Skip to main content

मुक्तक

मला जगायचंय !

लेखक प्रमोद देर्देकर यांनी शुक्रवार, 04/10/2013 13:37 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा कधी तरी जाग आली ..... शरीर कशात तरी गुंडाळलेले .....हळू हळू नजर वर केली मला कळून चुकले मी इस्पितळात आ. य. सी. सी. यु. मध्ये आहे फक्त डोळ्यांची हालचाल शक्य ... डोक्यात विचारांचे काहूर माजलेले.... डोक्यात घणांचे घाव पडतायत..... घरुन निघालो तेव्हाच रेनकोट घालायला हवा होता माझी बाईक पुलावर आली आणि पाऊस तांडव करत बरसू लागला. बाईक बाजूला उभी करून डिकीत ठेवलेला रेनकोट काढेपर्यंत मी साफ भिजून गेलो होतो...... तेवढ्यात मागून रो रो करीत येण्यारया ट्रकचा आवाज ......अरे हे काय मी अलगद हवेत तरंगतोय ..... माझी बाईक ची सुद्धा तीच गत.....

झुक्या चे अभंग

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 16/09/2013 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
खेळ मांडीयेला फेसबुके घाई, नाचती फेसबुके भाई रे क्रोध अभिमान भिने त्यांच्या मनी, एक एका पकडति गळा रे कुणी धर्माभिमानी, कुणी पुरिगामी. द्वेशाच्या माळा, लाईक्स मिरविती गळा शिव्या शापाची घाई, गाली वर्षाव, अनुपम्य फेसबुक सोहळा रे वर्ण अभिमान मिरवति जाती, एक एका लोटांगणी जाती भेसळ चित्ते झाली नवसागर, पाषाणा हृदयी कलहती रे होतो जयजयकार गर्जत फेसबुक, मातले हे फेसबुके वीर रे झुक्या म्हणे सोपी केली पायवाट, समाज नेई स्मशान घाट रे.. अवि

फरपट

लेखक जुईचे फूल यांनी मंगळवार, 10/09/2013 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
नशीबाच्या शोधात दूर देशी आलो अन इथवर येऊन परतीच्या वाटाही विसरून गेलो हीच झाडं, हेच वारे, हेच ऋतू आपले पसरलेले हिरवे माळ अन रस्तेही आपले इथल्या मातीत पाय रोवून उभे राहू लागलो पाळामूळांसकट आता इथेच गुंतू लागलो तरीही येतो एक क्षण असाच अडवा तिडवा हृदयात थेट हात घालून घेतो सारा मागोवा फरपट्ल्यासारखा घेऊन जातो पुन्हा घरट्याकडे रक्ताळलेले आपण खोल आत मनामध्ये जखमा तशाच भरून निघतात पण व्रण मात्र तसेच प्रत्येक व्रण एक दूत होतो आठवणींचा पूल होतो आता पाय मातीत रोवूनही त्यात मूळं रुजत नाहीत त्यांनाही कदाचित वाटत असावं ही माती आपली नाही पायाखालची जमिन सरकतानाही रुजल्याचा आव आणतो ही माती ही झाडं हे सारं आपल

झगमगाटात हरवलेले . . . . .

लेखक तुमचा अभिषेक यांनी शनिवार, 07/09/2013 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या वर्षीच्या गणपती आधी लिहिलेला लेख.. इतरत्र प्रकाशित.. आजही लागू आहेच म्हणून इथेही टाकत आहे. ....................................................................................... परवा श्रावणातला शेवटचा सोमवार होता. बायकोने शिवमंदीरात जाण्याचा आणि मलाही नेण्याचा बेत माझ्याही नकळत दुपारीच बनवला. फोनवरच मला तसे कळवण्यात आले. त्याच दिवशी नेमके ऑफिसमध्ये काम जरा जादा असल्याने संध्याकाळी एक्स्ट्रा थांबावे लागणार होते.. त्यानंतर पुन्हा मंदीर.. वैताग नुसता डोक्याला.. पण नकार देण्याचा पर्यायच नव्हता..

अर्धांग

लेखक तिमा यांनी गुरुवार, 05/09/2013 20:11 या दिवशी प्रकाशित केले.
नोकरीने शोषलेले, प्रवासाने शिणलेले ते आमचे अर्धांग, न्याहाळत असतो मी, पैलतीरावरुन ! अधुन मधुन ओळख दाखवतं, सटीसहामाशी, कधी वाट्याला येतं चिपाड बनून! तेंव्हा डोळ्यांखालच्या काजळीत शोधू लागतो मी काजळमाया आणि शुष्क ओठांतली उरली सुरली थरथर प्रयत्न करुन! मग जाणवतात यंत्रवत प्रतिसाद,थंड गात्रे एक उरकून टाकण्याची भावना बहुतकरुन!

ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (७)

लेखक तुमचा अभिषेक यांनी शनिवार, 31/08/2013 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
दर दुसर्‍या तासाला येणारा तिचा फोन.. आज ऑफिसला पोहोचून तीन तास उलटून गेले तरी आला नाही तेव्हा चुकचुकल्यासारखे वाटणे साहजिकच होते.. मात्र कामाच्या घाईगडबडीत डोक्यात येणारे सारेच विचार तसेच रेंगाळत ठेवता येत नाहीत.. दुपारी खिशातला फोन खणखणला तेव्हा तिची आठवण झाली, पण वेगळाच नंबर पाहून चुटपुटलो.. तेवढ्यापुरतेच.. कारण समोरून आवाज तिचाच होता, बातमी तेवढी चांगली नव्हती.. बाईसाहेब फोन कुठेतरी हरवून आल्या होत्या.. तिच्यावर ओरडावे कि डाफरावे या विचारांत असतानाच तिने फोन कट देखील केला. कदाचित मला हे कळवण्यापुरताच केला असावा.. ते ही खरेच, दुसर्‍याच्या फोनवरून कितीसे बोलणार..

गेट आयडीया !

लेखक चाफा यांनी बुधवार, 28/08/2013 02:44 या दिवशी प्रकाशित केले.
" कल्पना सर्व्हीसमध्ये आपलं स्वागत आहे सर, मी आपली काय सेवा करू शकतो ? " " माझी सेवा नका करू हो, तुम्ही समाजसेवक नाही आहात, माझ्या तक्रारीचं काय झालं ? " " कोणती तक्रार सर ? " " मी गेले तीन दिवस फोन करून सांगतोय माझ्या नेटसेटरचा स्पिड कमी झालाय म्हणून" " सर कृपया आपण शेवटचा रिचार्ज कधी केला हे सांगू शकाल का ? " " ही तुमच्या नेटवर्क बद्दलची खात्री आहे की माझ्या जिवनरेषेबद्दल संशय ? " " मी समजलो नाही सर" " नाही, शेवटचा रिचार्ज असं विचारताय म्हणून म्हंटलं " " त्याबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो सर, पण मला पुन्हा एकदा आपला प्रॉब्लेम सांगू शकाल का ?

ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (६)

लेखक तुमचा अभिषेक यांनी मंगळवार, 27/08/2013 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
२६ ऑगस्ट २०१३ माझा चार दिवसांचा आजार आणि तिचा चार दिवसांचा आळस... पाचव्या दिवसाला झटकून, श्रावणी सोमवारचा मुहुर्त साधून आमचे देवदर्शनाला जायचे ठरले.. अर्थातच.. तिनेच ठरवले.. कारण ती जेवढी आस्तिक तेवढाच मी नास्तिक.. त्यामुळे नेहमीसारखेच, ‘जाणे गरजेचे आहेच का??’ इथपासून वादाला सुरूवात.. घरापासून चालतच पंधरा-वीस मिनिटांवर महादेवाचे मंदीर असल्याने माझी नकारघंटा वाजवायला जास्त वाव नव्हताच.. आजारपणाचा फायदा उचलून सकाळपासून टाळलेली आंघोळ.. नाईलाजाने जेव्हा संध्याकाळी उरकावीच लागली, तेव्हा आता अखेर जाणे निश्चितच हे समजून चुकलो.. तरीही तिचे हे देवदर्शन सुकर घडू देणार्‍यातला मी अजिबात नव्हतो..

आरोग्य पंचविशी -२ -- गंधार-पुढे

लेखक सुबोध खरे यांनी शुक्रवार, 23/08/2013 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
वासाच्या या दुनियेत मानवाने काही गोष्टी जाणून घेतल्या त्या म्हणजे कोणत्या वासामुळे आपल्याला धोका आहे आणि कोणता वास आपल्या फायद्याचा आहे. सडक्या मासाचा वास हा इतर परभक्षी जनावरांना आकर्षित करतो त्यामुळे आपल्या जीवाला धोका होऊ शकतो या मुळे असा सडक्या मासाचा वास आपल्याला शिसारी आणतो. तसेच सडक्या अन्नामुळे विषबाधा होऊ शकते हे कळल्यामुळे तसा वास येणारे पदार्थ आपण आपोआप खाणे टाळतो. आता या गोष्टी साध्या सरळ आहेत. पण ज्या गोष्टी इतक्या सरळ नाहीत त्या कोणत्या. तर मानवी शरीराचा वास.

आरोग्य पंचविशी- २ -- गंधार

लेखक सुबोध खरे यांनी मंगळवार, 20/08/2013 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
गंधार पंचेन्द्रीयातील पहिले इंद्रिय आणि मानवाची आद्य संवेदना म्हणजे घ्राणेन्द्रीय शक्ती सर्वात आदिम प्राणी म्हणजे अमिबा सारखा एक पेशीय प्राणी सुद्धा आपल्या पेशीच्या भिंतीतून झिरपणार्या अणुरेणु ची रासायनिक तपासणी करून आजूबाजूच्या वातावरणाची माहिती काढत असतात. मुळ वासाची शक्ती म्हणजे वेगवेगळ्या रसायनाची संवेदना मेंदूला देणे. हि शक्ती अंधारात उन्ह पावसात रात्री बेरात्री सुद्धा काम करीत असते आणि प्राणी मात्रांना सभोवतालच्या वातावरणाची जाणीव करून देत असते. प्राण्यांच्या आहार निद्रा भय आणि मैथुन या चार मूलभूत अंतरप्रेरणा सुद्धा वासाच्या शक्तीवर अवलम्बून असतात.