Skip to main content

समाज

एका रात्रीत वजन दोन ते अडीच किलोने घटवा

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 18/05/2009 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या जीवनात सर्वानाच वाढत्या वजनाची काळजी लागलेली असते. वजन ही अशी गोष्ट आहे की जी वाढताना कळत नाही. पण उतरवताना खिशासहीत सगळेच हलके करते. मी एक अनुभव घेतलेला आहे त्यामुळे वजन एका रात्रीत ( म्हणजे "ओव्हरनाईट" उगाच अपसमज नकोत) दोन ते अडीच किलोने कमी होउ शकते. कोणतेही विनोदी व्यायाम प्रकार न करता / कोणतेही महाग औषधोपचार न करता वजन दोन ते अडीच किलोने कमी करणे शक्य आहे का? अनुभवान्ती म्हणेन हे सहज शक्य आहे. कसे?...... किती जणाना हे माहित करुन घ्यायचे आहे? ...................................................................

होय निगेटीव्हच

लेखक विनायक पाचलग यांनी शुक्रवार, 15/05/2009 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसापुर्वी मी लोकप्रभात आलेल्या पराग पाटील यांच्या नकारात्मक मतावर भाष्य करणार्‍या लेखावर माझा प्रतिसाद दिला होता .तोच प्रतिसाद येथे देत आहे. विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे हाच लेख आज प्रतिसादाच्या रुपाने का होइना लोकप्रभात प्रकाशीत झालेला आहे.आज आलेल्या अंकात तुम्ही तो वाचु शकता. मुळ लेख- http://www.loksatta.com/lokprabha/20090501/mind.htm माझा प्रतिसाद- http://www.loksatta.com/lokprabha/20090522/vachak.htm

अमेरिकन मंदी- उद्धव कांबळे ह्यांचे लेख

लेखक अजय भागवत यांनी रविवार, 10/05/2009 08:57 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकन मंदी ह्याविषयावर श्री. उद्धव कांबळे ह्यांचे दोन लेख लोकसत्तेत प्रकाशित झाले आहेत. हे दोन्ही लेख अभ्यासपूर्ण असून संग्रहणीय आहेत- सध्या मिपावर श्री. क्लिंटन हे जागतीकीकरणावर उत्तम लेख देत आहेत. त्याला पुरक असाच हा विषय असल्यामुळे हे संदर्भ येथे द्यावेसे वाटले.

कृष्ण

लेखक दशानन यांनी गुरुवार, 07/05/2009 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
कृष्ण पाडवांच्या विंनती नूसार हस्तिनापूरला दुर्योधनासमोर पांडवांचा संधी प्रस्ताव घेऊ निघाले होते... त्यांच्या सारथी दारुक कृष्णाला विचार मग्न पाहून विचारतो की "महाराज, आपण दुखी आहात की आनंदी हे आपल्या चेह-याकडे पाहून मला समजले नाही कृपया आपण स्वतःच सांगा" "सारथी दारुक! तो बघ अस्ताला चालेला सुर्य ! प्रभात काळी तो विजेता असतो.. एकदम तेजस्वी...व जेव्हा अस्ताला चालेला असतो तेव्हा देखील तो अक्राळस्तेपणा न करता धीर गंभीर पणे.. शांत... रक्तमय लालीमा अंगावर खेळवत... आपला पराजय खुल्या मनाने स्वीकारत.... पुन्हा लढण्याची... उद्या उगवण्याची तयारी करत चाललेला असतो !

तीच खरी श्रध्दांजली....!

लेखक विनायक पाचलग यांनी मंगळवार, 05/05/2009 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
रविवारचा दिवस हा साहित्यसृष्टीतीलच काही काळया दिवसांपैकी एक होता. का ते तुम्ही जाणताच! ज्येष्ठ साहित्यीक, वक्ते, राम शेवाळकर काल अनंतात विलीन झाले. माझे भाग्य की, दोन वर्षापूर्वी आणि 2-3 महिन्यापुर्वी असे दोनदा या सारस्वातातीलच हि-याचे शब्द मला कानात साठवण्याचा योग आला.

