Skip to main content

वाङ्मय

मन...!

Published on बुधवार, 28/03/2012 प्रकाशित मुखपृष्ठ
आज मी तुझं मन खणायला घेतलंच शेवटी.... एक भली मोठी पिशवी घेऊन प्रवेश करणार होतो. नको ते सल, तण उपटून टाकून बाहेर घेऊन येण्याच्या हेतूने... प्रवेशाचे महाद्वारच महामजबूत!!! आत प्रवेश करायलाच माझी निम्मी शक्ती खर्ची पडली, पण; आज मी ही माघार घेणारच नव्हतो... तुझी मन-वस्ती सुनसान आणि निपचित वाटली मला.... सगळं आवरत, स्वच्छ करत निघालो.. बरीच जळमटं, सर्वत्र धूळ, जिवंतपणाचं एकही लक्षण नाही त्यात.. अवकाशाने कळलं, मी तुझ्या मन-गाभ्याच्या भूतकाळात शिरलोय!!
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 1665

गप्पा युजींशी

Published on रवीवार, 25/03/2012 प्रकाशित
युजी कृष्‍णमूर्तींची ओळख इथल्या बहुतेक लोक

याद्या 5787

शब्द...!

Published on शनीवार, 24/03/2012 प्रकाशित मुखपृष्ठ
सुटीची मस्त सकाळ म्हटलं की हातात वाफाळत्या चहाचा कप आणि समोर वृत्तपत्र, ठरलेलंच!! "घरकाम होत राहतील आरामात" कसली घाई नाही, गडबड नाही हा आल्हाददायी विचार करत पहिला घोट घेतला अमृततुल्याचा- चहाची चष्म्यावर आलेली वाफ साफ करत, वृत्तपत्रात घातलं डोकं... 'पुंजके' नावाचा स्तंभलेख वाचताना, सुधीर मोघे म्हणतात- येथे रेंगाळले, ओळी सुंदरच होत्या, "शब्दांना नसते दु:ख, शब्दांना सुखही नसते, वाहतात जे ओझे, ते तुमचे आमचे असते!" वाचन खुंटलं इथेच... खरंच शब्द म्हणजे नक्की काय, नितळ पाणी? भावनांचा रंग मिसळला की तेच भाव व्यक्त करणारे!
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 2207

अशोक-अजातशत्रू कथा आणि काही अवांतर

Published on मंगळवार, 20/03/2012 प्रकाशित
वल्ली यांच्या http://www.misalpav.com/node/20767 या भाजे येथील लेण्यांवरील धाग्यात काही प्रतिसादांमध्ये मी अजातशत्रू आणि प्रसेनजितावरून उल्लेख केला होता. तेव्हा असे जाणवले की या गोष्टी बौद्ध लेखनाशी संबंध आला आहे असे काही थोडे लोक वगळता इतरांमध्ये विशेष प्रसृत नसाव्यात. आणि या कथा इतक्या सुरस आहेत की त्या माहिती नसणे बरे नाही असे वाटते! पण त्याहीपेक्षा त्या अभ्यसनीय आहेत ते त्यातून काही तत्कालिन समाजांची माहिती हाती येऊ शकते म्हणून. म्हणून त्या इथे देत आहे.
लेखनप्रकार

याद्या 63095

नर्मदे हर!

Published on रवीवार, 18/03/2012 प्रकाशित मुखपृष्ठ
नर्मदे हर! काही दिवसांपूर्वी एक मिपाकर आत्मशून्य नर्मदा परिक्रमेच्या उद्देशाने बाहेर पडला. पण काही कारणाने त्याची परिक्रमा पुरी नाही झाली. त्या निमित्ताने सध्या मध्य प्रदेशात रहाणार्‍या यशवंत कुलकर्णीने एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा ही सुंदर लेखमालिका लिहिली होती. ती वाचताना या नर्मदा परिक्रमेबद्दल कुतुहल जागं झालं. की हे काय प्रकरण आहे? अशी कोणती प्रेरणा आहे, की जिच्यामुळे लोक हजारों मैलांचं अंतर पायी चालून जायला तयार होतात? तसं खूप वर्षांपूर्वी गोनीदांचं 'कुण्या एकाची भ्रमणगाथा' वाचलं होतं. पण मध्यंतरीच्या वर्षात ते कुठेतरी मागे राहून गेलं होतं.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 24910

