दहशतवाद्यांनी नेहमीप्रमाणे संवेदनशील भागांना लक्ष्य करून आपले काम साधले(?). आता पुन्हा एकदा निषेध, मेणबत्त्या, संरक्षण, हे सर्व शब्द पुढची पंधरा दिवस ऐकायला मिळेल. नेहमीप्रमाणे आपले माननीय पंतप्रधान चिंता व्यक्त करून कठोर कारवाई करण्याचे आदेश देतील. दहशतवादी काही पकडले जाणार नाहीत आणि (आपलेच काही हिरे गमावून) पकडले गेलेच तरी २०/२५ वर्षे आरामात तुरुंगात खातपीत आयुष्य काढतील. नेहमीप्रमाणे लवकरच जनता सगळे विसरून पुढच्या स्फोटाची वाट बघण्यास सज्ज होईल. तो स्फोट लोकल मध्ये, रेल्वे स्टेशनावर, बागेत, उपहारगृहात, गर्दीत, शाळेत, कि एखाद्या धार्मिक स्थळावर होईल ते सांगता येत नाही.
हम्म!