Skip to main content

ठिपक्यांची मनोली (मुनिया) आणि माळमुनिया

लेखक सानझरी यांनी शनिवार, 22/07/2017 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो! मागच्या वर्षी मी मुनिया वर एक लेख टाकला होता. या वर्षी ठिपक्यांच्या मनोली सोबत माळमुनियाही येत आहेत. माळमुनिया (Silverbill) पक्षी मुनियाच्याच जातीचा पण रंगाने वेगळा. याच्या पोटावर मुनियासरखे ठिपके नसतात, तर याच्या शेपटीवर एक मोठा पांढरा ठिपका आसतो. ज्यामुळे व्हिडीओत याला पटकन ओळखायला सोप्पं जाईल. याचे २ फोटोही खाली देत अहे. मुनियांना त्यांच्या आवाजासाठी पाळल्या जायचे. मुनियांचा नाजूक घुंगरां सारखा मंजुळ आवाज बर्‍याच लोकांना ऐकायचा होता म्हणून यावर्षी (महत्प्रयासाने) मुनियाचा व्हिडीओ काढला. तो व्हिडीओ इथे देत आहे.

अंदाज अपना अपना....

लेखक सरनौबत यांनी शनिवार, 22/07/2017 08:32 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाळ्याच्या काळात हवामान खात्यातील कर्मचारी दिवसभर पावसाचे अंदाज वर्तवून कामकाज आटोपून घराकडे निघतात. निघताना कार्यालयातील सुरक्षा कर्मचारी आणि सेवकांना बजावतात,‘रात्री दारं खिडक्या नीट लावून घ्या. पावसाचं काही खरं नाही, कधीही येऊ शकतो!’. सतत चुकणाऱ्या अंदाजांमुळे हवामान विभाग हा एक विनोदाचा विषय बनून राहिलाय. हवामानाच्या अंदाजाची सतत थट्टा होऊ नये म्हणून आता हवामान खातं वाऱ्यानुसार दिशा बदलतं. अधून-मधून जरा सावध पवित्रा घेतात. दर वर्षी ‘१० जून ला पावसाचे आगमन होण्याची शक्यता’ म्हणायचं. नाही आला तर ‘उशीरा चालू होईल’ सांगायचं.

दिव्याची आवस

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 22/07/2017 01:19 या दिवशी प्रकाशित केले.
दिव्यांची आवस आपण ज्याला 'गटारी अमावस्या' म्हणतो ती खर तर 'दिव्याची आवस' किंवा 'दर्श अमावस्या' आहे. दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिन्याला सुरवात होते. आपल्यला श्रावणात उपवास करायचे असतात; नॉनवेज आणि दारू याला हात लावायचा नसतो; अस मानलं जातं. अलीकडे मात्र कितीजण हे पाळतात कोण जाणे. पण गटारी अमावास्या मात्र अनेकजण साजरी करतात. आठवडा-पंधरा दिवस अगोदरच आपल्याला whatsaap वर यासंदर्भातले जोक्स यायला लागतात. आपण ते कधी वाचतो... कधी दुर्लक्ष करतो. पण 'गटारी अमावस्या' याव्यतिरिक्त या दिवसाचे काही महत्व आहे हे आपल्याला माहित नाही आणि सहसा कोणी माहित करून घ्यायचा प्रयत्न देखील करत नाही.

"ती सध्या कुठे सापडेल"

लेखक Swapnaa यांनी शुक्रवार, 21/07/2017 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
"ती सध्या कुठे सापडेल" ~~~~~~~~~~*****~~~~~~~~~~ ती अडथळ्यांमध्ये मार्ग काढताना सापडेल, ती परीक्षां जोमाने देताना सापडेल, ती प्रसंगांना तोंड देताना सापडेल, ती सगळ्यांसाठी दाणापाणी मिळवताना सापडेल, ती घरच्यांमध्ये रमताना सापडेल, ती निस्वार्थ हसताना सापडेल, ती मैत्री निभवतांना सापडेल, ती निसर्गचित्र टिपताना सापडेल, ती कला कौश्यल्यात भरारी घेताना सापडेल, ती लिखाणातून व्यक्त होताना सापडेल, ती पशु,प्राण्यांना
काव्यरस

कधी मध्यम,कधी पंचम...

लेखक सत्यजित... यांनी शुक्रवार, 21/07/2017 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
कधी मध्यम कधी पंचम,सुरांचा साज अलबेला किती समतोल आहे हा,तुझा अंदाज अलबेला! मनाचा वेगही अाता अनावर वाढला आहे मला हाकारतो आहे तुझा आवाज अलबेला! असे भरतेस काजळ तू तुझ्या डोळ्यांत बंगाली निशाणा बांधतो कोणी निशाणेबाज अलबेला!
काव्यरस

