Skip to main content

चला व्हिएतनामला ०८ : कु ची वरून परत आणि सायगाव नदीवर रात्रिची जलसफर

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी रविवार, 15/12/2013 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
================================================================== चला व्हिएतनामला : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८...

बसा की एकदा खुर्ची वरती

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 15/12/2013 18:12 या दिवशी प्रकाशित केले.
कसला राव विचार करता बसा की एकदा खुर्ची वरती तोडा आकाशीचे तारे पूर्वा हौस जनतेची. विजेची बिल कमी करा मुफ्त मध्ये पाणी द्या दाखविलेले स्वप्न जनतेला तोडू नका हो राव तुम्ही. पुकारते ही खुर्ची कसी होऊ नका हो वनवासी औलीयाची श्रापित वाणी करू नका हो पुन्हा खरी. औलिया: निजामुद्दीन औलिया "दिल्ली दूर आहे- असा त्यांनी बादशाहला श्राप दिला होता". तो खरा ठरला. तेंव्हा पासून ही म्हण प्रचलित आहे.

फुकुशिमानो तोत्तोचान

लेखक नगरीनिरंजन यांनी रविवार, 15/12/2013 09:55 या दिवशी प्रकाशित केले.
वसंताच्या लख्ख दुपारी चेरीचं फूल फुलावं तसं उमटतं तिच्या गोबर्या गालावर हसू फुकुशिमानो तोत्तोचानवा खावाक् सुगोय देसु तोत्तोचानच्या घरामागे खूप खूप सूर्यफुलं राहतात रोज सकाळी सगळी सूर्याकडे एकटक पाहतात फुलांवरच्या माश्यामात्र दिसत नाहीत आता आणि दबून बसलीय शेतांमधे भेदरटशी शांतता ओतोओसानचा चेहरा तिला नीटसा आठवत नाही रविवारशिवाय कधी त्यांची भेटच झाली नाही कोण जाणे कसला त्यांना एवढा त्रास होता पण एक दिवस ओतोओसानगा जिसात्सु शिता ओकाआसानच्या हसण्यातली उदासी लपत नाही काय होणार पुढे तिला विचार करवत नाही गाईंच्या अंगावर पडले ठिपके तिला बघवले नाही एका देठावर फुलं दोन तोत्तोने सांगितलेच नाही ओजिइसान
काव्यरस

खुनी विरुद्ध खिलाडी!

लेखक हुप्प्या यांनी रविवार, 15/12/2013 06:17 या दिवशी प्रकाशित केले.
'आम'च्या विजयाचे पडसाद पुण्यात उमटत आहेत असे वाटते. पुण्याचे सुप्रसिद्ध गुंड व खुनाचे आरोपी श्री मानकर ह्यांनी सर्वश्रेष्ठ खिलाडी श्री. कलमाडी ह्यांच्याशी पंगा घेण्याचे मनावर घेतले आहे. आता कलमाडी म्हणजे राष्ट्रीय पातळीवरचे गुन्हेगार! त्यामुळे तेही सहजासहजी हार मानत नाहीयेत. कागदोपत्री कलमाडी काँग्रेसमधून हद्दपार झाले असले तरी पुणेरी काँग्रेसजन कलमाडीजींना आदरस्थानी मानतात. खाल्ल्या मिठाला आणि मेवामिठाईला जागतायत! पण ह्या नमकहलाल काँग्रेसी अनुयायांची पंचाईत होत आहे. कलमाडीभाई आपले म्हणावेत का नाही ह्या विषयी वरून काहीच आदेश येत नाही आहे.

दॅट्स व्हाय इंडिया महान है : नागपुरी तडका

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 15/12/2013 05:26 या दिवशी प्रकाशित केले.
दॅट्स व्हाय इंडिया महान है : नागपुरी तडका

इकडे अमुच्या भारताचा सातबारा गहाण है।
दॅट्स व्हाय शायनिंग यह इंडिया महान है॥

पोशिंद्याच्या घामाभवती बांडगुळांचे कडे
नितनेमाने रोज पाडती प्रेत-मढ्यांचे सडे
महासत्तेचे स्वप्न दावुनी तज्ज्ञ धावती पुढे
तिकडे त्रेपन-चौपन मजले मजल्यावरती चढे
चेले-चमचे, खुर्ची-एजंट गातसे गुणगान है ॥

क्षुल्लक संख्या ’नरबळी’ची, अन् तांडव केवढे यांचे
शतसहस्र "बळी" बळीचे, पण हाल पुसेना त्यांचे

डिसेंबर (२)

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 15/12/2013 00:23 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा : डिसेंबर http://misalpav.com/node/26361
डिसेंबरात रात्री मात्र चांदण्यांचे झाड फुललेलं असते. रोहीणी सप्तऋषी स्वाती चित्रा सगळी नक्षत्रे झगमगत असतात. दक्षिणेकडे अगस्तीचा तारा स्वतन्त्र आस्तित्व दाखवत असतो. सिंह राशीतलं उलट प्रश्नचिन्ह वृषभ राशीतल्या कृत्तिकेचा पुंजका, हे आकाशात अक्षरशः हिरेमाणके असावी तसे लखलखत असतात.

प्रेम आणि ममता ....... भाग दोन शेवटचा

लेखक mohite jeevan यांनी शनिवार, 14/12/2013 19:46 या दिवशी प्रकाशित केले.
'जा तुझ्या त्या राजुजवळ जा, थांबु नकोस,राजु राजु खुप करतेस ना, जा आता मी केली नवि नवरी, जा', दारु नशेत रमेश बाबु म्हणाला व तो हासु लागला, त्याच्या पाठोपाठ ती नवि नवरी ही हासु लागली. हे पाहुन तिला आश्चर्यचा धक्का बसला, त्या रात्री ती घराबाहेर बसली, तो रात्रभर काकंणाचा आवाज तिला नकोसा वाटला व तीने आपले कान बंद केले. दुसर्या दिवशी ती भराभर चालत ती त्या पिर साहेबाच्या दर्ग्याकडे जाऊ लागली, कधी एकदा राजुला पाहतोय आसे तिला झाले. तिला राजुचा आधार इतका वाटु लागला की त्याच्या शिवाय ती जगुच शकत नव्हती .

प्रेम आणि ममता....... भाग एक

लेखक mohite jeevan यांनी शनिवार, 14/12/2013 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
लाल साडी घातलेली लता आपल्या पाच वर्षाचा मुलगा राजुला हाताला धरुन ती भराभरा जात होती,राजुच्या पायात ते चप्पल मोठे आसल्याने तो आडखळत चालत होता.तरी ही तो आई बरोबर चालण्याचा प्रयत्न करीत होता,त्याला भिती होती की आईचा हात सुटेल व तो हारवेल,आता त्याला घर ही माहीत नव्हते.लहानपणापसुनच आनेक समस्यानी त्याला घेरले होते. लता एका गल्लीतुन दुसर्या गल्लीत जात होती,कोणी ओळखीचेतर पाहणार नाही ना याबाबत ती दक्ष होती, चालत चालत ती सुनसान गल्लीत पोहचली, तेथे कोणी ही नव्हते, मग ती पाठीमागे आपल्या कोणी येत तर नाही ना हे पाहिले व पुन्हा डोक्यावर पदर घेऊन चालु लागली. राजुला आई कोठे जात आहे माहीत नव्हते.त्याला नेहमी वा