Skip to main content

ती येते आणिक जाते

लेखक अरुण मनोहर यांनी गुरुवार, 29/12/2011 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
गालावर येणारी अवखळ लट मानेला हिसका देऊन बाजुला सारण्याची तुझी जीवघेणी लकब... त्याचवेळी तुझ्या डोळ्याचे कोपरे हळूच बघून घेतात समोरचा तडफडणारा जीव अजून जिवंत आहे किंवा कसे? काळ्याभोर लटेचा तो हिसका बसताच खोलवर दडलेले कुठलेसे बीज तरारून थरथरते आणि वरवर यायला बघते ते धुमारे काळ्या डोहात कसलासा आकार घेत आहेत असे वाटू लागते तोच टिक टॉक सॅंडल्स उडवित तू निघून देखील जातेस समोरचा पाचोळा बेफिकीरीने उधळीत उडालेली धूळ काळ्या डोहात धुमार्‍यान्ना गुदमरून टाकीत पाण्यात विलीन होते अस्वस्थ तरंग देखील नि:शब्द होतात शब्दावाचून कुठली कविता? तू येते आणिक जाते......

ईर्शाळा !

लेखक सुहास.. यांनी गुरुवार, 29/12/2011 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
आता पर्यंत ईर्शाळ्याला तीनवेळा गेलो.. एक :: दर गणपतीला,मोहरमला,दिवाळीत आणी नववर्षाला आमच्याईकडं "उचलाउचली" व्हायची.ती नावापुरती असली तरी ते लॉक-अप मधले दोन तास लै जिवावर यायचे,आणी वर पोलीसांना दिवाळी किंवा ईतर सणाबद्दल फुकटचा बोनस भेटायचा तो वेगळाच.पण काही वर्षापुर्वी नागपुरचाळीतल्या सामान्य गुंडानी ह्या परंपरेला तडा द्यायच ठरवल आणी मग पळापळ झाली.कोणी गावाकडे तर कोणी पाहुण्यांकडे पळाल.पण आम्ही सगळीकडेच तोंड काळं केल्याने काय कराव ह्या विवंचनेत होतो.कातकरी समाजच्या प्रदीपदादांचे वडील येरवडा जेलमध्ये चतुर्थ श्रेणीतील कामगार होते आणी आमचे शेजारी होते.त्यांच्या गावी जायचे ठरले,ते गाव म्हणजे ईर्शा

मी काढलेली काही निसर्गाची छायाचित्रे.

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 29/12/2011 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
नाखव्याचा ह्रदयभंग........ शहरी उदास पाऊस....... ही वाट दूर जाते..............कोकणातील गावा... क्षितिज आणि मी...

रोज मरतो

लेखक निश यांनी गुरुवार, 29/12/2011 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
रोज मरतो रोज मरतो रोज मरतो सकाळी कामावर निघालो की कचरा कुनडीवर कचरा वेचणारी भुकेने रडणारी ति अनाथ मुल बघुन रोज मरतो रोज मरतो रोज मरतो स्टेशनवर येतो तिथे दिसत एक म्हातार जोडप व ते अडचण आहेत नविन घरात अस मानुन त्याना गावाला पाठवणार तरुण जोडप,ते बघुन रोज मरतो रोज मरतो रोज मरतो लोकल येते फलाटावर नेहमिसारखी डब्ब्यानमध्ये गुरानसारखी घुसलेली मानस बघुन. रोज मरतो रोज मरतो रोज मरतो दुपारी जेवणात येणारी आकार लहान झालेलि वाढणार्‍या महागाईने बिनतेलाची असलेलि रोजच असलेलि बटाटा भाजी व पोळी ,ते बघुन रोज मरतो रोज मरतो रोज मरतो तरी पण ह्या मरण्यातुनच रोज येते नवि उभारी जगण्याची जेव्हा घरी ये

मी हा गेम पूर्ण खेळणार..

लेखक ajay wankhede यांनी गुरुवार, 29/12/2011 01:11 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच तारुण्याच्या उंबरठयावर प्रवेश केलेला मी. सळसळतं रक्त,ओहटी न येणारं अविरत उधाण. सतत खळखळणारं मन स्वप्नांचे ढिगभर मनोरे, तरी पण का बरं वाटतं एवढं बोअर कुठून येत असेल ही अस्वस्थता जग भन्नाट वेगानं बदलतय मीच मागे पडतोय काय? का छळतेय ही बेचैनी ? का गुदमरतो जीव? का मोकळा श्वास घेताच येत नाही ? असेल प्रेम भंगाचा विरह? प्रेम तरी का म्हणावं त्याला? की असेल उतुंग भरारी घेतांनाच झालेला संधीपात? नि मग वाटते मरून जावसं... का बरं वाटत असावं असं..का? का हाच माझ्या जन्माचा हेतू? नाही नाही नाही .... आई बाबांना सांग, अर्धवट सोडून जाणार नाही हा गेम. नवं वर्षाच्या पूर्व संध्येला....
काव्यरस

कोलावरी गोदावरी

लेखक सुधीर मुतालीक यांनी बुधवार, 28/12/2011 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
त्या कोलावरी डी गाण्याने कहर केलाय हे नक्की. लाखो बघे त्या गाण्याला मिळाले ही कमाल आहे. लाखो म्हंजे चाळीस पन्नास लाख वगैरे. गाणे खरेतर शून्य आहे. पण तरी एवढे बघे म्हंजे हल्लीच्या सांस्कृतिक चवीचा ही अंदाज बांधता येईल. असो. मी मात्र ते गाणे कानावर आल्या आल्या आणि त्याच्या प्रसिद्धीची बातमी समजताच एक फायदा करून घेतला. आमच्या गोदेची हेळसांड मला अगदी पाहवत नाई. नाशिकला उगम पावणारी गोदावरी नदी. वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे समाजबांधव आणि भक्त आणि अन्य जन तिचा बरं महिने छळ करत असतात. तिची कधी एकदा "मिठी" करावी असे काहीसे जनतेला झाले की काय कुणास ठाऊक.