Skip to main content

समाज

50 First Dates आणि गोजिरी

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 21/10/2010 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
काल दुपारी मस्त '१४०८' हा भयपट पहात बसलेलो असतानाच एक मैत्रिण आली. भयपटाची तिला बिलकुलच आवड नसल्याने आणि मुख्य म्हणजे ती २/२.३० तास मुक्काम ठोकण्याच्या इराद्यानेच आलेली असल्याने मग 'एखादा मराठी पिक्चर लाव रे !' अशी फर्माईश आलीच. मग इकडे तिकडे शोध घेत असतानाच अचानक कधितरी कॉपी करुन ठेवलेला 'गोजिरी' चित्रपट हाताला लागला. (भवतेक मकीच्या कडुन मिळाला असावा. खात्री नाही) चित्रपट सुरु झाला आणि काही वेळातच मैत्रिण पटकन ओरडली अरे हा असाच चित्रपट आधी कुठेतरी पाहिला आहे.

को जागृति ? को जागृति ? @@@@@@ मी ! मी !

लेखक स्पंदना यांनी गुरुवार, 21/10/2010 09:36 या दिवशी प्रकाशित केले.
(सदर लेख लिहिताना आम्ही परकाया प्रवेश केला आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी) सीटटया न अगदी दोन दिवस डोकं खाल्ल होत ! तो, मी अन आमच्याच ऑफिसातली आणि दोघं असं मिळून 'पार्टी ' करायची असा त्याच्या मनातला बेत तो माझ्या गळी उतरवायला बघत होता. आता या २०१० साली तुम्ही म्हणाल 'मग काय ? जायचं ! त्यात काय असं नव ?' पण मंडळी ही गोष्ट; हे आत्ता जे सार पार्टी, पिण, अन धमाल करत फिरणं सुरु असतंय त्ये सार करणं फकस्त पिक्चर मध्ये असायचं, त्या काळची !!

झोप.

लेखक मराठमोळा यांनी सोमवार, 18/10/2010 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो/मैत्रिणींनो, झोप. निसर्गाने सर्व प्राण्यांना दिलेलं एक वरदानच म्हणता येईल. झोप घेण्याने थकवा आणि शरिराची झीज भरुन येते. झोप किती तासांची असावी, कधी झोपावे कधी उठावे याबाबत बरेचसे युक्तीवादपण होत असतात. पण या झोपेचे खरं तर एक रहस्यच आहे. झोपेत माणुस कसा असतो हे त्याला कधीच कळत नाही. खरं तर झोप म्हणजे मेल्यानंतर जी अवस्था होत असावी तीच असं माझं मत आहे. असो, तर या झोपेचेही व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणीप्रमाणे प्रकार आहेत. यावरुन गमतीजमतीही बर्‍याच होताना दिसतात. दिवसा झोपणे आणि रात्री झोप न येणे आणि दुसर्‍या दिवशे ऑफिसात झोप येणे हा एक जगभर पहायला मिळणारा प्रकार आहे.

अभिनंदन...

लेखक अवलिया यांनी शुक्रवार, 15/10/2010 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
होईल की नाही, झाले तर कसे होईल, कुणी भाग घेईल की नाही आणि अशाच अनेक वादांच्या भोवर्‍यात सापडलेली १९वी राष्ट्रकुल स्पर्धा एकदाची पार पडली. केवळ पारच पडली नाही तर भव्य दिव्य स्वागत आणि सांगता समारोह, भारतीय स्पर्धकांची उत्कृष्ट कामगिरी आणि इतर अनेक भुषणास्पद गोष्टींमुळे ही स्पर्धा कायम स्मरणात राहिल. सर्व स्पर्धकांचे, आयोजकांचे, भारताचे आणि पर्यायाने आपल्या सर्वांचे अभिनंदन ! भारताचा तिरंगा असाच दिमाखात फडकत राहो ही सदिच्छा !! जय हिंद !!