ही वेल गेली अनेक वर्षे आहे. छाटणीमुळे विस्तार मर्यादीत असला तरी खोड बोटभर जाड झालेल. रोप आणल्यावरच काय जी फुले आली असतील ती. त्या नंतर मात्र जवळपास ५ वर्षांत फुले आली नाहीत; किंबहुना या वेलीली फुले येतात याचा विसर पडला. आणि अचानक गेल्या आठवड्यापासुन वेल बहरली. हा वेल कुंदाचा नक्कीच नाही. बहुधा नेवाळीचा असावा. कुठलाका असेना? त्यावर फुललेल्या फुलांनी खुश करुन टाकले. सकाळी जग आल्यावर प्रथम त्या फुलांवरच नजर जाते आणि मग दिवस सुरू होतो. आपल्याला आनंद देणार्या या छोट्या गोष्टी. बहर संपायच्या आत फुले चित्रबद्ध केली.
सुमारे बाण्णव (का ब्याऐंशी ) वर्षांचे हुस्न मुबारक सत्ता सोडत नाहीतच पण तिथली जनता विषेशतः तरूण आणि स्त्रीया यांनी मनावरच घेतले आहे की त्यांना सत्तेवरून खाली खेचायचेच आणि ते रस्त्यावर उतरले आहेत. इन्टरनेट आणि टिव्ही चॅनेल्स या बातम्यांनी ओसंडून वहात आहेत.
अपेक्षा आहे की याविषयावरची चर्चा रोचक आणि मनिरंजक ठरेल. ( युद्धस्यः कथा रम्या: ) मिपावर खूप चांगली आणि महत्वाची माहिती नेहमीच मिळते.
एक सामान्य वाचक आणि उत्सुक मिपा सदस्य म्हणून खालील काही प्रश्न पडतात.
१) या गोष्टीना असलेली पार्श्वभूमी काय?
संपूर्ण ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, दासबोध, एकनाथी भागवत आणि सार्थ वाल्मिकी रामायण, महाभारताचे जवळपास सर्व खंड, ऋग्वेद, जोनाथन लिव्हींग्स्ट्न्स सीगल आणि असे सुमारे दीडशे ग्रंथ एकाच वेळी, तेही फुकट आपल्याला मिळू शकतात? होय.
सांगली येथील श्री. विश्वास भिडे यांनी स्वत:च्या स्वेच्छानिवृत्तीच्या काळात पुरातन ग्रंथांना डिजीटलाईज्ड करण्याचे काम हाती घेतले आणि सुमारे दीडशे ग्रंथ अंतर्जालावर विनामूल्य उपलब्ध करून दिले आहेत.
म.टा.
नुकतीच ही बातमी वाचली
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7403585.cms
काही दिवसांपूर्वी एका समाजातील मान्यवर मनुष्याशी चर्चा झाली. हल्लीच्या नववी दहावीत असलेल्या पोरापोरींच्या वागण्यामुळे त्यांची लग्न परत पाच आठ वर्षाचे असतांना लावावी का असा तो समाज विचार करत आहे. त्यासमाजाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर असलेला पगडा फार आहे.
मिपाकरांना काय वाटते?
http://www.misalpav.com/node/16226 - भावड्याची खुषखबर तसेच बुलककार्ट देखील
भावड्याने अशी धमाल सुरुवातीलाच उडवल्यानंतर आमच्या त्याच्याकडून अपेक्षा चांगल्याच वाढल्या. आणि भाउमहाराजांनीही पुरेपुर अपेक्षापूर्तीचं दान आमच्या पदरात भरभरून टाकलं.
एकदा हिंदी गृहपाठासाठी निबंध लिहायचा होता. भावड्याने आयत्या वेळी कुणाचातरी निबंध उतरून काढला.
सरांकडे तो निबंध तपासण्यासाठी गेला. सरांनी निबंध तपासला. त्याच्यातल्या चुका शोधून समासात त्या लाल अक्षरात लिहिल्या.आणि सर जेव्हा अखेराकडे आले तेव्हा तो निबंध अपूर्णच होता.
एक मुलगा होता. असाच कुठेतरी भटकत असताना त्याला एक सुंदर बगीचा दिसला. त्यात काही मुले आनंदाने खेळत बागडत होती. मुलाची सुद्धा इच्छा झाली कि तिथे जाऊन आपण खेळावे. त्याने त्या बागेत प्रवेश केला. थोडा वेळ खेळून झाल्यावर त्याचे कुणाबरोबर तरी भांडण झाले. मुलगा हिरमुसले तोंड करू परत घरी आला. त्याची बागेत खेळायला जाण्याची इच्छा होती. पण आता कसे जायचे याचा तो विचार करू लागला. काही वेळाने त्याला त्याच्या एक मित्राने एक सुप्पर आयडिया दिली. दुसर्याच दिवशी तो पुन्हा बागेकडे निघाला. वाटेत जाताना त्याने एक मुखवटा विकत घेतला आणि त्याच्या चेहऱ्यावर चढविला.