Skip to main content

वऱ्हाडी स्मार्ट सून बाई....

लेखक दिव्य चक्षु.. यांनी मंगळवार, 09/05/2017 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
विनंती: एकच भाषा असेल तरी दोन प्रांतांमधल्या बोलीभाषेच्या फरकामुळे होणारी गंमत आणि गैरसमज यातून निर्माण झालेला विनोद अशा दृष्टिकोनातूनच या माझ्या पहिल्याच लेखाकडे पहावे पुण्यातल्या मुलगा अट्टल विदर्भातल्या मुलीच्या प्रेमात पडला, आणि त्यांनी लग्न करायचे ठरवले,मुलाच्या घरचे ह्या बातमीने हैराण झाले, अरे पण तू असे कसे करू शकतोस? मुलाने आपला निर्णय जाहीर केला लग्न करेन तर मालू शी नाहीतर संन्याशी, त्याचे बाबा जोरात ओरडले अरे तू सन्या शी पण लग्न करायला तयार आहेस? , मग मालूशीच लग्न कराचे का म्हणतोस ?

काळाचे गीत

लेखक चांदणे संदीप यांनी मंगळवार, 09/05/2017 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
तूहि नव्हतीस, मीही नव्हतो बघ काळ कसा बदलतो तारे ते जे सदाच असती आपल्या जागी नभात वरती आज मोजण्या जागे कोणी मनात अन् मोगरे माळूनि फेऱ्या आपुल्या पाणवठ्याच्या चर्चा साऱ्या गावकुसाच्या कशी न कळली तू गेलेली नियती अशी उलटलेली पुन्हा भेटलीस का वळणावर? घेऊन कुंकू परके, भांगावर उभय उरातहि ते काही आधीसारखे हलले नाही         तूहि नव्हतीस मीही नव्हतो         पुरते आपण अनोळखी होतो         तू आहेस अन आज मीही         समोरासमोर अगदी, तरीही         त्याच्या हाती सर्व आहे         बघ काळ बदलला

जगायास कारण ईतकेच आहे...

लेखक सत्यजित... यांनी मंगळवार, 09/05/2017 09:26 या दिवशी प्रकाशित केले.
नवे रोज धागे नवा पेच आहे जगायास कारण ईतकेच आहे! कुणी एकटा जात नाही प्रवासा कुणी चालताना कुणा ठेच आहे! कुणी आरसा काल देवून गेले मला भेटतो मी नव्यानेच आहे! कुण्या वर्तुळाच्या कडेने फिरावे उभे विश्व सारे फुकाचेच आहे! नको फार त्रागा करु तू उन्हाचा सखी सावली या उन्हानेच आहे! —सत्यजित
काव्यरस

भटकत होतो

लेखक जव्हेरगंज यांनी सोमवार, 08/05/2017 22:45 या दिवशी प्रकाशित केले.
भटकत होतो. एक डोंगर दिसला. चढत गेलो. हिरवी झाडं पाणी फुलं. उन मरणाचं. झळझळत गेलो. भटकत होतो. बोडकं माळरान. तुडवत गेलो. कुसळं शेळ्या मेंढ्या कुत्री. चप्पल तुटलं. भळभळत गेलो. आभाळाच्या कडेला लावून मी हात बसलो या देवळात मूर्तीच्या गाभाऱ्यात ठोकळाच ठेवलेला ही उदास छटा आता नको आहे हे उनाड पाखरू आता नको आहे ही गंजकी तलवार आता नको आहे जगणं *** वगैरे नेहमीचंच

अघटित

लेखक अरूण गंगाधर कोर्डे यांनी सोमवार, 08/05/2017 17:42 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाळी रात्र. ..... रस्त्यावर दिवे नाहीत. तसा तो मोठा रस्ता होता. पालिकेला , वाहन चालवायला रस्त्यांवर दिव्यांची गरज काय असं वाटत असावं. आधीच अमावास्या , त्यात पाऊस आणि लगतच्या खाडीवरून येणारा वेगवान थंडगार वारा. तोंडावर पाण्याचे फटकारे बसत होते. वाहनांच्या दिव्यांनी जे दिसेल तेवढेच आणि तितकाच वेळ दिसत होते आणि समोरचं जग मुळी अंधारात गुडुप होतंय असं वाटत होतं. रात्रीचे अकरा वाजून गेले होते. त्याच्या हातात छत्री नव्हती की अंगावर रेनकोट नव्हता. विश्वास ....एक भक्कम बांध्याचा, चाळिशीकडे झुकलेला , पाच साडेपाच फूट उंचीचा प्रौढ तरूण होता.

जिद्द

लेखक परशुराम सोंडगे यांनी सोमवार, 08/05/2017 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
कथा आणि व्यथा . . . . . . जिद्द . . . . . . . . . . . . . . विदर्भातील एका शहरात सहज भरकटत होतो. सकाळची वेळ असून ही उन्हं चांगलचं चटकत होतं. रसत्यावर गर्दी होती. खरं तर आम्ही चहाच्या शोधात होतोत. फुटपाथवर अनेक टप-या थाटलेल्या होत्या. त्यात चहाच्या टप-या ही होत्या.पण त्यात स्वच्छ तर एक ही नव्हती, पॉश पण नव्हती. अस्वच्छ होत्या. किळसवाण्या होत्या. त्यावर ही लोकांची झुंबड उडालेली होती.आम्हाला पाॉश हॉटेल हवं होत.बरीच पायपीट झाल्यानंतर ही तिथं चहा जाऊन प्यावं असं हॉटेल सापडलं नाही. एका टपरीजवळ थांबलो.

राजकारण आणि We...The People!

लेखक चिनार यांनी सोमवार, 08/05/2017 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
"अरे खूप पॉलिटिक्स चालतं रे इथं. मी म्हटलं होतं ना तुला! आता बघ,तुला मेल पाठवला त्यानं..मला नाही पाठवला!", माझा कलीग तणतणत म्हणाला. कंपनीच्या मेलबॉक्सवर येणाऱ्या असंख्य बिनकामांच्या मेलपैकी एक मेल आमच्या मॅनेजरने त्याला पाठवला नाही ह्यावरून तो चिडला होता. खरं म्हणजे त्या ईमेलचा माझ्याशीच काय तर आमच्या अक्ख्या डिपार्टमेंटशी काहीही संबंध नव्हता. मॅनेजरला FYI म्हणून आलेला ईमेल त्याने पुढे पाठवण्याची तशी काही गरज नसते. पण मेल पाठवणं हा मॅनेजरलोकांचा आवडता उद्योग असतो.तेव्हढंच रिकाम्या हाताला काम मिळतं बाकी काही नाही!! आता 'मला का नाही पाठवला?' ह्या प्रश्नाचं माझ्याजवळ काहीही उत्तर नव्हतं.

जीवन एक अर्थ!

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 08/05/2017 09:55 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्य अर्ध संपलं तरी जगण्यातला अर्थ संपला नाही खूप जगले म्हंटल तरी जगण्यातला मोह संपला नाही खूप काही बाकी आहे जगून सारंच घ्यावं ... वाटत एकटं... दुकटं... सर्वांबरोबर... आयुष्य वाटून घ्यावं... वाटत! जवानी मनाची अवस्था आहे तिला पूर्ण भोगावं वाटत! समाज... बंधन... झुगारून देऊन मुक्त स्वच्छंद जगावं वाटत!! मात्र स्वप्नातून जाग येताच आयुष्याचं वास्तव पुढे असतं जवानी... मुक्त... स्वच्छंद.. एकटं.. विसरून कामाला लागावं लागत!!!
काव्यरस