Skip to main content

समाज

बंडू आणि मुखपुस्तकातले उरोजकर्क स्थितीसंदेश!

लेखक नगरीनिरंजन यांनी रविवार, 10/10/2010 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
काही महिन्यांपुर्वीची गोष्ट. शनिवारची सकाळ, म्हणजे तसे दहा वाजून गेलेले, पण तरीही ती सकाळच. शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत ऑफिसात इमर्जन्सी रिलीजवर काम करून, आयटीतला माणूस झोपू शकेल तितपत, ढाराढूर झोपलेला बंडू रस्त्यावरच्या वाहनांच्या कर्कश कलकलाटाने जागा झाला. बिछान्यावर पडल्या पडल्याच त्याने कानोसा घेतला. स्नेहलता आयटीत असल्यामुळे स्वयंपाकघरातून पोहे-उप्पीट वगैरेचा खमंग वास येणे शक्य नाही हे माहिती असूनही उगाचच वेडी आशा लावून त्याने एक खोल श्वास घेतला.

आम्हीही पाणी वाहून आणतो !!!

लेखक लतिका धुमाळे यांनी गुरुवार, 07/10/2010 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
जर्मनीत आल्यावर माझ्या लक्क्षात एक गोष्ट आली , ईथे गाड्यानची डिकी मोठी असते. त्यात खूप सामान मावते. डिकी उघडली की त्यात बाटल्यान्चे क्रेट्स दिसायचे, सुरवातीला मला वाटले बियरच्या , फळाच्या रसाच्या नाहितर वाईनच्या बातल्या असतील. पण लक्क्षपूर्वक बघितल्यावर लक्क्षात आले की पाण्याच्या बाटल्या जास्त असतात. गाडी कोणतीही असूदे , मर्सडीज, बीएमड्ब्ल्यू , कोणतीही , प्रत्येकजण गाडीतून पाणी वाहून नेत असतो. निरनिराळी पेय मिळणारी मोठी मोठी दुकाने असतात, त्या समोर किमती गाडयात पाण्याच्या बाटल्यान्चे क्रेट्स ठेवताना मी कितीतरी लोक पाहिले आहेत.

तुझ्या उंबऱ्याची माती

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी बुधवार, 06/10/2010 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
तसं पाहिलं तर सत्शील व्यक्तिंनी उंबरा ओलांडू नये असे म्हणतात. त्यामानाने तुझा उंबरा फारच मोलाचा. जणू एखादी लक्ष्मणरेखाच. ती ओलांडली की माणसाने सद्गुणांना सोडले असे मानतात. वर्षअखेरीस तुझ्या उंबऱ्‍याच्या अलिकडे अगणित सद्गुणांची भली मोठी रास साठलेली असते. ती आम्हां 'अ'शीलवंतांना खुणावते. त्या राशीने भारीत झालेली मूठभर माती जरी मिळाली तरी उंबऱ्‍या पलिकडे जाऊन केलेल्या कुकर्मांचे प्रायश्चित्त मिळाल्यासारखे वाटते. ती दिव्य मृत्तिका आम्ही ढोल ताशे बडवित वाजत गाजत तुझ्याच वस्तीतून आमच्या ग्रीनलाईटच्या दुनियेत आणतो.

टेकडीच्या माथ्यावर

लेखक दत्ता काळे यांनी बुधवार, 06/10/2010 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
मी महात्मा सोसायटीच्या मागच्या टेकडीवर व्यायामाच्या निमित्ताने फिरायला जात असे. हल्लीही जातो पण दोन वर्षापूर्वी जसा सलग दोन वर्षे नित्यनियमाने जात असे तसे आता काही राहीले नाही. पण अजूनही टेकडीवर कधी गेलोच तर पूर्वीचाच ताजवा जाणवतो. टेकडीवरच्या कितीक मजेशीर आणि अन्य प्रसंगामुळे टेकडीवर फिरायला जाणे हि कल्पना दिवाळीच्या सणाइतकी मनाला प्रसन्नता देणारी असते. पश्चिम ते पूर्व असा विस्तार असणार्‍या ह्या टेकडीचे एक टोक पश्चिमेकडे मुंबै-बंगळूर हायवेकडे तर पूर्वेचे गांधीभवन-डहाणूकर कॉलनी भागाला वळसा घालून कर्व्यांच्या कॉलेजकडे उतरते. टेकडीवर मी पश्चिमेच्या दिशेने न जाता पूर्वेच्या दिशेने जातो.

हनुमानाचा शाप व त्यावर उतारा

लेखक रणजित चितळे यांनी बुधवार, 06/10/2010 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
अंतिम भाग गुरवारी (७ आक्टोबर) ला प्रसिद्ध ब्रिटीश सेनानी फिल्ड मार्शल फिलिप चेटवुडच्या शब्दात थोडा बदल करुन राष्ट्रव्रती कसा असावा हे थोडक्यात सांगतो - आपल्या राष्ट्राची सुरक्षा, राष्ट्राचा सन्मान आणि राष्ट्राचे कल्याण - नेहमीच सगळ्यात आधी. तदनंतर आपल्या परिवाराचा सन्मान, परिवाराचे कल्याण आणि परिवाराची सोय. स्वतःची सोय, स्वतःचे कल्याण व स्वतःची - सुरक्षा शेवटी, नेहमीच शेवटी. हनुमानाचा शाप व त्यावर उतारा – पहील्या भागात आपण प्रामुख्याने खालील निर्देशित मुद्द्यांवर चर्चा केली.

अकलेचे तारे आणि जावईशोध

लेखक भाऊ पाटील यांनी मंगळवार, 05/10/2010 18:57 या दिवशी प्रकाशित केले.
सुमार काँग्रेस्करांनी त्यांच्या आजच्या अग्रलेखात राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेवरुन (काहीच्या )काही तारे तोडलेत आणि जावईशोध लावलेत. त्याची उदाहरणे: १) राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा भरवल्याने रोजगारनिर्मितीतही आपण जी भरारी मारली आहे, ती लक्षात घ्यायला हवी. ‘असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री ऑफ इंडिया’ने या संदर्भात दिलेली आकडेवारी पुष्कळच बोलकी आहे. देशांतर्गत उत्पादनात वाढ होऊन ते एक लाख सतरा हजार कोटी रूपयांवरून एक लाख पंचाहत्तर हजार कोटी रूपयांवर पोहोचणार आहे.