अजि ये प्रोभाते - आज पहाटे रविकर आला

Published on गुरुवार, 15/03/2012 प्रकाशित
कवी मग तो कुठलाही असो, त्याच्यात ऋषि बनण्याची संभाव्यता असते. कारण मनाच्या एका विशिष्‍ट अवस्‍थेत त्याला जे झप्पकन दिसून जातं ते तेवढ्याच झगझगीतपणे व्यक्त होणार्‍या शब्दांत बांधण्याचे कसब कवीकडे असते. ऋषिलाही ते दिसत असते; पण त्याला कविता करण्‍याची गरज पडत नाही कारण ऋषिने पाहिलेले आणि समोर मांडलेले 'सत्य' असते. म्हणून ऋषिच्या वाणीला धर्मग्रंथांत स्‍थान मिळते. कवीची अवस्था मात्र जाणीवेच्या दृष्‍टीने काहीशी खालची मानली जाते कारण कवी सत्य आणि सामान्यत: जग जसे असते त्यातील सीमारेषेचे सतत अतिक्रमण करीत असतो.

याद्या 5986

मराठी गझल.

Published on रवीवार, 11/03/2012 प्रकाशित मुखपृष्ठ
आपले मित्र गंगाधर मुटेसाहेबानी काल हझल पेश केली. तेंव्हा पासून मराठी गझलेकडे परत आलो. माझ्याकडे गझलां संग्रह अगदीच थोडा आहे. ( तुलना :नाट्य-संगीत / शा.संगीत / भावगीत). गझल कवितेसारखी वाचून मजा घेता येत नाही. त्यामुळे ज्या गझलांना चाली लावण्यात आल्या त्याच माझ्या ऐकण्यात आल्या.पण त्यांची संख्या अगदीच कमी.मुख्यत: प.हृदयनाथांच्या काही गझला व भिमरावांच्या थोड्याफार. हा संग्रह वाढवायला मिपा सारखे माध्यम नाही. तर दोस्तहो आपल्या आवडत्या गझला गुंफत चला. माझ्याकडच्या काही गझला सांगतो :- १. तू नाभातते तारे ( भीमराव) २. आंदाज आरश्याचा ( भीमराव) ३.आयुष्य तेच आहे ( भीम राव ) ४.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 3908

आकाश उजळले होते,,,

Published on गुरुवार, 08/03/2012 प्रकाशित मुखपृष्ठ
आत्ताच आपल्या गुर्जींनी म्हणजेच अतृप्त आत्म्यांनी एका प्रतिसादात त्यांना सुरेश भटांच्या 'एल्गार'ची आठवण आली म्हणून सांगितले आणि आमच्याही मनात त्यासरशी त्यांची आठवण ताजी झाली. s.y ला असताना सुरेश भटांच्या गजला आमच्या अभ्यासक्रमात होत्या. खरं तर त्या वेळीच आमची आणि सुरेशभटांच्या गझलांची खरी ओळख झाली म्हणायची. त्यांच्या प्रत्येक गझलेमध्ये जणू एकप्रकारचा जादूच होता. आजही ती गझल वाचताना किंवा ऐकताना त्यातील श्ब्द न् शब्द मनाच्या खोल गाभार्‍यात कुठेतरी चर्रर्र करुन जातो. त्यातीलच गुगलमध्ये सापडलेली ही एक गझल=>

याद्या 2845
काव्यरस

शि द फडणीस

Published on बुधवार, 22/02/2012 प्रकाशित मुखपृष्ठ
गोष्ट आहे १९३५-३६ मधली. हत्तीशी झुंज खेळण्यासाठी बनवलेल्या कोल्हापूरच्या साठमारीच्या मैदानात काही शाळकरी मुलं खेळत असतांना त्यातील एकाचा पाय घसरून तो भिंतीवरून थेट मोठाले खिळे असलेल्या दूस-या भिंतीवर जाऊन पडला. मोठाले खिळे मांडित घुसले आणि सरळ दवाखान्यात भरतीच व्हावं लागलं. दवाखान्यात विचारपूस करायला येणा-यांची रिघ लागली. 'असा कसा काय अपघात झाला?' लोकांचा परवलीचा प्रश्न! आणि विचित्र अपघाताबद्दल सांगता सांगता आधीच चिंताग्रस्त वडिलांची उडालेली तारांबळ! मात्र सोबत खेळणा-या दहा वर्षाच्या एका मुलाने शक्कल लढवली. तीन चार चित्रांच्या मालिकेतून अपघात कसा घडला हे त्याने स्पष्ट करून दाखवलं.

याद्या 5017