दिड शतकी सायकल सफर २०जुले२०१७

लेखक भ ट क्या खे ड वा ला यांनी शुक्रवार, 21/07/2017 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
दीड शतकी सायकल सफर २०जुले२०१७ मागच्या महड सायकल सफरीच्या वेळी जुन्या मुंबई पुणे रस्त्याने जात असता खालापूर पाली असा एक फलक पाहिला होता. तेव्हाच पाली ची राइड करायचा किडा डोक्यात वळवळला होता. नक्की कसे जायचे याबद्दल थोडा गोंधळ होता मनात. एक मार्ग खोपोली वरुन तर एक खालापूर वरुन असे दोन रस्ते माहीत झाले होते. गुगल बाबाने अंबरनाथ ते पाली हे अंतर ८७ किमी दाखवले होते.मागे डोंबिवलीतील एका सायकल ग्रुप ची पाली राइड दोन दिवसांत केल्याची पोस्ट पाहिली होती. तो ग्रुप दर वर्षी ही राइड करतो असेही समजले होते. या आठवड्यात सुटीचे दिवस होते गुरु व शुक्रवार.

आमचं पानीपत- द बिगीनिंग.

लेखक भीमराव यांनी शुक्रवार, 21/07/2017 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या गोष्टीची सुरुवात होते ती एका चकाचक मल्टीन्याशनल कंपनी पासुन, अँपरेंटीस अँक्ट च्या कृपेने आमचा येथे प्रवेश झाला हे सुरुवातीलाच सांगुन टाकलेलं बरं, आमचं आव्या मी अन तात्या या सर्वांच्या एका असामान्य संघर्षाची ही कथा, कंपनी मधेच आमची ओळख झालेली, तात्या व मी एकाच डिपार्टमेंट साठी सिलेक्ट झालो होतो, तर आव्याची तात्यासोबत कँटीन मधे ओळख झाली होती, आमचं आव्या सांगलीच्या कुठल्याशा कॉलेज मधुन यांत्रिक अभियंता झालेलं, मी सोलापुरातुन विद्युत अभियांत्रीकी शिकुन आलेलो, आणि आमच्यामधले सर्वात अँक्टीव, मोस्ट हँडसम असे तात्याबा पुण्यात शिकलेले होते, ग्रामीण भागतल्या कॉलेजात ईंजिनेरींग शिकणाऱ्या तमाम कार्

आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान

लेखक थिटे मास्तर यांनी शुक्रवार, 21/07/2017 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान युवराजांच्या राज्यासाठी लावु पणाला प्राण युवराज उठतील, ट्रिपलसिट बाईक वर बसतिल निलाजरे ते फोटो काढुनि देशी थाई ते पळतिल जो कोण ह्यांना अडवील, जो कोण ह्यांना रडवील अडवणूक त्या करणार्‍यांची हे चिन्यांकडे करतिल फिर्याद संघर्ष यात्रेचि फौज निघे, हातात त्यांच्या लाडु पेढे अतिव गाति बारबालेचे अन चरस्याचे गुणगान पडुन राहु निपचित आता २०१९ ला खाउ लाथा नाहितर मांडु चिनि-पाकड्यांसोबत ठाण गुरूवर्य साने गुरुजिंचि माफि मागुन. ____/\___ रा.रा. युवराज ह्यांच्या चरणि हे आयुष्यातले पहिले काव्यकमल सादर.

पावसाळी भटकंती: ड्युक्स नोज, नागफणी ( Dukes Nose)

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 21/07/2017 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे-मुंबई या दरम्यान प्रवास करताना सह्याद्रीची रांग खंडाळा ते खोपोली या दरम्यान उतरावी लागते. या दरम्यानच वाहनांसाठी किंवा रेल्वेच्या दळण-वळणासाठी खंडाळ्याचा घाट किंवा जुना बोर घाट बांधलेला आहे. आपण या घाटातून वाहनाने प्रवास करीत असू किंवा रेल्वेने, खंडाळा ओलांडले कि घाटात डाव्या हाताला एक भेदक सुळका आकाश फाडीत गेलेला दिसतो.

रालायन्स जिओ,जिओफोन ..इतर कंपण्यांची नफेखोरी,उपाय काय??

लेखक टर्बोचार्जड फिलॉसॉफर यांनी शुक्रवार, 21/07/2017 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
रिलायन्सने काही महीन्यांपुर्वी जिओ सर्व्हीस सुरु केली.अत्यंत परवडणार्या किंमतीत त्यांनी ग्राहकांना इंटरनेट देऊ केले आहे.तीनशे रुपयात तीन महीने रोज १जीबी डेटा ते देत आहेत.आज मुकेश अंबाणी यांनी जिओफोनची घोषणा केली आहे.१५०० रुपये जे तीन वर्षात रिफंड होतील ,तेवढे भरायचे व ,४G स्मार्टफोन घ्यायचा.छान योजना आहे.मी वास्तविक कुणा कंपणीचा सपोर्टर नाही.पण रिलायन्सच्या योजनांमुळे Airtel,Vodaphone ,idea या कंपण्यांची नफेखोरी उघड झाली आहे. जिओ येण्याच्या आधी एअरटेल,आयडीया वगैरे मंथली १जीबी २जी पॅक साठी १९८ रुपये ग्राहकाला मोजायला लावत होते.जिओ आल्या नंतर हेच प्रोव्हाईडर आज तीनशे रुपयात ३० जीबी डेटा सर्रास