सोसायटी आणि बॅचलर

लेखक निखिल देशपांडे यांनी सोमवार, 04/05/2009 19:10 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवारी सकाळी लवकरच भद्रा मारुती दर्शनाला निघालो. गाडी चालवताना फोन वाजला, बघितल तर घरमालकांचा फोन. घरमालकः- निखिल कुठे आहात??? मुंबई मधे आहात का??? मी:- नाही हो, सध्या मी घरी आलेलो आहे. घरमालकः- तुमच्याशी थोडे बोलायचे होते. मी:- सध्या गाडी चालवत आहे, तुम्हाला साधारण तासभरात फोन करतो. घरमालकः- ठीक आहे पण आठवणीने फोन करा माझ्या डोक्यात पहिला विचार आला आज तर दोन तारीख आहे ह्यांना लवकर घरभाडे पाहिजे असणार ह्या वेळेस. तसेच सगळे काम आटपुन एक तासाच्या आत घरी पोहचतच होतो तेव्हा परत त्यांचा फोने आला.

संवादाचा सुवावो

लेखक भोचक यांनी रविवार, 03/05/2009 18:58 या दिवशी प्रकाशित केले.
ज्येष्ठ साहित्यिक, प्रख्यात वक्ते आणि संत साहित्यासह संस्कृत साहित्याचेही गाढे अभ्यासक राम शेवाळकर यांच्या निधनाची बातमी कळाली नि गलबलून गेलो. शेवाळकर नाशिकला नित्य यायचे. नाशिकच्या देशदूत या वृत्तपत्रातर्फे सारडा व्याख्यानमाला होते. त्यात शेवाळकरांचे व्याख्यान ठरलेले असायचे. एकदा या व्याख्यानमालेत त्यांचे ज्ञानेश्वरीवरच्या एका अध्यायावरचे ओजस्वी निरूपण ऐकले नि प्रचंड प्रभावीत झालो. हा माणूस 'ग्रेट' आहे, एवढे जाणवले.

माझी गादी

लेखक निखिल देशपांडे यांनी रविवार, 03/05/2009 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
(हा एक अतिशय फालतु लेख आहे त्या मुळे वाचणार्‍यांनी स्वः जवाबदारीवर वाचावा.) मित्रांनो ही कथा आहे एका गादीची. मला वारसाहक्काने मिळालेल्या गादिची. गेल्या काही वर्षापासुन ह्या गादिवर हक्क सांगणार्‍या लोंकामधुन आता फक्त माझा ह्या गादीवर हक्क आहे ह्याचा आनंद काहीतरी वेगळा आहे. ह्याच गादीसाठी आमच्या घराण्यात अनेक वेळा भांडण तंटे झाले. तर अशीही आमची गादी. काय रे कोण म्हणतोय पानाची गादी म्हणुन.

रिक्षावाले, संप आणि आम्ही ...

लेखक छोटा डॉन यांनी शनिवार, 02/05/2009 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी (जरासे अंमळ उशीरानेच) उठलो, नेहमीच्या सवयीनुसार आधी लॅपटॉप चालु करुन नेट चालु केले व काय चालु आहे ह्याची चाचपणी केली. सकाळ-सकाळ एका महत्वाच्या बातमीने आमचे लक्ष वेधुन घेतले ( काळजी नको, अजुन कोण नवा चप्पल्/बुट फेकीचा नवा बकरा झाले नाही. त्याबद्दल सविस्तर नंतर कधीतरी.) ते म्हणजे "दरकपातीच्या निषेधार्थ पुण्यातले २५००० रिक्षावाले संपावर ....". हीच बातमी जवळपास सगळ्या पेपरमध्ये आणि सोशल वेबसाईटवर दिमाखात झळकत आहे. बरोबर आहे ना, अहो हा प्रश्न "पुण्याशी" निगडीत आहे ना, मग त्याला "वैश्विक प्रश्नाचा" दर्जा नको द्यायला ?

दुनियादारी - माझ्या नजरेने !

लेखक दशानन यांनी शुक्रवार, 01/05/2009 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
दुनियादारी ह्या पुस्तकाबद्दल मी सर्व प्रथम मिपावर वाचले व मनात आले हे पुस्तक तर हवेच हवे आपल्याकडे, शोकेससाठी नाही वाचण्यासाठी. सागर ह्यांच्याशी संपर्क झाला व लगेच काही दिवसामध्ये ते पुस्तक हातात मिळाले, माझ्या चपराशीने जरा गोंधळ घातला त्याला ते पुस्तक नावावरुन हिंदी वाटले व संध्याकाळी आलेले कुरियर सरळ घरी घेऊन गेला, पण दुस-या दिवशी क्या साब म्हणत मला परत ही केले.