बघू नंतर..
मी ब्र वाचली नाही, भिन्न नाही. कुहू सुद्धा अनुभवलं नाही. का तर.. हे सगळं डोक्यात ठाण मांडून बसेल ही खात्री होती.
बघू नंतर, केव्हातरी काहीतरी साधं लिहितीलच तेव्हा वाचू कधीतरी, असं नकळत ठरवलं होतं..
असं काय.. याला काही लाॅजिक नाही...
कदाचित त्यांच्या भूतकाळाबद्दल दुसऱ्या बाजूकडूनची (फारच धुसर) कल्पना होती. म्हणून असेल... पण त्यांच्याबद्दल लेखिकेपेक्षाही बाई+माणूस म्हणून जिव्हाळा होता. जो त्यांच्या पोस्टस् वाचून त्या आता स्वतःच्या मनासारखं जगतायत हे अधूनमधून बघत राहून मी माझ्यापुरता जपला होता...
पण आता त्यांच्या जवळच्यांच्या लिहिण्यावरून समजतंय...
मिसळपाव