Skip to main content

मुक्तक

CID एपिसोड: आईच्या गावात अंन बाराच्या भावात

लेखक पगला गजोधर यांनी मंगळवार, 15/07/2014 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
३ दिवसांपूर्वी सुषमाचा फोन आला, मी म्हटले - बोल सुशे, कशी आठवण काहाडली ? सुषमा म्हणाली - तुमची मदत हवी, ACP प्रद्युम्न, आम्ही विनंती करू करू दमलो, पण हाफिजचा पत्ता लागत नाही. मी म्हणालो - तुम्ही चुकीच्या जागी शोधू राहू लागले न बाप्पा, तो तुम्हाला पाकिस्तानात सापडेल. सुषमा म्हणाली - तेवढ बघा न भाऊ. माझा पाकिस्तान्यांवर भरोसा नसल्याने, मी आपल्या टीमबरोबर, जुन्या क्वालीसमधून पाकिस्तानात गेलो. (या भारतात काही लोक आहेत कि जी जगात कोणालाही कुठेही कधीही जाऊन भेटू शकतात, त्यांना पासपोर्ट विसा प्लानिंग असं काही लागत नाही ) .

"टी "

लेखक पिंपातला उंदीर यांनी रविवार, 13/07/2014 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
असाच ऑफिस मध्ये पाट्या टाकण्याचा अजून एक दिवस . पावसाळी दुपार . एके काळी आपण स्वतहाशिच काय काय गगनचुंबी promises केली होती आणि आपण आता हे काय करत आहोत हि मनातून मधूनच टोचण्या देणारी जाणीव अजूनच टोकदार झालेली. असेच स्वतहाला कुरतडत बसण्याचा खेळ चालू असताना एकदम फोन वाजतो. फोन त्याचाच असतो. " जिवंत आहेस का? बऱ्याच दिवसात तुझा उदास आवाज कानावर पडला नाही . म्हंटल आपणच फोन करावा ।" "अरे काही नाही रे. असाच busy होतो ऑफिस च्या कामात. " " तुझा आवाज बराच cheerful येतोय .

पाऊस दाटलेला

लेखक स्पा यांनी रविवार, 13/07/2014 01:50 या दिवशी प्रकाशित केले.
Guess what? शेवटच्या ट्रेन मध्ये आहे, कर्जत.१२.४० करी रोड वरुन बसलेलो, आत्ता जेमतेम कुर्ल्यापर्यंत गाडी आलीये.अ.... आत्ता वाजलेत १.३०. तासभर होत आलाय.गाडी हलायची चिन्ह नाहीत.डब्यात जेमतेम चार डोकी.बाहेर मजबुत पाऊस पडतोय.डोळे मिटुन बसलोय.बाकी काहीच करू शकत नाही.पाउस निवांत एकतोय.आज सकाळी पण भिजलो, आत्ता येताना पण भिजलो,छत्री असुन नसल्यासारखी अख्ख्या मुंबइला वाकडा तिकडा कसाही धुतोय.डबा मस्त गार पडलाय.बाहेरुन पाउस आत गळतोय, मला काकडायला होतयं.डोंबोली अजुन लय लांब , त्यात ही शेवटची ट्रेन.कधी सुटेल पत्ता नाही.डोळे पेंगायला लागलेत..

कठीण समय येता कोणही कामास येतो

लेखक बुडबुडा यांनी रविवार, 13/07/2014 00:26 या दिवशी प्रकाशित केले.
आपण ज्याला जमेतही धरत नाही अशा अनेक गोष्टी आपल्याला नेमक्या वेळी कामास येतात आणि मजा येते जगण्याला..आपलचं आपल्याला हसू येत राहतं.. आज सकाळचीच मजा..९.३०चं ऑफिस..घरातच ९.२०वाजलेले..आता अशा घाई गडबडीच्या वेळी ट्राफिकमध्ये अडकायला नको म्हणून आवरायची गडबड.. आणि अशावेळी माझं नेहमीप्रमाणे स्वगत चालू. “नशीब आज विकेंड आहे..फोर्मल घालायची गरज नाही..” जीन्स चढवली..बेल्ट लावायला लागलो..आणि ‘कट्ट्’ असा आवाज झाला आणि बेल्टच्या बक्कलची स्प्रिंग तुटून खाली पडली.. “आईचा घो याच्या”. आता आली का पंचाईत..

