Skip to main content

पुडुचेरी: अरविंद, योग आणि समुद्र

लेखक मित्रहो यांनी गुरुवार, 01/10/2015 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
योगी अरविंद किंवा श्री अरबिंदो यांनी स्वतःविषयी म्हटले होते “मी आधी कवि आहे, नंतर क्रांतीकारी आणि मग योगी” (Spiritual Leader). आज जगाला त्यांची ओळख मात्र उलट आहे. आज पाँडिचेरी किंवा पुडुचेरी म्हटले की डोक्यात येतो तो अरविंदांचा आश्रम. शालेय इतिहासात वाचलेले क्रांतीकारी अरविंद घोष म्हणजेच योगी अरविंद हे कित्येकांना माहीती नसते. निदान मला तरी बरीच वर्षे हे माहीत नव्हते. अलीपूर बॉम्ब केसमधे इंग्रजांनी अरविंद घोष यांच्यावर खटला भरला. चित्तरंजन दास मग अरविंदांच्या मदतीस धावले आणि त्यांची आरोपातून मुक्तता केली. या काळात जेलमधे असताना त्यांना काही आध्यात्मिक अनुभव आले.

साखरचौथीचा गणपती

लेखक जागु यांनी गुरुवार, 01/10/2015 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
भाद्रपद महिना म्हणजे गणेशोत्सवाचा जल्लोष! या दिवसांत बाजारपेठांतील गल्ली अन गल्ली मंगलमय रूप धारण करते. जिकडे तिकडे अत्तर, उदबत्त्यांचा सुगंध, फळांच्या गाड्यांवर फळांच्या सुबक राशी, फुलमार्केटमध्ये सजावटीची फुले, कंठ्या नी दूर्वा, सुगंधी फुलांनी मार्केट इतके मंगलमय झालेले असते की तिथून पाय पुढे निघत नाहीत. काही सजावटीची दुकाने तोरण, माळांनी घरा-घरांतील गणेशाचे स्वागत करायला सज्ज झालेली असतात. हलवायांच्या दुकानांत मोदकांच्या सुबक राशी रचल्या जातात. सीडींची दुकाने गणेश भक्तीच्या गीतांनी सुरेल झालेली असतात. गणपतीच्या आगमनापूर्वीचे दोन दिवस तर बाजारपेठ तुडुंब भरलेली असते.

औंध कास भटकंती-भाग १

लेखक अजया यांनी गुरुवार, 01/10/2015 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
गणपतीबाप्पा त्यांच्या घरी परतले आणि आम्हाला भटकंतीची ठिकाणं खुणावायला लागली. मात्र दिवसाचे गणित काही जुळेना.मला क्लिनिक एक दिवसावर बंद करणे अशक्य होते.मग रविवार सोमवार कुठेतरी जायचंच ठरवलं.नेमकं तेव्हाच पेपरमध्ये कासचे फोटो येऊ लागले.गणपतीच्या दिवसात जो थोडाफार पाऊस झाला त्यानंतर फुललेले पठार.ते बघून कासला जाण्याचे निश्चित केले.रविवारी कास टाळायचे होते.

दिवाकरांच्या नाट्यछटा

लेखक खेडूत यांनी बुधवार, 30/09/2015 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
रामराम मंडळी! शतशब्दकथा लिहून आणि वाचून आपणा सर्वांना भरपूर विरंगुळा मिळाला असेल.असाच काहीसा, पण शब्दमर्यादा नसलेला, मराठी साहित्यातला एक वेगळा अन जुना प्रकार म्हणजे दिवाकरांच्या नाट्यछटा. का कोणास ठाऊक, पण शतशब्दकथा आणि नाट्यछटा यांच्यात काहीतरी नातं- साम्य तरी आहे असं नेहमी वाटतं . मागे २०१२ मधे पुण्याला सकाळ वृत्तपत्रातर्फे मुले आणि मोठ्यांसाठी एक नाट्यछटा स्पर्धा घेण्यात आली. त्यात दिवाकर यांच्या मूळ आणि काही नव्या लेखकांच्या नाट्यछटा सहभागी झाल्या होत्या. हे अन्य लेखक प्रसिद्ध नसल्याने असेल, पण मोठ्या संख्येने सहभाग असूनही त्या नाट्यछटा वाचकांपर्यंत पोहोचल्याच नाहीत.

