Skip to main content

मुक्तक

अर्थ

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शनिवार, 19/10/2013 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीच असा प्रश्न पडतो मला की मी का नक्की का जगतोय? असं कोणतं काम करायचंय ज्याची आतुरतेने वाट बघतोय? हजारो अपेक्षा होत्या माझ्याकडून त्यांना मी जागलो का? ज्यांना जसे हवे होते तसाच त्यांच्याशी वागलो का? आजपर्यंतच्या आयुष्यात किती जला णांच्या उपयोगी पडलो? माझी मदत हवी होती अश्या किती घरांच्या पायऱ्या चढलो? कितीतरी मनं मी दुखावली असतील… कितीतरीजण मला दुरावले असतील…. माझ्या अश्या वागण्याला तेच लोक काळाच्या ओघात सरावले असतील आपल्याच धुंदीत जगलो … हवा तसाच वागलो.... कोणी कधी काही समजावले तर त्यालाच टाळू लागलो .....
काव्यरस

शैलू

लेखक अक्षरमित्र यांनी बुधवार, 16/10/2013 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
टीप : ही व्यक्तीचित्रणे सत्य घटना व पात्रे यांवर आधारीत आहेत. काळ साधारण इ.स. १९८७ ते १९९३ दरम्यानचा आहे. पात्रांची नावे बदलली आहेत. प्रसंगांतील भाषा काही प्रसंगी शिवराळ व अश्लील वाटण्याची शक्यता आहे. ज्यांना अशा प्रकारच्या वाचनाची नावड असेल त्यांनी कृपया येथेच थांबावे.) शैलू मी तेव्हा साधारण ५ वी / ६वीत असेन. आमच्या चाळीतच शैलू राहायची. शैलूचा बाप तिच्या लहानपणीच तिच्या आईला टाकून गेला होता. तो कुठे होता, काय करीत होता, जीवंत होता की नव्हता ह्याचा पत्ता शेवटपर्यंत चाळीतल्या बायांना आणि बाप्यांना लागला नाही.

रामचंद्र पुरुषोत्तम जोशी

लेखक तिमा यांनी सोमवार, 14/10/2013 19:42 या दिवशी प्रकाशित केले.
रुढ अर्थाने ही समीक्षा नाही. कारण समीक्षाकाराला चित्रपटाच्या तांत्रिक बाबींचीही माहिती असायला हवी. पण एक सामान्य प्रेक्षक म्हणून काय वाटले ते मांडण्याचा प्रयत्न करतो.. शक्यतो गोष्ट विस्ताराने न उलगडता लिहिली आहे. त्यामुळे , हे वाचूनही ज्यांना हा चित्रपट बघायचा असेल, त्यांनीही हे वाचायला हरकत नाही. रामचंद्र पुरुषोत्तम जोशी, नांवाचा चित्रपट आला आहे असे कळल्यावर, तो जरा वेगळा, आशयघन असेल असे वाटले होते. म्हणून बघायला गेलो. रिकामे प्रेक्षागृह पाहून तर, हा नक्कीच अ‍ॅवॉर्ड जिंकणारा असावा असे वाटू लागले होते. चित्रपट सुरु झाला तोच मुळी नरकाच्या दृष्याने!

रागावणे – समजावणे

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी सोमवार, 14/10/2013 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
........................१............................. रागवलेली ती, समजूत काढणारा मी रागवलेला मी, समजूत काढणारी ती या दोन विरुद्ध गोष्टी आहेत . ती रागावली कि तिची समजूत काढणे सोपे आहे ते जमते आजकाल मला पण तिच्यावर रागावून ती समजूत काढत असतांना रागावलेलेच राहणे फार अवघड असते ते अजूनही जमलेले नाही मला . कसं असतं ना, समजूत काढणारा नेहमीच समजूतदार असतोच असे काही नाही पण सांगणार कोणाला? ........................२............................. रागावलेली ती लगेच लक्षात येते रागावलेला मी तिला कळतोच असे नाही कां कळूनही वळत नाही? . आपल्या माणसावर रागावणे हा आपला हक्क जरूर आहे . पण आपलं माणूस आपल्यावर राग
काव्यरस

साल्ला यकु....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 14/10/2013 10:18 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीप्रमाणे फेसबूकचे पान उघडले. सवईप्रमाणे आज कुठल्या कुठल्या मित्रांचे आणि मैत्रीणींचे वाढदिवस आहेत ते बघीतले. पहिलेच नांव वाचले आणि न विसरता."Happy Birth Day." लिहून मो़कळा झालो. काही माणसांचे काही-काही विचारच असे असतात की, जे चिरकाल टिकतात.हा यकू पण तसाच विचार करायचा.

