Skip to main content

मुक्तक

जगाच्या कल्ल्याणा संतांच्या विभुती (साईविलास) !!!!!!!!

लेखक विलासराव यांनी शनिवार, 16/08/2014 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
ज्या लोकांची या विषयावर टोकाची मते आहेत त्यांनी आपल्या जबाबदारीवर लेख वाचावा. सक्ती नाही. प्रतीक्रिया मनमुक्त द्याव्यात जशा उमटल्या तशा. तेवढीच तेवढी तेवढी मुक्ती. शुद्धलेखनाकडे दुर्लक्ष करावे , सार तेवढे घ्यावे. (यथाशक्ती) जिवनात चढउतार येतच असतात. हार-जीत,सुख-दुख,मान-अपमान, मनासारखे -मनाविरुद्ध काही घडणे अशा विरोधाभासी घटनांची निरंतर साखळी म्हणजे आपले जीवन. म्हणुन घडतय ते १००% आपल्या नियंत्रणात नाही याचा बोध व्हावा यासाठीच साधनावीधी.सोप्या शब्दात सांगायचं तर दोन्हीही विरोधाभासी घटनांमधे मनाचे संतुलन ढळु न देणे. कुठल्याही टोकावर न जाता मध्यम मार्गाने चालणे.

जडण-घडण 9

लेखक माधुरी विनायक यांनी गुरुवार, 14/08/2014 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
ठरल्या वेळेआधी पंधरा मिनिटं मी त्या कार्यालयात जाऊन पोहोचले. छोटंसं ऑफीस. जुजबी माहिती विचारून, एका अर्जात माझे तपशील नोंदवल्यानंतर एकाने मला, आता कॉपी टेस्टला चला, असं सांगितलं. मी काहीशा उत्सुकतेने त्याच्या मागोमाग गेले. त्याने माझ्या हातात काही इंग्रजी शुभेच्छापत्रं ठेवली. कोरे कागद दिले. ही ग्रीटींग कार्ड मराठीत करा, असं सांगून मी आणखी काही विचारायच्या आत निघूनच गेला.

मग कधीतरी

लेखक मित्रहो यांनी सोमवार, 11/08/2014 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
मग कधीतरी ..... त्या समुद्राला उधाण असेल, त्या वाऱ्यालाही वेग असेल, त्या ढगातही गडगडाट असेल त्या विजेचाही कडकडाट असेल मग काय, तो थोडीच थांबनार, तो कोसळणारच , धो धो कोसळनार चंद्राची सुट्टी असेल, बसची हलगर्जी असेल, दिव्यांचीही मर्जी असेल त्या अंधारलेल्या पावसाळी, तू आणि मी माझ्यापुढे तू तुझ्यामागे मी, भेदरलेली तू, भांबावलेला मी तो जीवघेणा एकांत, पावसाची सततधार, भिजलेली मनं, पेटलेली शरीरं काहीतरी नक्कीच घडनार आज पण कसेचे काय, माझी बस येइल आणि मी निघून जाइल पण छत्री मात्र स्टॉपवरच विसरुन जाइल मी छत्री विसरायचे कारण, तू नक्कीच समजलेली असेल खर सांगू प्रिये, अग मी खरच छत्री विसरलो असेल मग

माफ करायचं...

लेखक धन्या यांनी सोमवार, 04/08/2014 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात केव्हा ना केव्हा आपण कुणाकडून तरी दुखावले जातो. कधी शब्दांनी तर कधी कृतीने. मनाला जखम होते. कधी वरच्या वर तर कधी खोलवर. वरच्या वर झालेली जखम थोडासा काळ जाताच भरुन येते. खोलवर झालेली जखम मात्र अधिकाधिक खोलवर जात राहते. ठुसठुसत राहते, मनाला वेदना देत राहते. माणसाला राग येतो, मन कडवटपणाने भरुन जाते.

मन रे .....

लेखक सुहास.. यांनी सोमवार, 04/08/2014 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
भकास सारीपटावर कुरतडलेल्या स्वप्नांसकट सीतेच्या नकारालाही रावणल्यालं मन ! मांगल्याचा ओढीमध्ये निर्जीव कातळासवे पदस्पर्शाच्या आभासात राऊळल्याल मन ! चंचल पाऊसवेळी कोपर्‍यावरच्या झाडाखाली नाजुक बोटाच्यां गुफणीत, क्षणभर स्थिरावल्याल मन ! शमेना देह तपन जन्मदुखः अशोकवृक्षाचे सुखाच्या मृत्युभयाला वांझोटल्याल मन ! विचारकल्लोळीचा वाकस एकांती समुद्रस्पर्धेत विश्वकर्माच्या रंगसंगतीत माणुसघाण्यावल्याल मन ! सडा रक्तचिखलाचा तुडविला अनवाणी सफेद संगमवरावर डागाळल्याल मन !

माझे कुणा म्हणावे ...

