असंच, आपलं कहीतरी.....
एक मुलगा होता. असाच कुठेतरी भटकत असताना त्याला एक सुंदर बगीचा दिसला. त्यात काही मुले आनंदाने खेळत बागडत होती. मुलाची सुद्धा इच्छा झाली कि तिथे जाऊन आपण खेळावे. त्याने त्या बागेत प्रवेश केला. थोडा वेळ खेळून झाल्यावर त्याचे कुणाबरोबर तरी भांडण झाले. मुलगा हिरमुसले तोंड करू परत घरी आला. त्याची बागेत खेळायला जाण्याची इच्छा होती. पण आता कसे जायचे याचा तो विचार करू लागला. काही वेळाने त्याला त्याच्या एक मित्राने एक सुप्पर आयडिया दिली. दुसर्याच दिवशी तो पुन्हा बागेकडे निघाला. वाटेत जाताना त्याने एक मुखवटा विकत घेतला आणि त्याच्या चेहऱ्यावर चढविला. मग काय, पुन्हा एकदा एक नवीन चेहरा मिळाल्याने तो मुलगा बागेत येऊन आनंदाने खेळू बागडू लागला.
त्याने एक मुखवट घेताघेता आणखी एक मुखवटा घेतला होता. तो मुलगा अधून मधून वेगवेगळा मुखवटा घालून बागेत येऊ लागला. त्याला नवनवीन मित्र मिळाले. दोस्ती यारी जमली. पण आनंदाच्या भरात मुलाने एक चूक केली होती. त्याने एक मुखवटा साधा-भोळा शांत चेहर्याचा घेतला आणि दुसरा एक चलबिचल-मवाली असा मुखवटा घेतला होता. जेव्हा जेव्हा तो साधा-भोळा मुखवटा घालून येत असे त्यावेळेस तो त्या शांत वागत असे आणि जेव्हा कधी दुसरा मवाली मुखवटा घालून येत असे तेव्हा मवालीगिरी करत असे. त्यामुळे झाले काय, त्याच्या मुळ स्वभावात देखील फरक पडू लागला. पन असे सारखे अदलाबदल केल्याने त्याला लवकरच आपण या दोन परस्पर विरोधी व्यक्तीमत्वात अडकत चाललेलो आहोत याची जाणीव झाली. त्याने यावर गंभीर विचार केला, आता यावर उपाय काय ? तो यावर उपाय शोधात राहिला.
एके दिवशी त्याला दूरवर एक ऋषी बसलेले दिसले. त्याने त्यांच्याकडे जाऊन त्यांना सगळी हकीकत सांगितली आणि उपदेश मागितला. ऋषींनी स्मित हास्य करून त्याला सांगितले कि, अरे बाबा, तू ज्याला तुझा खरा चेहरा समजतो आहेस, तो सुद्धा तुझा खरा चेहरा नाही. तो चेहरा सुद्धा एक मुखवटाच आहे. तुझा जन्म झाल्या झाल्या लगेच तुझ्या मात्या-पित्यांनी तुला एक धर्म-जात यांचा एक अदृश्य मुखवट चढविलेला आहेच. तो मुखवटा म्हणजे तू नव्हेस. त्या अदृश्य मुखवट्या पलीकडे काय आहे हे तुला देखील माहित नाही. आणि ते मी सुद्धा माहिती करून घेऊन शकत नाही.
मुलाने चिंता व्यक्त केली. तेव्हा ऋषी म्हणाले कि, तू असा उदास होऊ नकोस. तू ज्याला तुझा नकली मुखवटा म्हणत आहेस, त्यात एक जादू आहे. मुलाने विचारले, काय जादू आहे त्यात ? ऋषी म्हणाले, त्यात एक अशी जादू आहे कि त्यामुळे कधीकधी तुझा अदृश्य मुखवट्या पलीकडील तुझा खरा चेहरा त्या मुखवट्यामुळे बाहेर येईल. मी इथून तुझे निरीक्षण करीत आहे. एक ठराविक काळ जाऊंदे त्या नंतर तू माझ्याकडे ये. मग मी तुला तुझा खरा चेहरा दाखविण्याचा प्रयत्न करीन.
असे सांगून ऋषी पुन्हा ध्यानस्थ झाले.
(लेख पूर्णपणे काल्पनिक.)
Character is what we do when no one is watching : Anonymous
याद्या
3045
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
आय होप ऋषीमुनी ष्याणा होता...
आपल्याकडे येउ का ?
In reply to आय होप ऋषीमुनी ष्याणा होता... by टारझन
भूतबाधा झाली आहे असे सांगून
In reply to आपल्याकडे येउ का ? by नरेशकुमार
प्रकाटाआ
त्यामुळे झाले काय, त्याच्या
+१
In reply to त्यामुळे झाले काय, त्याच्या by गणपा
=))
In reply to +१ by सहज
अगदी हेच म्हणायचे होते!!!
In reply to त्यामुळे झाले काय, त्याच्या by गणपा
>>>लोकांना चार-चार मुखवटे
In reply to अगदी हेच म्हणायचे होते!!! by मस्त कलंदर
छान गोष्ट!
सत्य घटना वाटतेय
?
विचार करण्यासारखे..
In reply to ? by अवलिया
छान
हॅ हॅ हॅ !! अवांतर : नरेशराव
धन्यवाद. आता तो विषय काढलाच
In reply to हॅ हॅ हॅ !! अवांतर : नरेशराव by सुहास..