Skip to main content

समाज

गुंजग्रामीचे दिवस

लेखक यकु यांनी मंगळवार, 23/11/2010 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांतील बामणांच्या पोरांचे बालपण जसे जात तसेच माझेही गेले. पण कदाचित इतर पोरांना जी मौज पाहायला भेटली नसेल ती आम्हाला दर गुरूवारी पाहायला मिळायची. आमच्या गावाच्या डगरीखालून वाहणार्‍या गंगेच्या (खरं म्हणजे ही गोदावरी, पण तिला सगळे गंगाच म्हणतात) तीरावरच गुंज क्षेत्र नावाचे दत्तसंस्थान असलेले एक गाव होते. अजूनही आहे. पण आता तिथं ती मौज मात्र राहिली नाही. आमच्या घराण्यात पन्नास पाऊणशे वर्षांपूर्वी दत्तोपासना सुरू झालेली आणि सकाळी-सकाळी प्रत्येकाचा पाठ, घंटा, पंचपदी वगैरेंची नुसती गडबड. चांगला चौसोपी किल्ल्यासारखा वाडा. वर माडी.

महाराष्ट्र दर्शन - भाग ३/ "वेरूळ "

लेखक स्पा यांनी सोमवार, 22/11/2010 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ - http://www.misalpav.com/node/15474 भाग २ - http://www.misalpav.com/node/15500 अर्ध्या तासात वेरूळ आले सुद्धा ...... मला नुकतीच झोप लागली होती.... परत बस मधून उतरा.... तेसुद्धा १ च्या रणरणत्या उन्हात...... जीवावर आलं होत.... "पण" वेरूळ ला जाण्याचीच एवढी ओढ होती, कि बाकीचे त्रास त्यापुढे नगण्य वाटत होते..... एका मोठ्या "उद्यानासमोर" बस थांबली .......समोरच वेरुळच्या जगप्रसिद्ध लेण्या दिसत होत्या.... बघूनच मन "प्रसन्न" झालं.... आमच्या गाईड ची पीर पीर सुरु झाली . इथे एकूण ३४ लेण्या आहेत .

महा भारत

लेखक तिमा यांनी सोमवार, 22/11/2010 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
सन २०५१. नोव्हेंबरचा महिना. भारताची अभूतपूर्व प्रगती करुन दाखवणार्‍या महानेत्याचा सत्कार व प्रगट मुलाखत होती. वार्ताहरांचे थवे व्यासपीठाभोवती जमले होते. त्यांच्यामागे अफाट जनसागर पसरला होता. तो ट्रकने आणला नव्हता, तर उस्फूर्तपणे आला होता. प्रारंभी दोन चार नेत्यांची भाषणे झाली. त्यानंतर प्रमुख विरोधी नेत्यातर्फे महानेत्याला नोटांचा हार घालण्यात आला. महानेत्याने सत्काराचा स्वीकार केला आणि तो भाषण द्यायला उभा राहिला. मित्रहो, तुमच्या प्रेमाने मला भरुन आले आहे. अल्पवर्षात या देशाची झालेली प्रगती पाहून मला देखील आश्चर्य वाटत आहे. पण या सर्वाचे श्रेय आमच्या गुरुंचे आहे.

आपणच नालायक आहोत!!

लेखक दिनेश५७ यांनी सोमवार, 22/11/2010 10:57 या दिवशी प्रकाशित केले.
’होऊन जाईल तुमचं काम... साडेआठ हजारात. पण कॅश द्या. चेक नको. परवाची वेळ घेऊन टाकतो. तासाभरात काम होऊन तुम्ही मोकळे’... त्या ’एजंटा’नं समोर बसलेल्या जोडप्याला सांगितलं, आणि त्यातल्या नवर्‍याचा चेहेरा खुलला. ’म्हणजे रजा घ्यायला नको’... तो आनंदानं पुटपुटला. दोघंही उठले, आणि बाहेर पडले. एजंटानं ड्रावर उघडून फ़ाईल बाहेर काढली आणि कॅलक्युलेटर काढून भरभरा काहीतरी आकडेमोड केली. दोन मिनिटांनी फाईल पुन्हा ठेवताना त्याच्या डोळ्यात समाधान साचले होते... दोन दिवसांनंतर ठरल्याप्रमाणे ते जोडपं सकाळीच त्या ऒफिसात येऊन हजर झालं.

घाण्या वरचा बैल

लेखक रणजित चितळे यांनी सोमवार, 22/11/2010 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
(ईयत्ता सहावीच्या कवीतेवर आधारीत) गोष्ट एका गावातली. तेलाची घाणी अन् त्यात कोलुवर फिरणारा बैल. बैलाच्या गळ्यातली वाजणारी घंटा म्हातोबाला दिलासा द्यायची. म्हातोबा शेजारच्या खोपट्यात आडवा पडलेला. त्याला त्या घंटेचा आराम. जो पर्यंत ती घंटा किणकिणायची तो पर्यंत सगळे व्यवस्थित चालले आहे ह्याची त्याला खात्री. मग तो खुशाल झोप काढायचा. जेव्हा बैलाला तहान भुक लागायची तेव्हा घंटा वाजायची थांबायची. ती थांबली की लागलीच एक बादली आंबोण त्याच्या पुढे तो घालायचा. त्याच वेळेस सुकं खोबरे घाणीच्या तोटीत आहे का पाहुन लागेल तसा नवा घाणा तयार करायचा. हे असे संध्याकाळ पर्यंत चालायचे.

