Skip to main content

समाज

ओनामा

लेखक प्रसन्न केसकर यांनी मंगळवार, 09/06/2009 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
मायबापहो, मिसळपाववर गेले बरेच महिने येवून आस्वाद घेत होतो. काहीतरी आपणही करावे असे बरेच दिवस वाटत होते पण धाडस होत नव्हते. जरी व्यवसाय लिहिण्याचा असला तरी ललित अक्कल नाही ना कधी लिहिण्याची शैली तयार केली. आज मुलाची शाळा सुरु झाली आणी गेले काही दिवस डोक्यात घोळत होते ते काळ्यावर उतरावे अशी ऊर्मी आली. त्यामुळे हे लिहिले. ओनामा तर केलाय पण भट्टी जमली आहे असे काहि वाटत नाही पण चुका पोटात घाला आणी जर लिहून अजून छळू नये असे वाट्ले तर तसेही कळवा. पुनेरी आज नऊ जून..... गोटूची शाळा आज परत सुरु झाली.

शिवराज्याभिषेक दिन -

लेखक मुक्तसुनीत यांनी गुरुवार, 04/06/2009 07:46 या दिवशी प्रकाशित केले.
आज ५ जून शिवशक ३३६ जेष्ठ शुध्द त्रयोदशी म्हणजेच शिवराज्याभिषेक दिन. यानिमित्याने रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा !!

साखरेचे खाणार त्याला..!

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 01/06/2009 19:01 या दिवशी प्रकाशित केले.
तसा मी लहानपणापासूनच गोडघाशा. साजूक तुपातला शिरा, केळ्याचे काप घातलेला सत्यनारायणाचा शिरा असेल तर विचारूच नका, माझा य-य आवडता पदार्थ आहे! (आई सत्यनारायणाच्या प्रसादासाठी मोठ्या पातेल्यात आणि माझ्या खादाडीसाठी वेगळा छोट्या पातेल्यात शिरा काढून ठेवायची आणि लहानपणी मला कधीच तीर्थप्रसाद देण्यासाठी बसवले जात नसे! :S ) (पण इथे एक धोक्याचा इशारा द्यायला मी विसरेन असे वाटते त्याआधीच सांगतो - मुगाचा साजूक तुपातला शिरा हा पदार्थ मी एकदाच खाल्ला -आणि अक्षरशः मुगदळासारखा पुढचा संपूर्ण दिवस बसून होतो! एवढा जड पदार्थ मी आयुष्यात पुन्हा खाल्ला नाही.

अण्णामामा.

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 29/05/2009 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
३० मे २००८. मी ऑफिसला निघण्याची तयारी करत होतो. सकाळी सकाळी फोनची रिंग वाजली, नंबरात ९१ आकडा दिसत होता म्हणजे भारतातून फोन होता. शुक्रवारी सकाळी फोन? जरा चमत्कारिक वाटलं. "दादा, अण्णामामा गेला!" पलीकडून बहीण बोलत होती. "आं...कधी? कसा काय?" "आजच. मल्टिपल ऑर्गन फेल्युअर! हा फोन झाल्यावर आईला लग्गेच फोन कर. तिला खूप टेन्शन आलंय!" तिचा आवाज कापत होता. ऐकत होतो. शेजारच्या खुर्चीत खचलो. हार्ट ऍटॅक नंतर हॉस्पिटलमधे भरती केल्यावर एकेक सिस्टिम फेल होत गेली आणि शेवटी गेला. मुलगा स्वतःच डॉक्टर त्यामुळे काळजी घेण्याची परिसीमा असणार हे उघड होतं. अमेरिकेतून मुलगीही आलेली होती.

एका छिद्रान्वेषी वैतागसम्राटाची डायरी...

लेखक भडकमकर मास्तर यांनी शनिवार, 23/05/2009 01:49 या दिवशी प्रकाशित केले.
१ जानेवारी २००९ साली ही डायरी लिहायची म्हणजे कटकट आहे.. ही नवी भलीमोठी डायरी आणली त्यासाठी .. आता सहज म्हणून अनुदिनी लिहावी ( की दैनंदिनी.. जाउदे मरुदे ना..)म्हटलं तर इतकी मोठी डायरी केवळ नाईलाज म्हणून आणावी लागली... कारण काय तर छोटी डायरी जवळच्या स्टेशनरीवाल्याकडे नाही... लुटतात भ*वे... ... घरी आलो तर पेन मिळेना... बरं... सकाळी शर्टाच्या खिशाला लावलेलं पेन ऑफिसात विसरलो... आता ते टेबलाच्या खणात राहिलं का कोणी पळवलं आठवत नाहीये... छ्या ..

