Skip to main content

मुक्तक

कहां गये वो लोग?--बाबूकाका

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी बुधवार, 02/07/2014 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी कहां गये वो लोग या नावाची मालिका काही वर्षांपूर्वी टी.व्ही. वर लागायची. अर्थात त्याचा विषय वेगळा होता पण शीर्षक मला आवडले म्हणुन ईथे वापरले आहे. लहानपणी आपल्या अवती भोवती अनेक माणसे वावरत असतात. काही जणांशी आपला थेट संबंध येतो किवा काही जण नुसतेच आपल्या त्या विश्वात एखाद्या गूढ गोष्टीप्रमाणे सामावलेले असतात.मग काळाच्या ओघात हळुहळु आपण मोठे होत जातो आणि आपले विश्व बदलत राहते.शाळा, शाळेतले मित्र, शिक्षक,क्लास व तिकडचे मित्र,खेळायचे सवंगडी नंतर कॉलेज, तिथले मित्रमैत्रिणी,ट्रेनचा प्रवास आणि त्यातले रोजचे भेटणारे लोक असे क्षितीज विस्तारत राहते आणि हे लहानपणचे लोक विस्मृतीत जातात.

उमड घुमड ...

लेखक मैत्र यांनी शनिवार, 28/06/2014 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
दुपारपासून उकाडा जास्तच जाणवत होता. कुठे जावं तर रस्त्यावरची गर्दी नकोशी वाटत होती. गाडी चालवण्यासाठी किंवा वाट काढण्यासाठी होणारी चिडचिड लक्षात घेता तो बेत रहित केला. उगाच काहीतरी किरकोळ उद्योग करत घरीच बसून राहिलो. घरात कोंदट वाटत होतं म्हणून अनेक दिवसांनी बाल्कनीत जाऊन बसलो थोडी मोकळी हवा मिळावी अशा विचाराने. फोनचा चाळा होताच वेळ घालवण्यासाठी. थोड्या वेळाने काहीतरी फरक जाणवला की हवा बदलते आहे. वारा सुटला आहे. आजूबाजूची मोठी झाडं सळसळत होती. छोटी झुड्पं वार्‍याच्या वेगाने थडथडत होती... आभाळ भरून आलं होतं.. एखाद्या उत्तम जलरंग चित्रासारखे ग्रे ढग पसरले होते.

नारकोन्डम बेट

लेखक सुबोध खरे यांनी शुक्रवार, 27/06/2014 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
नारकोन्डम बेट -- हे अंदमान बेट समूहातील सर्वात दूर आणि पूर्वेकडे असलेले एक छोटेसे बेट आहे. पहा http://en.wikipedia.org/wiki/Narcondam_Island#mediaviewer/File:Narconda… हे बेट एका मृत किंवा निद्रिस्त ज्वालामुखीच्या शिखरामुळे तयार झालेले असून उत्तर अंदमान च्या बेटांपासून ते ११४ किमी दूर आहे. या बेटाला दिलेल्या भेटीचा हा वृत्तांत. हे पूर्वेच्या समुद्रात या आगामी लेखमालेतील एक पुष्प असून लेखमाला येत्या काही दिवसात लिहिण्याचा विचार आहे.

जडण-घडण...4

लेखक माधुरी विनायक यांनी गुरुवार, 26/06/2014 16:43 या दिवशी प्रकाशित केले.
अशी खूप वर्षं सरली. दहावी इयत्तेनंतर गावी जाण्याचं प्रमाण हळूहळू कमी होत गेलं. शिक्षण सुरूच होतं. फारसा विचार किंवा प्रयास न करता चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळून गेला. एखाद-दुसरा अपवाद वगळता ओळखीचं फारसं कुणी नव्हतं. कोणाच्या अध्यात-मध्यात नाही, अशी ती अकरावी-बारावीची दोन वर्षं निघून गेली. बारावीचा निकाल लागला आणि मी आमच्याच कॉलेजमध्ये पुढच्या वर्षासाठी प्रवेश घेतला. त्या छोट्याश्या कालावधीतही लक्षात राहिलेले शिक्षक म्हणजे अनंत भावे सर. मराठी शिकवायचे. हाताच्या बोटावर मोजता येतील, इतकीच त्यांची लेक्चर्स ऐकता आली.

