Skip to main content

वाङ्मय

आजच्या मुली

लेखक छत्रपति यांनी सोमवार, 14/01/2008 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
इश्श…" म्हणुन मान खाली घालतच नाहित, हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत "नविन ड्रेस का ग?" विचारले तर ह्यांना येतो संशय "नाहि रे जुनाच आहे", म्हणुन बदलतात विषय नकट्या नाकावर लटका राग दिसतच नाही हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत मी घा-या डोळ्यांचे कौतुक करावे मग तिनेही खुदकन हसावे कशाचे काय….आजकाल गालांना खळ्या कशा पडतच नाहि हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत उद्या घोड्यावर होऊन स्वार येईल एक उमदा तरूण होशिल का माझी राणी विचारेल हात हातात घेऊन गोड गॊड स्वप्ने यांना आता पडतच नाही हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत पोर लग्नाची झाली म्हणुन, घरी आई-बाप काळजीत "माझा नवरा मी कधीच शोधलाय" त्या डीक्लअर
Taxonomy upgrade extras

खूप काही हरवलं आहे!

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 17/12/2007 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, आज बर्‍याच दिवसांनी सुमन कल्याणपुरांचं एक भावगीत कानी पडलं आणि मी खूप वर्ष मागे गेलो. कुठलं होतं ते भावगीत? 'केतकीच्या वनी तिथे नाचला गं मोर!' अगदी साधंसुधंच परंतु हृदयाला हात घालणारं असं हे भावगीत! पूर्वी आकाशावाणी मुंबई 'ब' नांवाचा एक प्रकार होता. त्यावर कामगारविश्व, आपली गाणी, इत्यादी कार्यक्रमात अशी भावगीतं लागायची हे मला आठवतंय. खूप सुख वाटायचं ही गाणी ऐकताना. साधारणपणे ८०-८५ चा तो काळ असेल! किंवा त्याही आधीचा. साधारणपणे ७५ ते ८५ चं दशक असावं. तेव्हा दूरदर्शनचं आगमन झालं होतं. पण आकाशवाणी मुंबई 'ब' चा तेव्हा बराच प्रभाव होता एवढं मला आठवतंय.

माझ्या जातीपाती, माझे धर्म, माझा 'परजात'प्रवेश! :)

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 05/12/2007 00:06 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, तसा मी जन्माने हिंदू बरं का! अगदी कोकणस्थ ब्राह्मण! पण एकूणच आपला जातीपातीवर, धर्मावर तसा विश्वास नाही! अहो नाहीतरी आपल्याला 'मनुष्य-प्राणी' असंच म्हटलं आहे. म्हणजे ऍडव्हान्स बुद्धीचे (म्हणजे 'प्रगत'मेंदू का काय ते म्हणतात ते हो! शिवाय आपला मेंदू 'प्रगत' वगैरे आहे हे आपणच ठरवलं, इतर प्राण्यांनी, वाघसिंह, कुत्रामांजर, एकपेशीय अमिबा वगैरे मंडळींनी ते अद्याप मान्य कुठे केलंय?! अहो सूक्ष्मदर्शक यंत्राशिवाय न दिसणार्‍या जंतूंमुळे आपल्याला साधी अमिबिक डिसेन्ट्री जरी झाली तरी आपण रात्रभर किमान दहा-पंधरा रेघोट्या तरी ओढतोच की!

सिद्धहस्त कवी, लेखक ,समीक्षक : प्रा. केशव मेश्राम

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शनिवार, 01/12/2007 20:24 या दिवशी प्रकाशित केले.

                     प्रा. केशव मेश्राम यांची काही व्याख्याने ऐकण्याचा योग प्रबोधन वर्गाच्या निमित्ताने आम्हास आलेला आहे. अतिशय साधा माणूस. आपण मोठे साहित्यिक आहोत असा आव कधी दिसला नाही. दलित साहित्य, दलित चळवळ, आणि नवलेखकांना प्रेरणा देणारा साहित्यिक म्हणजे, प्रा. केशव मेश्राम. साठोत्तरी साहित्यानंतर ज्या विविध साहित्यप्रकारांनी जन्म घेतला आणि दलित साहित्याकडे वाचक जेव्हा कुतुहलाने पाहू लागला तेव्हा चळवळीला आणि दलित साहित्याला दिशा आणि गती देणारे जे साहित्यिक होते.

महंमद इक्बाल यांची उर्दू शायरी

लेखक मनिष यांनी बुधवार, 28/11/2007 02:20 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्दैवाने काही लोकांच्या मते उर्दू शायरी ही मद्य आणि प्रेयसी ह्यांच्याभोवतीच घोटाळत राह्ते. अर्थातच अर्वाचीन उर्दू साहित्यात विविध विषयांवर लेखन झाले आहे, पण सामन्य मराठी मणसांपर्यंत ते पोहोचले नाही असे वाटते. बर्‍याच वेळा त्यांचा पुर्वदुषित दृष्टिकोनही ह्याला कारणीभूत असतो. असो. वास्तविक पाहता उर्दू भाषेतील अतिशय सुंदर कल्पनाविलास, अप्रतिम प्रतिमा, हळव्या, नाजुक कविकल्पना इतर भाषांमधे अभावानेच सापडतील. उर्दू भाषा ही अतिषय नजाकतदार आणि काव्यमय आहे. वरवर पाह्ता सहज वाटणार्‍या ओळींमधेही गहन अर्थ दडलेला असतो - उर्दू काव्य हे समजावून घेऊन आस्वाद घेण्याचे आहे.

पांढरपेशी कविता

लेखक ॐकार यांनी रविवार, 25/11/2007 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
पांढरपेशी कविता क्षितीज खादी कुरतडताना इमारतींच्या गच्च्या फिरते वणवण ऊन खडीच्या रस्त्यांवरती कच्च्या मिचमिचणारा प्रकाश शहरी जागा चोवीस तास खिडकीमधल्या चंद्रालाही चाळीशीचा त्रास गंधभारला धूर झिरपतो हवेत जर्जर ओल्या मेंदू बुरसट, हृदये कोंदट हवेशीर पण खोल्या गणती नाही किती चिरडली झुरळे पायाखाली दरवाज्याच्या फटीत मेल्या असतील लाखो पाली चादर गुधडत लोळत पडली कळकट मळकट गादी फुटक्या फरश्या मोजत बसली चामखिळींची लादी शौचकूपांच्यासभोती फुलल्या उठवळ बागा कुंपणही मागत आहे त्याच्या हक्काची जागा जुनाट खुर्ची दुवे सांगते गतकाळाचे काही आजकालच्या प्लायवूडची ती पुण्याई नाही! दर्प सांगती अभिमानाने उच्छ्व