Skip to main content

मौजमजा

बाला

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 09/11/2015 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
एका रणरणत्या दुपारी काळ्या रंगाचे कपडे घालून (जे की त्या रंगाचे उन्हात वापरू नयेत!) एक मुलगी रस्त्यावरून जाताना पाहिली आणि फक्त तिच्या त्या काळ्या कपड्यांच्या निवडीला पाहून ही पहिली कविता स्फुरली! अर्थात त्यात इतरही काही गोष्टींचा अंतर्भाव हा ओघाने आलाच!
काव्यरस

हॉप फ्रॉग २

लेखक शा वि कु यांनी रविवार, 08/11/2015 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
एका बारीक पण धारदार आवाजाने शांतता भंग पावली.तो आवाज घर्षणाने तयार झाल्यासारखा वाटत होता.कुठल्या तरी टणक वस्तुंच्या घर्षणाने.      उदाहरणार्थ दातांच्या. जणू कुणीतरी अमानवी त्वेषाने दातओठ खात होतं. तो आवाज ऐकून राजाच्या मानेवरचे केस उभे राहीले. “ तू-तू तो आवाज का काढतोयस? " राजा हॉप फ्रॉग वर खेकसला.     बुटका आता बराच सावरल्यासारखा दिसत होता . “ मी ? मी का बरं ? मी कसा..." तो राजाकडे स्थिरपणे पाहत म्हणाला. “तो आवाज बाहेरुन आल्यासारखा वाटतं होता. " एका मंत्र्याने आपले निरीक्षण नोंदवले.

कॅनडाच्या लोकसभेत पंजाबी तिसर्‍या क्रमांकाची भाषा

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी मंगळवार, 03/11/2015 23:40 या दिवशी प्रकाशित केले.
१९ ऑक्टोबरच्या सार्वत्रिक कॅनेडियन निवडणुकीत तेथील लोकसभेत (हाउस ऑफ कॉमन्स) एकूण २३ भारतीय वंशाचे आमदार निवडून आले. त्यापैकी २० जणांची पंजाबी मातृभाषा आहे. त्यामुळे, इंग्लिश व फ्रेंच या भाषांच्या नंतर पंजाबी कॅनडाच्या लोकसभेत (हाउस ऑफ कॉमन्स) तिसर्‍या क्रमांकाची भाषा झाली आहे. लवकरच बनवण्यात येणार्‍या केंद्रिय मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या काही आमदारांची वर्णी लागेल अशी अपेक्षा आहे. कॅनडाच्या २०११ च्या जनगणनेप्रमाणे ४५६,०९० लोकांनी पंजाबीला आपली मातृभाषा असल्याचे नोंदवले आहे. हे प्रमाण कॅनडाच्या एकूण लोकसंख्येच्या १.३% आहे.

इष्टाप ( शतशब्द्कथा )

लेखक खेडूत यांनी मंगळवार, 03/11/2015 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
दिपवाळीच्या सुट्ट्या लागल्या. सकाळधरनं लय खेळलो . किल्ला कराय अजून टाईम हाय . दिप्या म्हनला लपाछपी खेळायची . कसं म्हाईत नाय , पन दर खेपेला माज्यावच पैलं राज्य येतंय. चला, धा - इस -तीस - चाळीस - पन्नास- साट- सत्तर --- रेडी का? कोनच बोलंना ! लागलो हुडकाय … पार नाना सुताराच्या वखारीपस्नं परीट आळीपत्तर -कोनच घावंना ! गोठ्यात -गंजीत घुसून बगितलं. नानाची म्हातारी लई कावली. आता मला भुका लागल्या. लपा म्हनलं लेकांनो, म्या जातो जेवायलाच . घरला जाऊन जेवलो, बचाकभर शेंगा घिउन निगलो . नाथाच्या देवळापाशी आलो. लपाछपी इसारलोच हुतो. तर समदी पोरं दिसली माज्याफुडच चालल्याली.

काल दुपारी....

