Skip to main content

राजकारण

वेळ आहे कुणाला?

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शुक्रवार, 14/10/2011 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
मेंढरं ? मेंढरं आणि आम्ही छे! छे! काहीतरी गैरसमज होतोय. आमच्यामागे इतकी कामं पडलेली असतात की आम्हांला कुठे म्हणजे कुठेही लक्ष द्यायला वेळच नसतो. आणि आपला नगरसेवक कोण आहे? हे सर्वांना माहीत झाले म्हणजे काय तो वार्डातली पेंडिंग कामे तातडीने मार्गी लावणार आहे का? देशाचं नेतृत्व काय करतंय? त्याने कसं काम करावं? हे सांगणारे आपण महाभाग कोण? आणि जरी ओरडून सांगितलं तरी ते ऐकलं जाईलच हे कशावरून? नळी फुंकिली सोनारे... असं नेहमी होतंच आलंय की नाही? आता ह्या जनलोकपालाचंच घ्या. ते विधेयक पारित झाल्यावर फार फार तर दोन चार वर्षे भ्रष्टाचार होणार नाही.

कोठे जाशी भोगा...!!

लेखक अरुंधती यांनी मंगळवार, 11/10/2011 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
''थांबा थांबा.... हे...हे समोरचं होर्डिंग... वाढदिवसाच्या शुभेच्छांचं हो.... तो कोणाचा फोटो आहे?'' सिग्नल सुटत असताना आमच्या कारच्या खिडकीतून मला दिसलेलं ते क्षणभर दचकायला लावणारं होर्डिंग... सॉरी... होर्डिंगवरचा चेहरा.... ''ताई, हे तर आमच्या भागातले प्रसिद्ध राजकारणी आहेत हो मोठे! खूप वट आहे हां त्यांचा.... इथं बऱ्याच जमिनी, इमारती, शॉपिंग मॉल्स त्यांच्याच मालकीची आहेत. सगळीकडे होल्ड आहे म्हणे त्यांचा! कोणीही त्यांच्याकडे गेला की त्याचं काम झालंच म्हणून समजा.... दिलेला शब्द पडू देत नाहीत म्हणून रुबाब आहे बरं का त्यांचा...

शिवसेना दसरा मेळावा २०११, ६ ऑक्टोबर

लेखक कौन्तेय यांनी मंगळवार, 11/10/2011 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
६ ऑक्टोबर २०११ला आयुक्ष्यात पहिलयांदा सेनेच्या दसरा मेळाव्याला शिवाजीपार्कावर हजेरी लावली. तीही बायकोसोबत. बाळासाहेबांची जादू नेमकी काय ते याचि देही याचि डोळां बघणं आवश्यक होतं. माध्यमांवर यांबाबतीत अवलंबून रहाता येतच नाही. पाहिलं तर खरंच, दुसऱ्या दिवशी ‘अण्णा हजाऱ्यांबद्दल ठाकरे असं असं म्हणाले' अशी एक खोडसाळ बातमी पेपरवाल्यांनी सर्व-संगनमताने दिलेलीच होती. मग एका दिवसासाठी व्यवस्थित ठाकरे-हजारे कुस्ती रंगली. वास्तविक अण्णांना अवमानकारक असं काहीही बाळासाहेब बोललेलेच नव्हते. मैदानावरचा प्रत्यक्षदर्शी म्हणून हे मी खात्रीपूर्वक सांगतो. आणखी हेही की बाळासाहेब ठाकरे ही एक जादू आहे.

अ सेपरेशन – इराणी घटस्फोट की इराणपासून घटस्फोट?

लेखक चिंतातुर जंतू यांनी सोमवार, 03/10/2011 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
A Separation - Poster गेल्या काही वर्षांत अहमदीनेजादच्या अधिपत्याखाली इराण हा आपल्या सर्वसामान्य नागरिकांवर अधिकाधिक बळजबरी करू लागला आहे. सरकारला विरोध केला म्हणून जाफर पनाहीसारख्या जगविख्यात दिग्दर्शकाला सहा वर्षं कैद आणि २० वर्षं चित्रपट बनवायला आणि देशाबाहेर जायला बंदी अशी शिक्षा भोगायला लागते आहे. नागरिकांच्या सर्व प्रकारच्या अभिव्यक्तीवर सरकारची कडक नजर आहे. अर्थात, चित्रपटासारख्या माध्यमावर कडक सेन्सॉरशिप आहे.