ओलसर भिंतिंच माजघर

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 30/09/2015 21:35 या दिवशी प्रकाशित केले.
ओलसर भिंतिंच माजघर खांबास टेकुन ति बसलेली कंदिलाच्या धुरकट प्रकाशात काय शोधतेस समोरच्या पत्रांत?? कसा शोधते गंध त्या निर्माल्यात?? झाडावर पिंगळ्याच्या चालल्या गप्पा, तु तशाच ऎकत रहाणार.. अन सकाळपासुन परत वाट पहात रहाणार.. त्याच्या न येणा~या पत्राची,,

कालचक्र

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 30/09/2015 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
कोण्या एका काळी एका दुरदेशी एक महान तपस्वी एका निबिड अरण्यात एकाकी भटकत होता. त्याची गृहस्थी सर्वदुर प्रदेशात एका कुटित आपल्या मुलांना घेऊन त्याची वाट पाहत अश्रुंचे ताटवे फुलवत राहीली. दऱ्या डोंगरे चिखल दलदल आणि ऊष्ण वाळवंट तुडवणारा तपस्वी आता या दिशाहीन प्रवासाला थकला होता. एके दिवशी एका चवदार तळयाकाठी त्याला एक बंदिस्त शुभ्र मडके सापडले. वैफल्याने ग्रासलेल्या आपल्या मळकट झोळीत त्याने ते ठेऊन दिले. एका अवाढव्य शिळेवर चढुन त्याने ते खोलुन पाहिले.

अन्नदाता सुखी भव भाग ४ - वृक्ष वल्ली आम्हा सोयरीं

लेखक शेखरमोघे यांनी बुधवार, 30/09/2015 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीचे संबंधित लेखन भाग १: http://www.misalpav.com/node/32554 भाग २: http://www.misalpav.com/node/32709 भाग ३: http://misalpav.com/node/32801 आपण पाहिलं की नॉर्मन देव वगैरेनी शेतातल्या पिकांनांच जास्त तगडं बनवलं आणि त्यामुळे शेतकऱ्याला साधारणतः तेव्हढ्याच जमिनीत, तेव्हढ्याच पाण्यांत आणि तेव्हढ्याच प्रयत्नांत (पण जास्तीचे खत वापरायला लागून) अनेक पटीने जास्त धान्य मिळू लागले.

कुमाऊं – कौसानी-रानीखेत

लेखक के.के. यांनी बुधवार, 30/09/2015 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
=============================== भाग १ - भाग २ - भाग ३ - भाग ४ - भाग ५ - भाग ६ =============================== कुमाऊं – कौसानी-रानीखेत मुन्स्यारीचे दोन दिवस मस्तच गेले. इथुन पुढे आम्ही कौसानीला जाणार होतो.

कुल्यार जांय...

लेखक माधुरी विनायक यांनी बुधवार, 30/09/2015 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
माझं गाव कोकणात. तसं गोव्यापासूनही जवळ. म्हणजे आमच्या घरापासून साधारण अर्धा तास चालत जायच्या अंतरावर तेरेखोलची खाडी आणि तिच्या पल्याड गोवा. सहज पोहत जाण्याजोगं अंतर. मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही गावी गेलो की बाबा पेडण्याच्या बाजाराला चालत जायचे. आमचे वाडीतले इतर कार्यक्रम ठरलेले असायचे, त्यामुळे त्यांच्यासोबत बाजारात जायचं फार अप्रुप नव्हतं. पण बाजारातून आणलेल्या कांदा भज्यांचं आकर्षण होतं. त्याचबरोबर मोठ्या बांगड्यांसारख्या गोल आकाराचे पाव मिळायचे. बांगड्या म्हणजे काकणं, म्हणून पावाच्या त्या प्रकाराचं नाव 'काकना'.

एक होती मुंबई.. ("Mumbai Fables")

लेखक चलत मुसाफिर यांनी बुधवार, 30/09/2015 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
पोर्तुगीज व्यापारी लोकांची भारताला सर्वात मोठी देणगी म्हणजे त्यांनी मुंबई शहराचा पाया रचला. ते मुळात सक्तीने धर्मप्रसार करायला आले होते. १५०९ साली फ्रान्सिस्को अल्मेडाने मुंबई बेटावर पहिली धाड घातली आणि स्थानिक लोकांना लुटले. अनेकांना जबरदस्तीने किरिस्तांव केले. पुढे अशाच धाडी पडत गेल्या आणि १५३२ साली नुनो डाकुन्हाने गुजरातच्या सुलतानाला हरवून वसई काबीज केली. मुंबईची सुरुवात ही अशी झाली. अमेरिकावासी लेखक ज्ञानप्रकाश यांनी लिहिलेले "Mumbai Fables" हे पुस्तक मायानगरी मुंबईच्या आजपर्यंतच्या प्रवासाचा वेध घेते. इतिहासही किती रोचक, रोमहर्षक आणि वाचनीय असू शकतो याचा धडा म्हणजे हे पुस्तक.