Skip to main content

चल कही दूर निकल जाये....( १)

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 27/07/2026 14:22 या दिवशी प्रकाशित केले.

हॅट साला. फ्लाईट रूट्स पण कसल्या अडनिडी असतात ना.  तरी बरंय या वेळेला एकच हॉल्ट आहे. डेट्रॉईट ते पॅरिस आणि तेथून थेट मुंबई. गेल्या वेळेला गेलो भारतात  सगळा उलटा द्रविडी प्राणायाम करत...  हेलिफॅक्स ते बोस्टन. तेथे एअरपोर्ट बदलायचे  तेथून  दुबई तेथे नऊ तास वेळ काढत मग मुंबई. प्रवासाचा सगळा चार्मच निघून जातो या असल्या रगाड्यात. 

जेन झी आणि पुढील राजकारणाची दिशा (कि दशा?)

लेखक कानडाऊ योगेशु यांनी सोमवार, 27/07/2026 10:14 या दिवशी प्रकाशित केले.

सध्या केवळ भारतात नाही तर एकुण जगातच जेन-झी हा प्रकार धुमाकुळ घालतोय. श्रीलंका,नेपाळ व बांग्लादेशामध्ये त्यांच्यामुळे सत्तापालट ही झालेला बघितला. 

भारतात पण गेले काही दिवस हीच मंडळी वर्तमान पत्राच्या पहिल्यापानावर होती.सत्तरच्या दशकात जन्मलेल्या मला हा प्रकार अचंबित करणारा होता. त्यामुळे जेन-झी हा शब्द अग्रस्थानी (फोरफ्रंट) वर येण्याची कारणांबद्दल विचार करत होतो. नेट वर गुगल केले असता पुढील माहीती मिळाली.

मुंबई निसर्ग निर्मित नाही!

लेखक मार्गी यांनी रविवार, 26/07/2026 18:39 या दिवशी प्रकाशित केले.

✪ कोळी व आगरी वस्ती असलेला ७ बेटांचा समूह 

✪ हॉर्नबी वेलार्ड प्रोजेक्टअंतर्गत पुलांद्वारे सर्व बेटं जोडली गेली 

✪ वाळूचे भराव, बांध व तटबंद्यांद्वारे समुद्राचं पाणी अडवलं गेलं 

✪ १७८३ मधील प्रकल्पानंतर १८५० च्या सुमारास मुंबईला एकसंघ रूप 

✪ वाळू आणि पाणथळ जमिनीवर मुंबई उभी! 

✪ मुंबईचा खरा सत्ताधीश समुद्रच! नमस्कार. 

मुंबईत बस सेवेची 100 वर्षे 🚍🚍

लेखक साहित्ययात्री यांनी रविवार, 26/07/2026 03:02 या दिवशी प्रकाशित केले.

मुंबईतील मोटारीकृत बस वाहतुकीची १०० वर्षांची यशस्वी वाटचाल

मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. या महानगराच्या विकासामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा मोठा वाटा आहे. त्यामध्ये मोटारीकृत बस वाहतूक ही सर्वसामान्य नागरिकांची जीवनवाहिनी ठरली आहे. १५ जुलै १९२६ रोजी मुंबईमध्ये मोटारीकृत बस सेवेची सुरुवात झाली.  या सेवेला आता १०० वर्षे पूर्ण झाली असून हा प्रवास केवळ वाहतुकीचा नसून मुंबईच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकासाचाही साक्षीदार आहे.

एक तारा जन्मला!

लेखक निनाद यांनी शुक्रवार, 24/07/2026 15:34 या दिवशी प्रकाशित केले.

भारतीय रेल्वेच्या अधिकृत लोगोचा पुनर्जन्म होऊन त्यावर अजून एक तारा अवतरला आहे.

भारतीय रेल्वेच्या अधिकृत लाल-पांढऱ्या लोगोभोवती असलेले तारे लक्षपूर्वक पाहिले तर आजवर या लोगोमध्ये १७ तारे होते, परंतु आता तिथे १८ वा तारा समाविष्ट करण्यात आला आहे. हा केवळ डिझाइनमधील बदल नसून, भारतीय रेल्वेच्या प्रशासकीय आणि तांत्रिक व्यवस्थेतील एका नव्या अध्यायाची सुरुवात आहे.

पुनर्जन्म नाट्य सिद्धांत (भाग 2)

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 24/07/2026 13:50 या दिवशी प्रकाशित केले.

पुनर्जन्म नाट्य सिद्धांत (भाग 2) 

भगवान श्रीकृष्णांनी भगवदगीतेत सांगितले आहे “प्रत्येकाने आपापले कर्म करावे.” अगदी रावणालादेखील एक कर्म आखून दिले होते. विलनचे. ते त्याने उत्तम निभावले.

गाथा भारतीय रेडिओची - 100 वर्षपूर्ती विशेष 📻

लेखक साहित्ययात्री यांनी गुरुवार, 23/07/2026 19:21 या दिवशी प्रकाशित केले.

 

" नमस्कार, हे आकाशवाणीचे मुंबई केंद्र आहे. संध्याकाळचे सात वाजले आहेत. आपण ऐकत आहोत प्रादेशिक बातम्या " 
हा आवाज गेले कित्येक वर्षे तमाम भारतीयांच्या कानात भरून राहिला आहे. 
विविध भाषांमध्ये बोलीभाषांमध्ये प्रसारित केलेल्या बातम्या, विविध संगीताचे कार्यक्रम, ध्वनिमुद्रित केलेली नाटके, चित्रपटगीते ह्यांनी असंख्य भारतीय लोकांचे मनोरंजन केले आहे. शिवाय चक्रीवादळे, 2004 साली आलेली भयंकर सुनामी अश्या संकटाच्या वेळी लाखो  भारतीयांपर्यंत वेळेवर संदेश पोचवला आहे. अश्या त्या आकाशवाणी चा आज 100वा वाढदिवस!