उत्सव -शतशब्द कथा

लेखक जेपी यांनी शनिवार, 12/10/2013 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
तिच्या' घरी आज बरीच वर्दळ होती ,एरवी कुणी फिरकतही नसे . पाहटेच आलेला 'तिचा' भाऊ आणि धाकटा दीर लोकामध्ये या घटनेच धार्मिक महत्व आणि पूर्वी याचा कसा उत्सव व्हायचा यावर चर्चा करत पुढची तयारी करत होते . 'तिची' ओटी भरण्यासाठी बायकांची झुंबड उडाली होती. आठ दिवसापूर्वी चेत्रागौरीला 'तिच्या' घरी कुणी हि बाई फिरकली नव्ह्ती. घरामध्ये 'तिचा' वेडा नवरा कधी नव्हे तो शहाण्या सारखा शांत बसला होता . 'तिच्या' शेजारी बसलेली 'तिची' भावजयी 'तिची' तुलना लक्ष्मिशी करत होती , धाकट्या जावेला 'तिच्या' नशिबाचा हेवा वाटत होता . असे उत्सवी वातावरण असताना ती मात्र जीवनात पहिल्यादाच मिळालेला शालू पांघरून शांत

दुर्गे दुर्घट भारी... एक विचार.

लेखक प्यारे१ यांनी शुक्रवार, 11/10/2013 03:45 या दिवशी प्रकाशित केले.
गणेश विसर्जन झालं की पितृपक्ष येतो. तो संपला की लगेच प्रतिपदेला घटस्थापना होते नि आपण देवीची उपासना सुरु करतो. देवीच्या उपासनेची सुरुवात कधी झाली, का झाली, कशी झाली ह्याबाबत मला माहिती नाही. इतिहासकारांचा विषय आहे तो. असो. पुराणांमध्ये कुठंतरी सांगितल्याप्रमाणं महिषासुर नावाचा राक्षस प्रचंड मातला होता नि त्यानं सगळ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली.

ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (८)

लेखक तुमचा अभिषेक यांनी मंगळवार, 08/10/2013 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
२ ऑक्टोबर २०१३ . . तापलेल्या तव्यावर चरचरणार्‍या मच्छीचा वास.. स्वयंपाकघरातून दिवाणखान्याला चकमा देत, चुरचुरत थेट, बेडरूममध्ये माझ्या नाकाला झिणझिण्या द्यायला आत शिरला.. अन दिवसभराच्या कामाचा अर्धा थकवा तिथेच पळाला. श्रावणापाठोपाठ गणपती अन त्यामुळे थंडावलेला मत्स्याहार.. जर आजचा हा वार चुकला तर पुढचे काही दिवस नवरात्री निमित्त पुन्हा जिभेला लगाम घालावा लागणार हा विचार खायची इच्छा आणखी प्रबळ करून गेला.. अर्थात बाहेर हॉटेलात खायला तेवढी परवानगी होती, पण तिथे घरची, आईच्या हातची चव कुठे येणार.. ते नेहमीच ताकाची तहान दूधावर वाटते मला....

हे राम...!!

लेखक सस्नेह यांनी शनिवार, 05/10/2013 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
पाच वाजत आलेले अन हापिसातल्या निम्म्या अर्ध्या स्टाफला बाहेरचे वेध लागलेले. अशा कातरवेळी काळेनाना क्लार्क केबिनमध्ये घुसले अन घुटमळत उभे राहिले. ‘का हो, नाना ?’ मी ऑफिसचा चार्ज घेऊन जेमतेम एक महिना झालेला. तेवढ्यात नानांच्या भिडस्त स्वभावाचा मला बराचसा अंदाज आलेला. ‘मॅडम..डिविजन वरून फोन आला होता...’ ‘हं, काय ?’ ‘ते..उद्या गांधी जयंती ना ?’ ‘हो. मग ?’ ‘नाही, म्हणतात सकाळी सातला ऑफिसात झेंडावंदन करा..’ ‘गांधीजयंतीला झेंडावंदन ? आणि सकाळी सातला ?’ बापरे, सकाळी उठलं कि पळत सुटावं लागणार ! शिवाय सकाळच्या प्राणायामाला फाटा द्यावा लागणार, ते वेगळंच... मी मनात विचार केला. नाना गंभीर.

मित्रास पत्र (सन 2045- एक झलक)

लेखक बबन ताम्बे यांनी शुक्रवार, 04/10/2013 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
ब. र. ता. दिनांक : 8 जानेवारी 2045 प्रिय मित्रा , आज 8 जानेवारी 2045. बघता बघता ८० वय झाले . जुलै २०१३ साली तारेची अखेर झाली आणि २०२३ साली पोस्ट ऑफिस चे ब्यान्केत रुपांतर झाले . पत्र पाठवणे वगैरे कालबाह्य झाले म्हणून सरकारने पोस्त ऑफिसच बंद करायचा निर्णय घेतला .