जडण-घडण...5

लेखक माधुरी विनायक यांनी बुधवार, 09/07/2014 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
गिरगावातल्या सेवासदन अध्यापिका विद्यालयातली ती दोन वर्षं कमाल होती. शाळेच्या सातवीपर्यंतच्या शिक्षणानंतर खूप काळाने मनाजोगा कंपू भेटला होता. हो, आता कंपू ची जाणीव होऊ लागली होती. घरापासून अंधेरी स्टेशनपर्यंत बस, तिथून २ नं. प्लॅटफॉर्मवरून सकाळी ८.५७ ची चर्चगेट स्लो लोकल. रेल्वेच्या नियमित प्रवासाचा पहिला अनुभव, तिथे पाच जणींचा एक कंपू. मग विद्यालयात आमचा १० जणींचा मोठ्ठा कंपू. पूर्ण वेळ अभ्यासक्रम, म्हणजे अख्खा दिवस आम्ही सगळ्या सोबत असायचो. पूर्ण वेळ साडी नेसणं अनिवार्य. सवय नसल्यामुळे सुरूवातीला काही मुली विद्यालयात जाऊन कपडे बदलून साडी नेसायच्या, मग हळू-हळू सरावल्या.

कहां गये वो लोग?--संज्या

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी सोमवार, 07/07/2014 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
कहां गये वो लोग?--बाबूकाका कहां गये वो लोग?--आजीबाई कहां गये वो लोग?--नाथा कहां गये वो लोग?--मंग्या कॉलेज सुरु होउन काही दिवस झाले होते.पावसाने चांगलाच जोर धरला होता.अशातच एका वीकेंडला ट्रेकला जायची टूम निघाली.ट्रेकिंगविषयी तशी फारशी माहीती कुणालाच नव्हती.कर्जत,पनवेल,

कहां गये वो लोग?--मंग्या

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी शुक्रवार, 04/07/2014 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
हां गये वो लोग?--बाबूकाका कहां गये वो लोग?--आजीबाई कहां गये वो लोग?--नाथा दहावीची परीक्षा नुकतीच संपली होती.डोक्यावरचे अभ्यासाचे ओझे उतरले होते.आणि वर्षभर पुस्तकात घातलेल्या माना वर झाल्या होत्या.सुट्टीत कोण कोण कुठे कुठे जाणार ह्याचे बेत ठरत होते.एकीकडे उन्हाळा वाढत चालला होता आणि अंगातुन घामाच्या धारा वाहात होत्या. एकदा असाच दुपारचा चहा पीत गॅलरीत

नारकोंडम बेट-- पुढे

लेखक सुबोध खरे यांनी शुक्रवार, 04/07/2014 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
नारकोंडम बेट-- पुढे आमच्या सर्व लोकांच्या गणवेशात आणि बुटात समुद्राचे पाणी भरून ते जड झाले होते. जेमिनी किनार्यावर आणल्याबरोबर नौदलाच्या मुलभूत प्रशिक्षणाप्रमाणे मागे बसलेल्या नौसैनिकाने जेमिनीची मोटर सुरु करण्याचा प्रयत्न केला. पण मोटार मध्ये सुद्धा पाणी शिरले होते आणि ती पण चालू होईना.आता प्रेम कुमारला अजूनच टेन्शन आले. कारण वायरलेस बंद होता. जेमिनीची मोटार चालत नव्हती (आणि त्याच्या खिशातील पाकीट आणि घड्याळ भिजले होते.) तो विचारू लागला सर आता परत कसे जायचे? मी का कुणास ठाऊक बेफिकीर होतो. मी त्याला म्हणालो कि जे होईल ते पाहू.

कहां गये वो लोग?--नाथा

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी गुरुवार, 03/07/2014 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
कहां गये वो लोग?--बाबूकाका कहां गये वो लोग?--आजीबाई आमचं ६-७ खोल्यांचं जुनं तिपाखी कौलारु घर होतं.दाराला कड्या घालुन बसण्याची पद्धत अजुन सुरु झाली नव्हती.सगळ्यांची दारं सताड उघडी असायची आणि आम्ही पोरेटोरे दुपारी कुणाही एकाच्या घरी किंवा संध्याकाळी कुणाच्याही वाड्यात खेळत पडीक असायचो.आमचे घर मोठे असल्याने त्यातल्यात्यात आमच्याकडेच दुपारचा अड्डा असे.एकदा असेच एका कुठल्यातरी खोलीत पत्ते वगैरे खेळत असताना घरात चोरी झाली आणि चोराने

कहां गये वो लोग?--आजीबाई

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी बुधवार, 02/07/2014 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
कहां गये वो लोग?--बाबूकाका आजीबाई, पिंटुला घेउन जरा सिद्धेश्वराच्या देवळात जाउन ये गं आजीबाई, भांडी पडलीयेत सकाळपासुन काल का नाही आलीस गे आजीबाई? येताना थोडी राख घेउन ये उद्या..संपलीये आणि नारळाचा काथ्यापण आण मिळाला तर पारावर जाउन भाजी आणतेस का आजच्यापुरती? तसं तर आजीबाई ही काही आमच्या घराचा सदस्य नव्हती. ती होती वाडेघरहुन आमच्या घरी कामाला येणारी मोलकरीण.पण ना तिच्या वागण्यातुन तसे कधी जाणवायचे ना आमच्या.मी तिला बघितली तेव्हापासुन ती म्हातारीच दिसायची.