कैफियत ....

लेखक बट्ट्याबोळ यांनी बुधवार, 20/05/2009 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
मगील रंगपंचमीच्या काहीच दिवस आधी विलासअण्णा ने राष्ट्रवादीत स्वीच मारला होता. तेव्हा तो ही फॊर्मात होता आणि साहेबही. मध्यांतरीच्या काळात विलासरावपुरस्क्रुत नवनिर्माणकारांनी राज्यपातळीवर राडा करून स्वत:चा मतहिस्सा रखून ठेवला होता. कार्याध्यक्शांनी देखील शेतक-यांच्या काळजाला हात घालून आपली मुळे ग्रामीण भागात पसरली होती. क्रिकेट आणि क्रुषी हे दोन्ही सांभाळता साहेबांचं राज्यपातळीवर तस दुर्लक्शच झालं. परिणामी लोकसभा निवडणूकीत विलासअण्णाच्या पक्शाने नांगी टाकली. एव्हना विलासअण्णा च्या राष्ट्रवादी प्रवेशाने गल्ली-कोंग्रेसमधे तयार झालेली पोकळी सच्या कोल्हांडगे याने भरून काढली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अस्ताची सुरवात?

लेखक भोचक यांनी बुधवार, 20/05/2009 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
''राष्ट्रवादी कॉंग्रेस हा काही नव्याने स्थापन झालेला पक्ष नाही. ती वैयक्तिक बळावर निवडून येणार्‍या नेत्यांची मोळी आहे,'' ही व्याख्या राज ठाकरे यांनी केलीय म्हणून दुर्लक्षिता येणार नाही. कारण त्यात बर्‍याच अंशी सत्यही आहे. कारण पक्ष स्थापन करताना त्याची एक निश्चित भूमिका, विचारधारा आणि धोरण असायला लागते. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसला नाही आणि नव्हते. वास्तविक निवडणूक संपली असताना आणि सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू असताना, त्यातही राष्ट्रवादी कॉंग्रेस या सरकारमध्ये सामील होत असताना हा प्रश्न उपस्थित होण्याचे कारण काय? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो.

फडफड फडफड फडकतो.....

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी मंगळवार, 19/05/2009 03:35 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या लहानपणी टीव्ही म्हणजे फक्त संध्याकाळीच आणि ते पण फक्त एकच वाहिनी... खरं म्हणजे तेव्हा वाहिनी / चॅनल वगैरे शब्दच माहित नव्हते. टीव्ही हा एकच शब्द. तर, अशा त्या टीव्हीवर कधीमधी समूहगान असा एक प्रकार असायचा (आणिबाणी नुकतीच संपली होती पण काही नवीन प्रकार देऊन गेली होती, त्यातलेच समूहगीत हे एक). त्या समूहगीतांमधे एक गाणे नेहमी ऐ़कू यायचे... "ध्वज विजयाचा उंच धरा रे..." त्यातले ते लांबवलेले हुंऽऽऽ चांगलेच आवडायचे. पण ध्वज / झेंडा वगैरे काही प्रकार असतो हे तेव्हाच लक्षात आले होते. थोडं मोठं झाल्यावर मी आणि माझी आई एक खेळ खेळायचो. नकाशात एखादं गाव शोधायचं किंवा देश शोधायचा.

एकम् सत्

लेखक विकास यांनी सोमवार, 18/05/2009 19:54 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकेत हा मौसम पदवीदान समारंभाचा आहे. मिडलस्कूल (सातवी), हायस्कूल (१२वी) पासून ते बॅचलर्स आणि इतर उच्चशिक्षणाच्या पदवीदान समारंभास येथे शाळा, विश्वविद्यालये, पालक, शिक्षक, आणि विद्यार्थी सर्वच महत्व देतात. त्या समारंभानंतर होणार्‍या पार्ट्या आणि त्या समारंभात मिळणारा एखाद्या माननीय पाहुण्याकडून मिळणारा उपदेश हा अतिशय मनापासून ऐकत, कधी कधी त्या पाहुण्याच्या राजकीय/सामाजीक विचारांमुळे धुडकावत, पण त्याला त्या त्यावेळेचे आणि त्या त्या स्थानामधे अनन्यसाधारण महत्व दिले जाते. तो पर्यंत झालेला सर्व त्रास हा मुले आणि पालक विसरून जातात...