मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राजकारण

कार्ट्यांस...

नगरीनिरंजन ·
मिपावरच्या सर्व कार्ट्यांस समर्पित. (चालः चल री सजनी अब क्या सोचे) लिही रे भावा तू अपुल्या मनचे डोहाळे कशाला प्रतिक्रियांचे लिही रे... टाकून खरडी भिक्षा मागणे जमवून कंपू गोंधळ घालणे असं काही ऽऽ करू नकोऽऽ, करू नकोऽ रे लिही रे... असेलही तुझी लेखणी धमाल करिती इथले सगळेचि लाल स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽच रे लिही रे... लिहीले जरी तू ओतुनि तनमन गेले जरी पुढच्या पानी ते पटकन दबलेलाऽ कोळसाऽ तो होईल हिरा रे लिही रे... जुन्या जाणत्यांचे लागावे चरणी आतल्या गोटात लावावी वरणी भाषा नाहीऽ शैली नाहीऽ पीआर हवा रे लिही रे...

जन्मदिनी डॉ. आंबेडकरांच्या स्मृतीस अभिवादन

तर्री ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
१४ एप्रिल . भारतरत्न डॉ. बाबासाहेब आम्बेडकरांच्या जन्मदिना निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन . हिन्दु धर्मामधील जाती व्यवस्थेविरुध्द विद्रोह करणार्‍या तसेच भारतीय घटनेच्या शिल्पकारास कोटी कोटी प्रणाम .मराठी वर आत्यंतिक प्रेम करणार्‍या ह्या महामानवाच्या महाराष्ट्राची मात्र सर्व बाजुनी अधोगती होते आहे हा दैव-दुर्विलास.

श्री. सुधीर काळे यांचे अभीनंदन

चिंतामणी ·
लेखनविषय:
मिपाकरांचा झेंडा पुन्हा एकदा प्रिंट मिडीयावर लागला. सुधीर काळे मिपावर जागतीक घडामोडींचा आढावा नेहमीच घेत असतात. त्यांचा "मित्रराष्ट्र म्हणून कशी आहे अमेरिका"" हा लेख दि.३ एप्रीलच्या सकाळच्या "सप्तरंग" पुरवणीत छापुन आला आहे. तो लेख येथे वाचा.

जपान मध्ये पुन्हा भुकंप

विनायक बेलापुरे ·
लेखनप्रकार
जपान मध्ये नुकताच पुन्हा एकदा भुकंप झाला आहे. हा भुकंप ७.१ रिश्टर चा असून ११ मार्च च्या भुकंपाहऊन त्याचा केंद्र बिंदू जपानच्या अधिक जवळ आहे. सुनामीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

शेतकरी संघटक : वर्धापनदिनाच्या निमित्ताने

गंगाधर मुटे ·
लेखनविषय:
शेतकरी संघटक : वर्धापनदिनाच्या निमित्ताने ही गोष्ट आहे १९८६-८७ च्या सुमारातली. सुरेश चोपडे सकाळी ६ च्या सुमारास माझ्या वर्धेतील खोलीवर आला आणि आल्याआल्याच अगदी दारावरूनच हुकूम सोडला. “ए आवर रे पटकन, आपल्याला तातडीने निघायचे आहे.” मी सुद्धा कुठे,कशाला,कशाने वगैरे कोणताही उपप्रश्न न विचारताच तयारी केली आणि बाइकवर बसलो. तो येतानाच रवीभाऊ काशीकर यांचेकडूनच बाइक घेऊन आला होता. रस्त्याने निघालो आणि मग सांगायला लागला. “मुरलीचा (मुरलीधर खैरनार) फोन होता. ‘आठवड्याचा ग्यानबा’ अंक प्रिटींगला गेलाय पण कागदाला पैसे नाहीत म्हणून छपाई थांबली आहे.

सचिनला भारतरत्न द्यायला हवी

सुधीर काळे ·
लेखनविषय:
माननीय प्रतिभाताई आणि माननीय मनमोहन सिंग यांना पाठविलेले पत्र (मूळ इंग्रजी निरोप खाली दिलेला आहे) मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो कीं आपल्या सर्वांच्या लाडक्या सचिनला आता आपल्या देशाचा सर्वोच्च मुलकी सन्मान "भारतरत्न" देऊन आपण गौरविले पाहिजे. त्याचे चकित करणारे विक्रम सर्वांनाच माहीत आहेत. पण त्याचे सहकारी खेळाडू त्याला किती मानतात आणि त्याच्यावर प्रेम करतात हे आपणही काल पाहिलेले आहेच.

काफिला ...

sagarparadkar ·
लेखनविषय:
काव्यरस
बर्‍याच दिवसांपासून टंकीन म्हणत होतो, पण ठीकशी जुळवा-जुळव होत नव्हती, आता जसा जमलाय तसा शेर टाकलाय .... हिंदीत असला तरी इथे गोड मानून घ्याल अशी अपेक्षा करतो. असेच आणखी प्रतिसाद मिळाले तर "दूध में शक्कर" मैं इधर उधर की बात नही करता, काफिला दख्खनसे गुजर रहा था | बेंगलोर्-बेल्लारी में ही इतना लूट गया, दिल्ली आते सिर पे सिर्फ कफन बाकी था | खुदपें था हमें यकीन, सिर तो अभीं बचेंगेहि नही | बाकी बचे कफन पें हमनेही .... झटसें हांथ मारा था |

पारंपारिक प्रतिस्पर्धी

मृत्युन्जय ·
तुम्ही कधी साप आणि मुंगुसाला भांडताना बघितले आहे? दोघेही जीव खाउन लढतात. कारण ती अस्तित्वाची लढाई असते. आजवर कधी पाहण्याचा योग आला नसेल तर आज बघा. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २.३० मिनिटांनंतर २ देशातले २२ खेळाडु साप आणि मुंगुसासारखे लढणार आहेत. हा केवळ त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न नाही आहे तर २ देशांच्या अस्मितेचा सुद्धा प्रश्न आहे. आजचा भारत - पाकिस्तान सामना हा तिसर्‍या महायुद्धापेक्षा सुद्धा जास्त महत्वाचा आहे. याआधी विश्वचषकाच्या इतिहासात हे २ देश कधीही उपांत्य फेरीच्या सामन्यात समोरासमोर आले नाहीत. याआधी कधीही त्यांची लढाई अस्तित्वाची लढाई नव्हती.

कृषिविद्यापीठांना अनुदान कशाला हवे?

गंगाधर मुटे ·
लेखनप्रकार
कृषिविद्यापीठांना अनुदान कशाला हवे? जेव्हा जेव्हा शेतीच्या दुर्दशेचा विषय निघतो, तेव्हा तेव्हा ज्या अनेक उपाययोजना सुचविल्या जातात, त्या अनेक उपाययोजनांपैकी कृषी विद्यापीठे आणि त्यांचे संशोधन हा एक हमखास उपाय सुचविला जातो. या सर्व तज्ज्ञांच्या मते कृषी विद्यापीठाने आजवर फार मोठे चमत्कारिक संशोधन केलेले आहे पण ते संशोधन शेतकरीवर्गापर्यंत पोचत नाही किंवा पोचले तरी शेतकरी ’आळशी’ ’अज्ञानी’ वगैरे असल्याने तो ते अंगिकारत नाही म्हणून त्याला शेती परवडत नाही.