लेखक जव्हेरगंज यांनी शनिवार, 31/10/2015 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
काल दुपारी मी जेव्हा झाडाखाली बसलो होतो एक शेंबड पोर गाढवाच्या शेपटाला डबडं बांधुन खेळत होतं बिचारं गाढव कान हलवत नुसतचं ऊभं होतं शेंबड पोर चड्डी वर खेचत डबड्याला काठीनं बडवत होतं मी गाढवाकड बघत होतो, गाढव खाली बघत होतं आणि ते शेबडं पोर डबड्याकड बघत होतं कंटाळुन शेंबड्यानं डबड्यात पाणी वतलं काठीच्या दोन धपक्यात डबडं एकाकी तुटलं मग ते शेंबड पोर शेपटालाच बडवत बसलं गाढव पण हळुहळु पुढे सरकत चाललं जेव्हा एक फटका गाढवाच्या जिव्हारी बसला तसा त्याचा एक पाय शेंबड्याच्या कपाळी गेला शेंबड्याला दोन टाके पडले म्हणे...

लाजाळू नि गुलाब

लेखक चांदणे संदीप यांनी शुक्रवार, 30/10/2015 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
लाजाळूच्या झाडापुढे गुलाबाच फूल नको स्पर्शाविना मिटण्याची त्याला नवी भूल नको! गुलाबाच फूल भारी लाजाळूला खेटलेल लाजाळूच झाड वेड येता जाता मिटलेल! कुणी द्या रे रंग-वास लाजाळूला मिरवाया तोरा नवा दाखवून ताटव्याला फुलवाया! - संदीप चांदणे

कांखेत कळसा एक ,मजेशीर अनुभव

लेखक दिवाकर कुलकर्णी यांनी रविवार, 25/10/2015 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
नारळाची झावळी दुपारी वीजेच्या तारावर पडली.वीज गेली.स्थानीक केंद्राला लगेच फोन केला.पाहातो म्हणाले. मी निवांत. संध्याकाळी पुन्हा फोन. काँल सेंटरला करा म्हणाले.११ आंकडी नंबर दिला.लगेच फोन लावला.या खेपेला लागेच ना.रेंजचा प्राँब्लेम बहुधा. कोपर्यावर आलो.चहाच्या टपरीजवळ. तिथं रेंज येते.तिथं दोन बांकडी टाकलेली.कांहींचा नाष्टा पण चालू होता.मला पण एक चहा सांगीतला. दोन प्रयत्नानंतर फोन लागला.पलिकडून ग्राहक क्रमांक विचारला,पुन्हा घरी तंगडतोड.पुन्हा फोन लागायचे वांधे.कंम्लेट नंबर लिहून घ्या,म्हणाले.

(जेव्हा) काहीच करू नये. (असं वाटतं)

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 23/10/2015 07:36 या दिवशी प्रकाशित केले.
“काहीच करायचं नाही”,किंवा “असाच कुठे तरी वेळ घालवायचा” याचा अर्थ जीवनात कुणी आळशी असणं किंवा कुणी निष्क्रिय असणं असं नव्हे.” त्या दिवशी मी नरेंद्राच्या घरी काही कामासाठी गेलो होतो.तो एकटाच घरी होता.अगदी कंटाळलेला दिसला. “कायरे,नरेंद्रा अगदीच कंटाळलेला दिसतोस.बायको घरी नाही म्हणून तुझा वेळ जात नाही काय?” मी नरेंद्राला कुतूहल म्हणून विचारलं. “काहीच करू नये असं मला बरेच वेळा वाटतं.बरेच लोक त्याकडे निराळ्या अर्थाने पहातात तो अर्थ नव्हे .काहीच करू नये याचा अर्थ-चांगला आलेला दिवस मस्त घालवावा,अमुक ठिकाणी जाणार आहे,निर्दिष्ट स्थानाकडे जाणार आहे, असं न समजून चालत रहावं असं वाटतं.जीवनातले आनंदाचे क्ष