Skip to main content

शंका/समाधान.

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 03/12/2017 20:37 या दिवशी प्रकाशित केले.
शंका/समाधान. * या विशाल अवनी वर्ती, प्रशांत सागर वसतो त्यास भेटण्या सरिता का धावते जणू अभीसारीका? * त्या लाल कमल पुष्पात गोड मकरंदाची रेलचेल आत भ्रमर कैद होतो रात्री तिथेच का रमतो? * गगनात चंद्रमा हसतो धवल प्रकाश पसरतो ते मनोहर दृश्य बघुनि का सागर उफाळतो? * ति फुले रंगी बेरंगी मादक रस गंधाने फुलती. त्या रान पुष्पा वरती.. का भ्रमर असा घुटमळतो? * त्याच्याच नाभी कमलांत कस्तुरी गंध दरवळतो तरीही तो कस्तुरी मृग का शोध घेत फिरतो? * असे कितीक गोड प्रश्न का सतावतात मजला? या शंकांचे समाधान कधी होईल का मजला?? * अश्याच एका कातरवेळी भेटलास तू सजणा तनूत वीज कल्लोळली स्पर्शाने काया मोहरली * घेतलेस मज मिठीत च

रसायनांचा धुमाकूळ आणि कर्करोगाचा भस्मासुर

लेखक हेमंतकुमार यांनी रविवार, 03/12/2017 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू असतोच हे तर मूलभूत सत्य. पण हा मृत्यू निरोगी अवस्थेत शांत झोपेत किती जणांच्या वाट्याला येतो? फारच थोड्या. आयुष्यात मानवी शरीर हे कुठल्या ना कुठल्या रोगाची शिकार बनतेच. मग हा रोग शरीर पोखरत रुग्णास मृत्यूस नेतो. आज विविध रोगांमुळे होणाऱ्या मृत्युंमध्ये हृदयविकार हे आघाडीवर आहेत आणि त्याखालोखाल स्थान आहे ते कर्करोगाचे. सध्या जगभरात कर्करोगाने जवळपास ८० लाख लोक दरवर्षी मरण पावतात. हा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. चालू शतक संपेपर्यंत बहुधा कर्करोग हा हृदयविकाराला मागे टाकून ते अव्वल स्थान पटकावेल अशी चिन्हे दिसताहेत. आपल्याला कर्करोग का होतो?

Making of photo and status : ९. जाऊँ क्या खंडाला!?

लेखक सचिन काळे यांनी रविवार, 03/12/2017 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी. http://www.misalpav.com/node/41232 येऊ का आता? लगीन तर लागलंय, वाइच जाऊन येतो खंडाळ्यासनी.

कविराज

लेखक गबाळ्या यांनी रविवार, 03/12/2017 03:05 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर! मी मिपाचा नवीन सदस्य. तुमच्यासाठी एक रचना घेऊन आलो आहे. तुमच्या प्रतिक्रियेची अपेक्षा आहे. अगदी परखडपणे तुमच्या प्रतिक्रिया मांडा. मग त्या सकारात्मक असोत, नकारात्मक असोत, तटस्थ असोत वा सल्ले/उपदेश असोत. स्वयंसुधारणेसाठी मला त्याचा नक्कीच उपयोग होईल. ( कवीला व्यासपीठ मिळणं, श्रोते मिळणं, हि पर्वणीच आहे. आणि कोणा कवीला जर श्रोते स्वतःहुन म्हणत असतील कि आम्ही तुमच्या नवनवीन कविता ऐकण्यासाठी आतुर झालो आहोत, तर ते त्या कवीचं अहोभाग्यच. असं भाग्य एका नवकवीच्या वाट्याला आलं. त्याची हि कविता.

रोज रोज

लेखक सिरुसेरि यांनी शनिवार, 02/12/2017 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
रोज रोज -- कथा ( काल्पनीक ) "रोज़ रोज़ आँखोंतले एक ही सपना चले रात भर काजल जले .." हे गीत ऐकु आले आणी काहि वेळासाठी तिचे मन भुतकाळात हरवुन गेले . तिला तिचे कॉलेजचे सोनेरी दिवस डोळ्यांसमोर दिसु लागले . कॉलेजमधील मनमोकळे वातावरण , मित्र मैत्रिणींचा नवा जमलेला ग्रुप , रोजच्या रंगलेल्या गप्पा टप्पा , ग्रुपबरोबर त्या दिवसांत केलेली धमाल तिला परत एकदा आठवु लागली . या ग्रुपमधेच तिची त्याच्याशी पहिली ओळख झाली . ती एका साध्या , मध्यमवर्गातील घरातली . तर तो शहरातील एका श्रीमंत बिझनेसमनचा एकुलता एक मुलगा .

(धुतले...)

लेखक टवाळ कार्टा यांनी शनिवार, 02/12/2017 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णा उंच उधळला इकडून तिकडे, बापाचे (काय) चुकले भंजाळून पडला तोंडावर खाली, भावानेही धुतले दुरूनच पाहुनी पटकन आला, वर्दीने(ही) ठासले पारावरती विसावलो अन तिथेच चुकले खबर होता कर्णोकर्णी, बघ्यांचेही फावले तडफडलो पण थांबले नाही, सगळ्यांनीच धुतले सुजून गेली अंगे सगळी, प्लास्टरही घातले पाटलीणीस चुकून आपले म्हटले, (अख्ख्या) गावाने धुतले...

जिव्हाळघरटी

लेखक समयांत यांनी शनिवार, 02/12/2017 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
मनाच्या काचेवर कापरासारखे आपले बालपण ठेवले तर ते भुर्र उडून जाते, ते उडूच नये असे वाटते, हसरे मन लेऊन जन्मतो आपण प्रत्येक जण मात्र इथूनच ते हरवून द्यायला.. पण नेहमी रडतोसुद्धा आपण तरी दिवसेंदिवस लागतात आपले हसू विरायला, पहिला दिवस खळाळून जातो हसण्या-रडण्यात, नंतर नंतर तर हसण्याला स्मृतीभ्रंश होतो आणि रडण्याला पेव फुटते. नातं व्हावं कसं..

मी...एक अ(न)र्थतज्ञ !!

लेखक चिनार यांनी शनिवार, 02/12/2017 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
कालपरवा रिझर्व्ह बँकेचा एक लक्षवेधी अहवाल जाहीर झाला. आणि मी सुटकेचा निश्वास सोडला. गेले काही दिवस जरा भविष्याच्या चिंतेतच होतो. या आर्थिक मंदीमध्ये आपली नोकरी टिकेल का? समजा नोकरी गेली तर दुसरी मिळेल का? पगार वगैरे कसा असेल? असे बरेच प्रश्न पडत होते. पण त्यादिवशी आरबीआयच्या वरिष्ठ अर्थतज्ज्ञांनी माझ्यावर उपकारच केले म्हणायचे. आता मला ओळखणाऱ्या लोकांना वाटेल की, माझ्या टीचभर ज्ञानाचा, चिमूटभर कौशल्याचा, वेळकाढू नोकरीचा आणि तुटपुंज्या उत्पन्नाचा रिझर्व्ह बँकेच्या अहवालाशी काय संबंध? मी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची शप्पथ घेऊन सांगतो, त्या अहवालाशी माझा काहीही संबंध नाही.