Skip to main content

राजकारण

एका म्हातार्‍याची गोष्ट...

लेखक अवलिया यांनी शुक्रवार, 28/01/2011 08:34 या दिवशी प्रकाशित केले.
मनुष्य का जगतो याचे उत्तर भल्याभल्यांना सापडत नाही, कितीही प्रयत्न केला तरी सर्वांना समाधानकारक उत्तर मिळेलच याची खात्री नाही. पण अशा स्थितीत कूणीतरी काहीतरी मनाशी करायचे ठरवुन त्याप्रमाणे आयुष्यभर वर्तन करतात. तोच त्यांचा जीवनाचा हेतु असतो. तेच त्यांच्या आयुष्याला त्यांच्या दृष्टीने सार्थकता देणारे असते. केलेले प्रयत्न यशस्वी होतातच असे नाही. ज्यांच्या भाळी आपल्या आयुष्यात केलेल्या प्रयत्नांना आलेले फळ पहाण्याचे भाग्य असते अशी माणसे दैवी मानली जातात. पण असा प्रयत्न अयशस्वी असलेले त्या त्या समाजाला वाटत असलेल्या आदर्शांप्रमाणे वर्तन करत असतील तर ते त्या समाजाचे आदर्श होतात.

प्रजासत्ताक (?) दिन

लेखक देवदत्त यांनी बुधवार, 26/01/2011 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
आज प्रजासत्ताक दिन. आज त्याचा आनंद आपण साजरा करणार. पण काल एका दिवसभरातील ह्या बातम्या वाचल्या ऐकल्या तर वाटते काय चालले आहे देशात. खरंच प्रजेची सत्ता आहे का आपल्या देशात? तसे म्हणायला प्रजेचीच सत्ता आहे पण ती सामान्य प्रजा नाही तर फक्त ’त्यां’च्या मर्जीतील प्रजा. ते कोण सांगायची गरज वाटत नाही. सर्वांनाच माहित आहे.

मौलाना गुलाम मोह्म्मद वस्तानी

लेखक कापूसकोन्ड्या यांनी बुधवार, 19/01/2011 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
विकास आणि प्रगती/ देवबंद ची साधक बाधक चर्चा व्हावी या उद्देशाने हा धागा काढला आहे. कोणताही उद्देश नाही तेंव्हा धागा उड्वू नये अशी नम्र विनंती. भारताची जनता खरेच वि कासासाठी आसुसली आहे का? गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचे चे कौतुक केले देवबन्द ने हे काय चालले आहे! न्यू दिल्ली दारूल ऊलूम व्हाइस चान्सलर मौलाना गुलाम मोह्म्मद वस्तानी म्हणाले " दंग्यानंतर झालेले रिलिफ़ वर्क हे अत्यंत चांगल्या प्रकारे गुजरात सरकार आणि लोकांनी केले आहे." वस्तानी स्वत: एक एमबीबीए आहेत. ते स्वत: गुजरातचे आहेत. जातियवादींच्या गोटात त्यामुळे आनंदीआनंदी झाला असेलच.

मकरसंक्रांतीच्या दिवशी सुचलेली एक कविता.....

लेखक मृगनयनी यांनी शनिवार, 15/01/2011 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
आली आली आली.... मकरसंक्रांत आली!... भोगीच्या दुसर्‍या दिवशी, किंक्रान्तीच्या आदल्या दिवशी... संक्रान्त आली! संक्रान्तीला फुलतो काटेरी हलवा! आसपासच्या बायकांना हळदीकुन्कवाला बोलवा.... हळदीकुंकू म्हटलं, की आठवते- काळ्यांची आशा आणि कुबलांची अलका... स्त्री-मुक्तीची चळवळ पूर्वी त्यांच्यापर्यंत कधी पोचलीच नाही का? :-? पण जेव्हा पोचली, तेव्हा मात्र खूपच उत्तेजित झाली अलका कुबल! उतरत्या वयातही नवर्‍याच्या कृपेने झाली ती- कडक चाय- "रेड लेबल" रेड वरून आठवलं "कलमाडी हाऊस" आणि झालं कॉमनवेल्थ बदनाम! "जितम्"जितम्" केलं दादांनी, कधी नव्हे तो कपाळावरच्या आठीला पडला आराम!

व्याख्याच व्याख्या

लेखक स्पा यांनी मंगळवार, 11/01/2011 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
काही मजेशीर व्याख्या,काही कधीतरी वाचलेल्या, तर काही रचलेल्या. बघा आवड्तायेत का? अनुभव - सभ्य शब्दात मांडलेल्या चुका मोह - जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखी होतो शेजारी - तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते तो सुखवस्तू - वस्तुस्थितीत सुख मानणारा वक्तृत्व - मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणे लेखक - चार पानात लिहून संपणाऱ्या गोष्टीसाठी ४०० पानं खर्ची घालणारा फ्याशन - शिंप्याच्या हातून झालेल्या चुका पासबुक/ब्यांक्बुक - जगातील सर्वोत्कृष्ठ पुस्तकाचे नाव (जर भरपूर

"तिरंगा फडकवलात तर जबाबदारी तुमची"

लेखक चिंतामणी यांनी बुधवार, 05/01/2011 23:47 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता ई-सकाळमधे बातमी वाचली. जम्मू - " प्रजासत्ताक दिनाला राजधानी श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावलात तर काश्‍मीर खोऱ्यातील कोणत्याही अप्रिय घटनेची जबाबदारी तुमच्यावर राहिल,'' असा इशारा देत जम्मू आणि काश्‍मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज भारतीय जनता पक्षाला श्रीनगरमध्ये ध्वजवंदन न करण्याची सूचना केली आहे. प्रदीर्घ अशांततेनंतर काश्‍मीर खोऱ्यात निर्माण झालेली शांतता नष्ट करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत असल्याचा आरोपदेखील ओमर यांनी केला.