Skip to main content

कथुकल्या ७

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी शनिवार, 13/05/2017 13:57 या दिवशी प्रकाशित केले.
१ . मायावी माझ्या स्वागताला ना पाचूंनी मढलेला दरवाजा होता, ना हिरेमाणकांसारख्या लखलखणाऱ्या अप्सरा. ज्या दगडी दरवाजातून मी आत आलो होतो त्यावरून स्पष्ट होत होतं की ही गुहा आहे. चारीबाजूंनी काळ्याशार, उंचच उंच दगडी भिंती होत्या. गुहा निर्जीव नसून जिवंत आहे अशी अनुभूती होत होती. कुबट, कोंदट वासाने जेरीस आणलं होतं. मला माहीत होतं की मी कुठे आलोय. तेच ठिकाण ज्याला जगातले सगळ्या धर्माचे लोक घाबरतात. ज्याच्या भितीमुळे बऱ्याच श्रद्धा आणि अंधश्रद्धांचा जन्म झालाय. नक्कीच मी नरकात आलो होतो.

सदाभाऊ

लेखक Vinayak sable यांनी शुक्रवार, 12/05/2017 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
एकेकाळी शेतकऱ्यांसाठी जीवाचं रान करणारे सदाभाऊ आज स्वतः सत्ताधारी विशेष म्हणजे कृषिमंत्री झाल्यावर त्यांच्या भूमिकेत झालेला बदल कवी व वक्ते जगदिश ओहोळ यांनी त्यांच्या *सदाभाऊंचा ऊर* या कवितेतून नेमकेपणाने मांडला आहे. शेतकऱ्याचा जीव घेतेय त्यानेच पिकवलेली तूर आता भरून कसा येत नाही शेतकऱ्यांसाठी सदाभाऊ चा ऊर गोडी लागली सत्तेची वारं लागलं AC चं अन चळवळ झाली दूर आता भरून कसा येत नाही शेतकऱ्यांसाठी सदाभाऊ चा ऊर भावनिक बोलून गाजवायचे सभा अन अश्रूंचा त्यांच्या सभेत वाहायचा पूर आता भरून कसा येत नाही शेतकऱ्यांसाठी सदाभाऊ चा ऊर मातीची नाळ तुटली की माणूस माणसातनं उठतो शेतकऱ्यांतला पांडुरंग त्याला लाल

शाळा- मंतरलेले दिवस

लेखक योगेश आलेकरी यांनी शुक्रवार, 12/05/2017 16:37 या दिवशी प्रकाशित केले.

शाळा- मंतरलेले दिवस

स्वप्नवत विद्यालयाचे प्रवेशद्वार a शालेय जीवन म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक हळवं पान असतं तर काहींच्या आयुष्यातील एक भळभळती जखम. स्वछंदी असे ते जीवन संपवून आपण कधी जबाबदार होऊन जातो कळतच नाही..असच २००६ मधील एप्रिल महिन्यात माझं बालपण संपत होतं.

हंपी: दिवस पहिला- राजवाडा परिसर- भाग २

लेखक प्रचेतस यांनी शुक्रवार, 12/05/2017 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
हंपी: दिवस पहिला- चंद्रशेखर आणि सरस्वती मंदिरं - भाग १ सरस्वती मंदिरापासून एक कच्चा रस्ता जातो तो राजवाडा परिसराकडे. तसं बघायला गेलं तर चंद्रशेखर मंदिर आणि सरस्वती मंदिर राजवाड्याच्या परिसरातच येतात पण तुलनेने ते तेथून काहीसे लांब आहेत. राजवाडा परिसर (Royal enclosure) हे विजयनगरच्या राजवटीचे केंद्र. चहूबाजूंनी तटांनी वेढलेलं, विजयनगरची बहुतांश संपत्ती येथेच एकवटलेली, विजयनगरच्या बहुतांश शासकीय इमारती देखील येथेच. विजयनगरचं एक सर्वांगसुंदर मंदिरही ह्याच परिसरात, आजही कर्नाटकात महत्वाचा समजला जाणारा दसरा उत्सव होई तो इथेच.

इमान....भाग २

लेखक चिनार यांनी शुक्रवार, 12/05/2017 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्या भागाची लिंक http://www.misalpav.com/node/39750 इकडं गब्ब्यांन पैश्याची जुळवाजुळव सुरु केलती. इमानात बसाची त्याची लय इच्छा व्हती. त्यानं बायकोला न सांगता गावच्या बँकेत एक खातं ओपन केलंत. जमनं तसे पैसे टाकत जाय तो त्याच्यात. गब्ब्यांन गपचिप जाऊन पैसे काढून आनले. अन तिकडं बबन्यानं तिकीटाची जुगाडबाजी चालू केली. बबन्या एक नंबरचा फकाल्या मानुस. त्येच्या पोटात काही रायते का? अन तसपनं खेड्यात कोनती गोष्ट लपून रायते ? येक दिवस बबन्यानं गब्ब्याच्या हातात तिकीट टिकवलं... "घे बे सायच्या.जमवला तुया जुगाड" "काय सांगतं? येक नंबर काम झालं ना हे.