ब्लॉग माझा - ३ : विजेत्यांचे अभिनंदन

लेखक छोटा डॉन यांनी सोमवार, 22/11/2010 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
सालाबादप्रमाणे ह्या ही वर्षी स्टार माझा आयोजीत 'ब्लॉग माझा' ह्या मराठी आंतरजालावर मुक्तपणाने आणि उत्साहाने भरभरुन लिखाण करुन आपल्या मायबोली मराठीच्या सेवेत असलेल्या मराठी जालनिशीकारांची ( मराठीत ब्लॉगर्सची ) स्पर्धा मोठ्ठ्या उत्साहात आणि जोशात पार पडली. नेहमीसारखाच ह्या ही वर्षी स्पर्धेला स्पर्धकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला असेल ह्याची खात्री आहे. लोक लिहीतच असतात, प्रतिसाद मिळाले तरी लिहतात आणि नाही मिळाले तरी जास्तच पेटुन लिहतात.

मुंबई

लेखक यकु यांनी रविवार, 21/11/2010 18:40 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईमुंबई पाहिली मुंबई जीवंत नगरी ती मरती मुंबई जगती मुंबई, खाती मुंबई, पिती मुंबई पळती मुंबई जळती मुंबई हसती मुंबई खेळती मुंबई झुकझुक गाड्या अचाट वेळा ढण ढण भोंगा गाडीत झोपा भजनकिर्तन भिक्षेकरिता निर्लज्ज नर्तन पंचम तारा आलिशान कारा स्पेशल स्यूट अन सर्व पसारा फुका जन्मती मुकाट मरती जगती आणि पुन्हा निपजती इथेच बंगले इथेच कारा ऐंशीच वर्षे किती पसारा लोकल रिक्षा विमान एस्ट्या गुगल फोन अन कडक नोटा बारच नाही बाला सुध्दा पितापिताना उलट्या नुस्त्या जगताजगता मरण धडकते पुरतच नाही जग हे रडते

चिरंजीव चिंटू-२

लेखक डावखुरा यांनी रविवार, 21/11/2010 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
दि : २१.नोव्हें.२०१०; आज आपल्या सगळ्यांचा लाडका "चिंटू" एकोणिस वर्षे पूर्ण करून विसाव्या वर्षात पदार्पण करतो आहे. प्रचंड लोकप्रियता लाभलेली ही चित्रमालिका तब्बल १९ वर्षापासुन सकाळच्या वृत्तपत्रमालिकेतुन प्रसिद्ध होउन लहानांपासुन मोठ्यांपर्यंत ईतर कोणत्याही बातमी कडे कटाक्ष टाकण्यापुर्वी चिंटू कडे जायला भाग पाडतो...ह्यातच ह्या मालिकेचे यश सामावलेय.. सतत दोन दशके वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा चिंटू २० व्यात पदार्पण करणार. चारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर यांचा मानसपुत्र असलेला

म्हातारपणीची प्रार्थना

लेखक अरुंधती यांनी रविवार, 21/11/2010 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
परवा ईमेलामधून इंग्रजी भाषेतील एक फार मार्मिक प्रार्थना वाचायला मिळाली. ''प्रेयर फॉर दि एजिंग''. खरे तर ती बर्‍यापैकी गंभीरपणे लिहिली गेली आहे. त्या प्रार्थनेत काही नर्म विनोदी छटा तर थोडासा उपरोधही जाणवला. कदाचित इतरांना जाणवणार नाही. असो.... ज्याचे त्याचे आकलन!! प्रार्थना असल्यामुळे ती ना धड काव्यप्रकारात मोडत आहे, ना गद्यात. पण तिचा आशय लक्षवेधक आहे. म्हातारपणीच्या किंवा वय वाढत जाईल तशा आढळत जाणार्‍या या स्वभावखुणा आणि त्यांची ह्या प्रार्थनेतून उमटलेली जाणीव मला आवडली. मूळ लेखक/ कवी माहीत नसल्यामुळे त्याचे/ तिचे नाव येथे देता येत नाहीए.

महाराष्ट्र दर्शन - भाग २/ "दौलताबाद"

लेखक स्पा यांनी गुरुवार, 18/11/2010 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ दुवा, अंबाजोगैहून २ वाजता निघालो खरे, पण मोठा प्रॉब्लेम झाला , त्यादिवशी private गाड्या दिसतंच नव्हत्या,जादा गाडी ४ ची होती,म्हणजे जर ती गाडी पकडली असती तर पोहोचे पर्यंत ११-१२ वाजले असते. मग काय २.१५ च्या "लाल डब्यात" कसे बसे चढलो ( तिथेच माती खाल्ली). ती बस already खच्चून भरलेली होती.... सुरु झाल्यावर कळलं , कि आपल्याला औरंगाबादच्या तिकिटात , Essel world ची सफर सुद्धा फुकटात लाभणार आहे.....खिळखिळेपणाचा कळस होती ती बस.... एवढ्या टिनपाट डब्यात पहिल्यांदाच बसलो होतो. पहिल्या १० मिनटातच सगळी हाडं ढिली झाली... त्यात बसायला जागा नवती...