गप्पा … त्याच्याशी

लेखक भावना कल्लोळ यांनी सोमवार, 23/06/2014 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
आज जरा निवांत भेटला तो. त्याला म्हणाले ये, बैस जरा. घटकाभर बोलु आपण. किती दिवस झाले बोलले नाही आहे तुझ्याशी मनमोकळेपणाने. तू येतोस आणि जातोस. मी आपली प्रपंच गाढ्यात. तो म्हणाला अग मग बोलू कि त्यात काय. मी आहे आता ४ महिने तरी. जा घेऊन ये एक वाफाळता कप चहाचा म्हणजे गप्पाची लज्जत वाढेल अजुन. मी : राहु दे, असे म्हणुन दडशील पुन्हा. मग येशील जेव्हा तेव्हा निवांत असेन कि नाही कोण जाणे. तो : नाही ग, आज असेन मी, तुझ्यासाठी. मी : खरंच, राहशील माझ्यासाठी, माझे मन हि खूप जड झाले आहे, आज मी हि तुझ्यासोबत बरसेन म्हणते. तो : आवडेल मला. मी बरसतो सर्वजण पाहतात.

जडण-घडण...3

लेखक माधुरी विनायक यांनी सोमवार, 23/06/2014 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
गावच्या भटकंतीतला प्रत्येक वर्षीचा पहिला उद्योग म्हणजे वाडीतल्या सगळ्या आंब्याच्या झाडांची पाहणी करायची, मिळतील तितक्या कैऱ्या मिळतील तिथेच खायला सुरूवात करायची आणि परतताना जमतील तितक्या कैऱ्या घरी आणायच्या. पहिले तीन-चार दिवस पडवीत आम्ही जमवलेल्या कैऱ्या टोपलीत पडून राहायच्या. दात पुरेसे (म्हणजे वैताग येण्याइतके) आंबट झाले, करकरू लागले की कैऱ्या घरी आणायचा हा क्रम थांबायचा. आश्चर्य म्हणजे झाडाखाली पडलेल्या, क्वचित फुटलेल्या आणि न धुता खाल्लेल्या त्या कैऱ्यांमुळे कधीच खोकला झाला नाही किंवा आम्ही आजारीही पडलो नाही. आमच्या गावात कलमी आंब्यांची हौस कमी, रायवळ आंबे मात्र भरपूर..

शोधयात्रा (भावानुवाद)

लेखक मूकवाचक यांनी शनिवार, 21/06/2014 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही ही अनोखी शोधयात्रा अधुरी कदापी सोडणार नाही मात्र जिथून श्रीगणेशा केला त्या आरंभस्थानी डेरेदाखल होणे अन त्या गंगोत्रीची पहिल्याप्रथम खरी ओळख करून घेणे हीच आमच्या सार्‍या वाटचालीची अंतिम फलश्रुती असेल मूळ काव्यः We shall not cease from exploration And the end of all our exploring Will be to arrive where we started And know the place for the first time. -T.S. Eliot
काव्यरस

जडण-घडण...2

लेखक माधुरी विनायक यांनी शुक्रवार, 20/06/2014 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेतले दिवस, मित्रमंडळी, अभ्यास, स्पर्धा सगळंच मस्त होतं. प्रत्येक वर्षी वर्गशिक्षक आणि विषयानुरूप शिक्षक बदलत असले तरी सगळेच शिक्षक ओळखीचे होते. त्यामुळे पुढच्या वर्गात मित्रमंडळीही तीच आणि शिक्षकही ओळखीचे. अगदी खरं सांगायचं तर पहिली ते सातवी इयत्तेची सात वर्षं वेगवेगळी आठवतंच नाहीत, मोठ्ठच मोठ्ठं लांबलचक एकच वर्षं असावं ते, असंच वाटतं. तसंच आठवतं... शाळा, परीक्षा आणि परीक्षेनंतरची सुट्टी. मे महिन्याच्या सुट्टीत गावी गेलं की गोंधळात टाकणारा पहिला अनुभव म्हणजे, अरेच्चा, सुट्टी इतक्यात कशी संपली? थांबा, थांबा. थोडं उलगडून सांगते. माझं गाव कोकणात. मुंबईहून गावी पोहोचायला किमान 12 तास लागायचे.

नियती ...

लेखक यश पालकर यांनी गुरुवार, 19/06/2014 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
नियती कधी कशी वागेल तुम्ही सांगू शकत नाही ती तुमच्या आयुष्यासोबत समांतर चालत असते. वाऱ्यासारख तीच अस्तित्व जाणवत असत. कधी रणरणत्या उन्हात वाऱ्याची झुळूक मनाला तृप्त करून जाते तर कधी सोसाट्याचा वारा सुटल्यावर घर उध्वस्त करून जातो. नियती पण रंकाला राजा बनवते आणि कधी क्षणात होत्याचे नव्हते करून जाते. आपण सारी स्वप्न सजवतो पण नियतीच्या मनात काय चाललं आहे ह्याचा आपणास मागमूसही नसतो. सार काही सुरळीत चालू असताना नियतीच वागण आपल्याला जाणीव करून देत कि ह्या विश्वापलीकडे सुद्धा एक शक्ती आहे ज्याच्या तालावर आपल आयुष्य चालू आहे.असं जरी असल तरी ह्याचा अर्थ हा नाही कि आयुष्याचा खेळ खेळायचाच नाही.