निरंजन
शेवटी म्हटलं, प्रवासात शिकलेली गाणी
चिरंतन प्रवाशांच्या ओठी देऊन जावीत.
मग त्यांच्या किलबिलाटातून
ती गाणी सगळीकडे पसरतील.
सकाळी घरट्याबाहेर पडताना ही गाणी
आठवत असतील आणि
संध्याकाळी परत येताना अंगभर
साठवत असतील...
मग एखादे दिवशी याच गाण्यांनी उजवलेल्या
एखाद्या स्वरभारल्या कुशीतून मी परत जन्म घेईन
आणि ती गाणी परत... नव्याने शिकेन.
नाहीतरी, माझं असं काय होतं
जे मी घेऊन आलो ?
माझं असं काय आहे
जे मी घेऊन जाईन ?
पण एक मात्र नक्की.
जगण्याची गाणी निरंजनपणे गात राहीन.
लेखनविषय:
याद्या
1057
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
व्वा...
सुरेख!