घरात बनू शकणारी नैसर्गिक खते "जीवामृत आणि अमृतपाणी"

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 12/05/2017 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
शेती करायचे ठरवल्या नंतर माहिती गोळा करायला सुरुवात केली.एक शेतकरी भगिनीने, "श्री.सुभाष पाळेकर" ह्यांचा उल्लेख केला.यु-ट्युब वरील त्यांचे व्हिडिओ पाहता पाहता, सहजच जीवामृत बघण्यात आले. पुढे ज्यावेळी सी.आर.टी. तंत्रज्ञाचे जनक श्री. चंद्रशेखर भडसावळे ह्यांची गाठ त्यावेळी, त्यांनी सांगीतले की, ज्या शेतात बॅक्टेरिया जास्त त्या शेतात काहीही पिकवा. जीवामृताचे व्हिडिओ बघतांना पण हेच जाणवले की, शेतात बॅक्टेरियांची उपज वाढवायला ह्याच उपयोग होतो आणि मग मी बघीतलेले व्हिडिओ आणि माझी संकल्पना ह्याची सांगड घालून माझे मी प्रमाण ठरवले. ते खालील प्रमाणे. साहित्य. १.

अनवट किल्ले ७: वज्रेश्वरीचा शेजारी , गुमतारा (Gumtara )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 12/05/2017 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवड्यात आपण तुंगारेश्वराच्या जंगलातला कामणदुर्ग पाहिला. याच डोंगररांगेला संमातर असणार्या रांगेत असाच एक टोलेजंगी शिखरावर वसविलेला किल्ला आहे, "गुमतारा किंवा गोतारा". या डोंगराच्या उत्तरेला, वज्रेश्वरी आणि गणेशपुरी अशी सुप्रसिध्द पर्यटन स्थळे असूनही हा किल्ला तसा दुर्लक्षितच आहे. अगदी क्वचितच ट्रेकर्सची पावले इकडे वळतात. गुमतारा असे काहीसे गुढ नाव असलेल्या हा किल्ला इतिहासाबाबतही मुग्ध आहे. हा किल्ला कोणी बांधला हे ज्ञात नाही. या किल्ल्याच्या परिसराचा प्रथम उल्लेख इ.स.१६८९ मध्ये आढळतो.

मिरची लागवड

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 12/05/2017 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याकडे एक म्हण आहे,"मीठ-मिरचीला महाग नाही" किंवा "माझी मीठ-मिरची मी कशीही कमवीन." मीठा नंतर आपल्या घरात "मिरची"ला स्थान आहे, हे त्रिकालाबाधित सत्य. परंतू, मी जेंव्हा शेती हाच व्यवसाय म्हणून स्वीकाराचे ठरवले त्यावेळी "मिरची" डोळ्यासमोर न्हवती. जालावर जास्त आत-बट्ट्याची न ठरणारी पिके कोणती? ह्याचा अंदाज घेत असतांना "मिरची" ह्या पिकाविषयी माहिती मिळाली. जमीन : मिरचीला कुठलीही जमीन चालते.दगड आणि वीट, सोडून मिरची कुठेही येते. पाणी : मिरचीला सुरुवातीला, म्हणजे रोपे तयार करतांना रोज संध्याकाळी पाणी द्यावे लागते.

झटपट ढोकळा

लेखक सविता००१ यांनी शुक्रवार, 12/05/2017 08:20 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्य: १ कप बेसन, २ टीस्पून रवा, १ टीस्पून तेल, ४ टीस्पून साखर, १/२ टीस्पून मीठ, १/४ जरूरेनुसार पाणी.टीस्पून सायट्रिक अ‍ॅसिड, १ रेग्युलर इनो सॅशे, आवश्यकतेनुसार पाणी. फोडणी साठी - तेल, मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि नंतर वरून घालण्यासाठी १ चमचा साखर ३ चमचे पाण्यात विरघळवून.बारीक चिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी. कृती: सगळ्यात आधी कुकर पाणी घालून गॅसवर मोठ्या आचेवर ठेवा. कुकरच्या एका भांड्याला थोडसं तेल लावून घ्या.

कसे या मनाला कसे जोजवावे?

लेखक सत्यजित... यांनी शुक्रवार, 12/05/2017 03:45 या दिवशी प्रकाशित केले.
कसे या मनाला कसे जोजवावे? जरा दुःखही शांत व्हावे,निजावे! कुठे भागते आपलेही खरेतर? सुखांनी सुखांना कितीदा गुणावे! किनारा कधी सांगतो का कुणाला? किती सागराने दिले हेलकावे!
काव्यरस