लेखक मूकवाचक यांनी गुरुवार, 31/07/2014 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
वैराण वाळवंटी, त्या पानही हलेना माझे कुणा म्हणावे, काहीच आकळेना जावे पळून कोठे, हा खेळ प्राक्तनाचा चिरदाह वेदनेचा, मज दंश साहवेना ज्याने हलाल केले, कित्येक काफिल्यांना तो भास मृगजळाचा, नजरेस पाहवेना जी रोज दाविली मी, घनतृषार्त यात्रिकांना ती वाट मरूस्थळाची, मज कुठेच पोचवेना सारेच मानभावी, वस्तीत दांभिकांच्या जो तो 'मुक्या'च येथे, सच्चा कुणी मिळेना (हरिहरन यांच्या 'गुलफाम' या संग्रहातील 'कोई पत्ता हिले हवा तो चले, कौन अपना है ये पता तो चले' या गझलचा स्वैर भावानुवाद)

जडण-घडण ८

लेखक माधुरी विनायक यांनी गुरुवार, 31/07/2014 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
त्या शाळेतली तीन वर्ष जवळपास संपत आली. बहुतेक जानेवारी महिना असावा. शाळेला अनुदान मिळायच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या. व्यवस्थापनाने एकावेळी एका शिक्षकाबरोबर बोलायला सुरूवात केली. अनुदान मिळवण्यासाठी संस्थेला द्यावे लागलेले पैसे, त्याच्या परतफेडीसाठी अनुदान मिळाल्यानंतर पहिली तीन वर्षं प्रत्येकाच्या पगारातून कापली जाणारी रक्कम आणि सगळ्यात वाईट म्हणजे प्रत्येकाला तारीख न लिहिता लिहून द्यावा लागणारा राजीनामा. मला इतर शिक्षकांकडून समजत होतंच. शेवटी माझीही वेळ आली. एके दिवशी मधली सुट्टी संपल्यानंतर संस्थाचालकांनी मला बोलावून घेतलं. बदली शिक्षिकेकडे वर्ग सोपवून मी निघाले.

नसलेल्या बाईचं असणं.

लेखक इनिगोय यांनी शुक्रवार, 25/07/2014 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
आटपाटनगरात नसते एक बाई. तिला नसतं तिचं नाव. तिचं नसतं एक घर. तिचं नसतं एक कुटुंब. नसतो तिचा एक नवरा. तिची मुलं तर नसतातच तिची. नसतात तिची भांडीकुंडी. कपडेलत्ते. फर्निचर वगैरेही. तिचा नसतो तिचा वेळ. तिचा दिवस. तिचे श्रम तिचे नसतात. इतकंच कशाला.. तिची विश्रांतीही तिची नसते. तिचं शरीर. तिचं मन. तिची ओळख. तिचं जगणं. अहेवपणी नाहीच आलं तर म्हणे मरणही.. ...नसतं काहीसुद्धा तिचं. पण नाही म्हणायला तिचा असतो एक गाव. नदीकाठी असतं एक... अगदी ऎसपैस चिमुकलं घर! तिथे असतो तिचा एक मोकळा स्वच्छ श्वास. असतात सुंदर संध्याकाळी तिच्या. आणि पहाटेची निवांत वेळ? तीही असतेच. एखादा झोका..

जडण-घडण...7

लेखक माधुरी विनायक यांनी गुरुवार, 24/07/2014 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
जडण-घडण...7 शाळेत मी छान रमून गेले होते. डी. एड्.च्या मैत्रिणीही संपर्कात होत्या. अनुभवांची देवाण - घेवाण सुरू होती. अशात एके दिवशी त्यापैकीच एका मैत्रिणीचा फोन आला. तिचं बोलणं ऐकून मला वाईट वाटलं, पण फार धक्का नाही बसला. म्हटलं तर फार वेगळी गोष्ट नाही. ती दोन भावांची एकुलती लाडकी बहीण. ९६ कुळी. आणि जातीबाहेरच्या मुलाच्या प्रेमात पडलेली. घरून प्रचंड विरोध, मात्र मावशीची साथ, कारण मुलगा खरंच चांगला होता. अगदी दोघांची कुटुंबं एकमेकांना उत्तम ओळखणारी. पण मुलगा आपल्यातला नाही, या एका कारणावरून तिच्या घरच्यांचा विरोध. त्यावरून रोज वाद.

जडण-घडण...6

लेखक माधुरी विनायक यांनी सोमवार, 21/07/2014 18:15 या दिवशी प्रकाशित केले.
डी.एड्. च्या त्या दोन वर्षांनी मला भरभरून दिलं. उत्तम गुण मिळवून पाणावल्या डोळ्यांनी आम्ही सर्वांनीच विद्यालयाचा निरोप घेतला. आधी वरचेवर होणारं बोलणं कालांतराने कमी होत गेलं पण मैत्रीची नाळ मात्र टिकली. त्यानंतर सुरूवात झाली नोकरी शोधायला. डी.एड्. करण्यापूर्वी वरचेवर वर्तमानपत्रात दिसणाऱ्या पाहिजेत च्या जाहिरातींना आता महत्व आलं. हो -ना करता-करता घरापासून चालत २०-२५ मिनीटांच्या अंतरावर असणाऱ्या एका विद्यालयात प्राथमिक शिक्षकाचं पद रिक्त असल्याचं समजलं. उत्साहाने शाळेत पोहोचले. पहिला पाठ घेतला आणि निरीक्षकांनी 'उद्यापासून या' असं सांगितलं. मी खूष. पगार... पाचशे रूपये फक्त.