Skip to main content

वाङ्मय

गाल चोळ फक्त

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 11/12/2012 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
चड्डी खाली खेचल्या शिवाय मोकळे होता येत नाही पण कधी कधी चड्डी खाली खेचायलाही वेळ मिळत नाही...... निवडुंग ती गेली तरी तीने मागे सोडलेला गंध काही गेला नाही नाकावर दाबुन धरलेल्या रुमालालाही त्याला रोखणे जमले नाही...... निवडुंग तो म्हणाला प्रिये मला डोळ्यात साठवुदे तुझे हे सुंदर रुपडे ती म्हणाली त्या साठी आधि साफ कर तु़झ्या डोळ्यातली चिपडे.......निवडुंग पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते....... निवडुंग पैजारबुवा,

दादला न लगे मला

लेखक शरद यांनी शनिवार, 08/12/2012 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
मला दादला नलगे बाई ! (1) सत्वर पाव गे मला ! भवानिआई रोडगा वाहिन तुला ! सासरा माझा गांवीं गेला ! तिकडेच खपवी त्याला ! ! सासू माझी जाच करती! लवकर निर्दाळी तिला जाऊ माझी फडफड बोलती ! बोडकी कर ग तिला ! नणंदेचे पोर किरकिर करिते ! खरूज होऊं दे त्याला ! दादला मारून आहुती देइन ! मोकळी कर ग मला ! एका जनार्दनी सगळेचि जाऊं दे ! एकटीच राहूं दे मला (2) मोडकेसें घर तुटकेसें छप्पर देवाला देवघर नाही मला दादला नलगे बाई ! फाटकेच लुगडें तुटकीसी चोळी ! शिवाया दोरा नाही ! जोंधळ्याची भाकर आम्बाड्याची भाजी ! वर तेलाची धार नाही ! मोडका पलंग तुटकीसी नवार ! नरम बिछाना नाही ! सुरतीचे मोती गुळघाव सोने !

वाहनमहिमा

लेखक शरद यांनी गुरुवार, 15/11/2012 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
वाहनमहिमा बारामासी दु:ख मानसी वाहतुक दाटे चोहिकडे ! क्षणात होते सिग्नल हिरवे क्षणात फिरुनी लाल गडे !! भवती बघता शतगाड्यांचा गोफ दुहेरी विणलासे ! अरुंद रस्ते काय बांधिले चालक वाटा काढितसे !! झाला पिवळा लाल वाटतो अहा ! अहा ! हिरवा उघडे ! झणी रस्त्यावर, उंच घरांवर काळा काळा धूर उडे !! उठती वरती आणि सभोवती प्रदूषणांचे रंग पहा ! सर्व थरांवर हाय रेखिले भीषणतेचे रूप महा !! वाहनमाला जाता भासे कल्पांताची माळची ते ! उतरूनी येती अवनीवरती कळीकाळची एकमते !! धडधड खडखड आवाज करोनी वाहनचालक सावरती !

जहालभाषाचिकित्सक

लेखक राजेश घासकडवी यांनी सोमवार, 08/10/2012 01:11 या दिवशी प्रकाशित केले.
जहालभाषाचिकित्सकची पार्श्वभूमी सांगाल का? प्रत्येक देशाचे, भागाचे, तिथे राहाणाऱ्या लोकांचे काही विशेष गुणधर्म असतात. तिथल्या जमिनीच्या मातीतून आणि नद्यांच्या पाण्यातून माणसांच्या नसानसांत वहातात. त्यातूनच त्या प्रांताची एक प्रतिमा तयार होते. महाराष्ट्राची तशी प्रतिमा फार मऊ मुलायम नाही असं नक्कीच म्हणता येईल. गोविंदाग्रजांनी महाराष्ट्राचं वर्णन करताना मंगल, पवित्र वगैरे नमन करून झाल्यावर पहिली ओळ कुठची वापरली तर 'राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा' आणि 'अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा' असं म्हटलेलं आहे.

होय ( शर्मिला इरोमसाठी ) : सत्चिदानन्दन यांच्या मलयाळम कवितेचा अनुवाद

लेखक Kavita Mahajan यांनी शुक्रवार, 21/09/2012 18:36 या दिवशी प्रकाशित केले.
माझं शरीर आहे माझा ध्वज अर्ध्यावरचा. मला पाणी मिळतं उद्याच्या नदीतून, भाकरी वार्‍याच्या स्वयंपाकघरातून. माझ्या मेंदूत आहे एक बंदुकीची गोळी हिरवीगार अंतर्ज्ञानी माणसाच्या पोपटासारखी. माझं नाव आहे शेवटचं अक्षर माझ्या पुरातन भाषेतलं शेवटचं उत्तर प्रत्येक कोड्याचं तात्पर्य प्रत्येक म्हणीचं ईश्वर प्रत्येक जादुई सुरावटीचा दुश्चिन्ह... ( सत्चिदानंदन यांनी जयपूर फेस्टिवलमध्ये वाचलेल्या कवितेचा मराठी अनुवाद )