सत्तास्थळ हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : उत्तरार्ध

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 14/09/2011 08:19 या दिवशी प्रकाशित केले.

सत्तास्थळ हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : उत्तरार्ध

स्विस बँकेतले भारतीयांचे काळे पैसे भारत सरकार कधी परत आणणार?

लेखक सुधीर काळे यांनी मंगळवार, 13/09/2011 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
स्विस बँकेतले भारतीयांचे काळे पैसे भारत सरकार कधी परत आणणार? (Times of India मधील बातमीचे भाषांतर) स्विस बॅंकातील गुप्त खात्याबद्दलची माहिती जाहीर करण्यात सिंहाचा वाटा असलेल्या रुडॉल्फ एल्मर यांनी यांनी या काळ्या पैशाची पाळेमुळे खणण्यात भारत सरकारने प्रामणिकपणे पुढाकार घेतला नाहीं अशी खंत आज व्यक्त केली. स्वत: "ज्युलियस बार" या स्विस बॅंकेत एक उच्चपदस्थ अधिकारी म्हणून काम करत असताना अशा तर्‍हेने "शिट्टी फुंकून" गुप्त बातम्या जाहीर करणारे रुडॉल्फ एल्मर यांच्यासारखे फार थोडेच लोक असतात. त्याबद्दल त्यांना तुरुंगवासही पत्करावा लागला आहे. नुकतीच त्यांची कारावासातून सुटका झाली.

गरिब मंत्री

लेखक सुनिल पाटकर यांनी सोमवार, 05/09/2011 22:23 या दिवशी प्रकाशित केले.
हे तुम्हाला पटतं का ? पंतप्रधानांच्या सुचनेनुसार केंद्रीय व राज्यमंत्र्यांनी आपल्या आर्थिक परिस्थितीचा आढावा सादर केला आहे . यातील अत्यंत गरिब मंत्री एम विरप्पा मोहली १३ लाख मालमत्ता , ए.के.अंटनी यांच्याकडे केवळ १ लाख ८२ हजार रुपये आहेत त्यांच्या पत्नीची परिस्थिती बरी आहे तिच्याकडे ३७ लाख १८ हजार रु.ची मालमत्ता आहे.सुदीप बंदोपाद्याय यांच्याकडे ५६ लाखाची मालमत्ता आहे.आपले शरद पवार १२ कोटी मालमत्तेचे धनी आहेत .पंतप्रधानांकडे ५ कोटीची मालमत्ता आणि हसु नका मारुती ८०० गाडी आहे.सर्वाधिक मालमत्ता कमलनाथ २५० कोटी आणि प्रफुल पटेल १०३ कोटी . टू जी स्पेकट्रम मध्ये आपला हात साफ केलेले

"दिवस गेला रेटारेटी, चांदण्यात बसून कापूस वाटी!"

लेखक सुधीर काळे यांनी शनिवार, 03/09/2011 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
अण्णांच्या आंदोलनात सरकारची फजीती! परिस्थिती अंगाशी आल्यावर माणूस काय नाहीं करत? पण ती तशी अंगावर येईपर्यंत कांहींच न करणारा माणसाला काय म्हणावे? कदाचित् अशा व्यक्तींसाठीच "दिवस गेला रेटारेटी, चांदण्यात बसून कापूस वाटी![१]" ही म्हण रूढ झाली असावी! एप्रिलच्या मध्यापासून ऑगस्टच्या मध्यापर्यंत केंद्र सरकारने ’रेटारेटी’त घालविलेले दिवस आणि १६ ऑगस्ट ते २७ ऑगस्टच्या दरम्यान चांदण्यात बसून (घाईघाईने) वळलेल्या वाती हे या म्हणीचे सार्थ उदाहरण आहे!