्री रजई अंगावर घ्यावी लागते आहे. सकाळी ढगाळ वातावरण होते. सौ. मेथी निवडत होती. मी म्हणालो, चार पाच दिवसांपासून, रोज रोज तेच तेच गाजर-मटार, फुलगोबी, वांगे (घ्या मौसमात या भाज्या स्वस्त मिळतात) खाऊन कंटाळळो आहे. सुक्या बनविता येत असल्यामुळे, ऑफिसच्या डब्यात ह्याच भाज्या खायला मिळतात.

लाल कौलांचं गाव!

लेखक स्वाती दिनेश यांनी रविवार, 15/03/2015 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
अशाच एका मोठ्या विकांताला बॅगपॅक भरुन गाडीत टाकले आणि लाँग ड्राइव्हवर जायचा विचार केला. रस्ता नेईल तिथे जायचे अशा विचाराने ए ३ ह्या ऑटोबानला (फ्रीवे) ला लागलो आणि एकदम लक्षात आलं आपल्याला रोथेनबुर्गला जाता येईल की.. आता तुम्ही म्हणाल हे कोणत गाव? तर फ्रांकफुर्ट पासून साधारण १८० किमीवर ताउबर नदीवर वसलेलं हे गाव म्हणजेच रोमँटिक रोडवरचा एक थांबा रोथेनबुर्ग! जेव्हा फ्रांकफुर्ट आणि बर्लिन जर्मनीच्या नकाशावरचे ठिपके होते तेव्हा रोथेनबुर्ग मात्र नावारुपाला आलेलं एक स्वतंत्र संस्थान होतं आणि आजही मध्ययुगातला इतिहास जपून ठेवलेलं टूरिस्टांसाठी पर्वणीच असलेलं एक महत्त्वाचं गाव आहे.

पहिले शेतकरी साहित्य संमेलन : दुसरा दिवस - वृत्तांत

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 15/03/2015 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
पहिले शेतकरी साहित्य संमेलन : दुसरा दिवस - वृत्तांत

शेती साहित्य आणि पत्रकारिता – परिसंवादाचा वृत्तांत 
(वृत्तसंस्थांच्या सौजन्याने)

महात्मा फ़ुले साहित्य नगरी, वर्धा दिनांक ०१/०३/२०१५