Skip to main content

मांडणी

माणूस आणि कालगणना ( घोळ आणि त्याची शास्त्रीय करणे)

लेखक आदित्य कोरडे यांनी शनिवार, 13/05/2017 19:03 या दिवशी प्रकाशित केले.
माणूस आणि कालगणना ( घोळ आणि त्याची शास्त्रीय करणे) हे शिर्षक बराच विचार करून असे दिले आहे कारण तारखांचा आणि तिथ्यांचा घोळ ह्यावर आजकाल लोकांच्या भावना आणि इतर बरच काय काय दुखायला लागलंय. पु.ल.नी असामी असामी मध्ये म्हटलय की “सुटीशी संबंध आल्या शिवाय तिथीची भांडण सुरु होत नाहीत...” आता ह्या वाक्याला विनोदी संदर्भ आहे पण हे वाक्य आठवायला कारण झाले ते आताच म्हणजे १५ मार्च २०१७ला आलेल्या वर्षातल्या दुसऱ्या शिवजयन्तीचे. सरकारी (!) शिवजयंती १९ फेब्रुवारीला झाली. पण अजून एक शिवजयंती तिथीप्रमाणे साजरी होते. आता हि गोष्ट कोणीही मान्य करेल कि छत्रपती शिवाजी महाराज एकदाच जन्माला आले होते.

हरवले सापडले : एक विलक्षण अनुभव

लेखक कानडाऊ योगेशु यांनी रविवार, 07/05/2017 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक ७ मे २०१७ वेळः साधारण रात्रीचे ८-३० गेल्या काही तासांपूर्वीच ही घटना घडलेली आहे. पायाखालची जमीन सरकणे,जग स्वत:भोवती फिरणे पासुन ते हॅपी एंडीग पर्यंतचा विल्क्षण अनुभव ह्या घटनेने दिला. व दरम्यान देवावरची श्रध्दा अजुन मजबुत झाली. झाले असे कि आज रविवार व घरी एकटा असल्याने संध्याकाळच्या जेवणाची सोय करण्यासाठी बाहेर पडलो.मागच्या महीन्याचे रेंटचे पैसेही घरमालकाला द्यायचे होते.रक्कम दहाहजारावर होती. पण आधी बाहेरची कामे उरकु व नंतर पैसे देऊ असा विचार करुन रक्कम पाकिटात ठेवली. जाताना नेहेमीप्रमाणे बर्म्युडा टी शर्ट अश्या टिपिकल घरगुती पेहेरावात गेलो. होण्डा अ‍ॅक्टीवा काढली.

पुष्पक

लेखक अज्ञात यांनी रविवार, 07/05/2017 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
तो पुष्पक सिनेमा काय मस्त घर करून बसलाय मनात, मधूनच कधीतरी आठवतो, मग काही फारच गमतीदार आणि काही फारच गंभीर प्रसंग आठवतात त्यातले! १९८८ साली पुण्यात निलायम थेटरात पाहिलेला म्हणे आम्ही हा चित्रपट, मी पाहिलेला थेटरातला पहिला वहिला चित्रपट (मला आठवत नाही, आई सांगते की आपण पाहिलेला... बाजूलाच अशोका हॉटेल मध्ये होतो आपण वगैरे) असो नंतर दूरदर्शन मग घरी व्हीडीओ फाईल वरून पारायणं झाली ह्याची. असो... पार्श्वसंगीत तर इतकं आवडलं की मी चक्क व्हीडीओ फाईल मधून एक एक पीस ऑडिओ कन्व्हर्ट केलेत.

विंटर स्पोर्ट - स्कीईंग...भाग१

लेखक इडली डोसा यांनी गुरुवार, 04/05/2017 13:46 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या सहा सात वर्षात थंडीचे चार सहा महिने घराबाहेर पडायला अगदीच कमी वाव असायचा. थंडीचे विकेंड म्हणजे कोणाच्या तरी घरी जमून गप्पा गोष्टी, पॉट लक किंवा फार फार तर कुठेतरी इनडोअर ठिकाणाला भेट यापेक्षा जास्त इतके दिवस काही केलं नव्हतं. या वर्षी व्हॅंकुवरला शिफ्ट झाल्यामुळे लोकप्रिय विंटर स्पोर्ट असलेल्या स्किईंगचा अनुभव घेता आला. घरापासून ३० ते ५० मिनिटांच्या ड्राईव्हवर ३ स्की रिसॉर्ट असल्यामुळे आधी एखाद्य ठिकाणी जाऊन कसे वाटते ते बघू आणि मग पुढे शिकायचे कि नाही ते ठरवू असं ठरवलं.

आठवणीच भारी!

लेखक अज्ञात यांनी रविवार, 30/04/2017 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
zip माझ्या कडे लिहायला काही नाहीये सध्या, सीरियल्स, चित्रपट, गाणी आणि अन्वयाचे छोटे किस्से सोडले तर काहीच लिहिले नाहीये गेले वर्ष, दीड वर्ष... आणि तितक्यात एक लेख वाचला, लेखाची सुरुवात काहीशी अशी - 'तंत्रज्ञानाने ज्या पिढीला गुदगुल्या केल्या ती आमची पहिली पिढी.' आणि शेवट असा - 'दुःख गाव हरवल्याचं आपल्याला कधीच नव्हतं. गाव हरवला हरकत नाही. गावपण हरवायला नको होतं.' ह्या लेखावरून मी परत गेलो ना...

बौद्धिक संपदा हक्क दिवस २०१७

लेखक खेडूत यांनी बुधवार, 26/04/2017 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
h . . (प्रासंगिक) सोशल मिडीया आपल्या बोटावर नाचायला लागल्यापासून चांगलं काय झालं याचं मोजमाप प्रत्येकाचं वेगळं असेल. सोय आणि मनोरंजनाचे साधन म्हणून ते आवश्यक झालेय. पण दुष्परिणामही कमीअधिक प्रमाणात अनुभवायला मिळत आहेत. एक मोठा प्रॉब्लेम म्हणजे कसलीही खातरजमा ना करता, मूळ लेखकाला डावलून (कधी कधी तर वाचायच्या आधीच) पुढे ढकलण्याची प्रवृत्ती.

पान

लेखक अज्ञात यांनी मंगळवार, 25/04/2017 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
पान म्हणालं की कलकत्ता सादा आठवतं, मग मसाला मग मगई... त्यापलीकडे कधी मजल गेली नाही! पण ह्या पाना आधी एक महत्वाचं पान म्हणजे आपलं... केळीचं पान! आठवतं का केळीचं पान, आता त्यावर जेवण मिळवणे म्हणजे जरा "नशीब वान आहेस लेका!" वगैरे म्हणावं लागतं! पारंपरिक गोष्टींचा रितिरिवाजांचा जसा ऱ्हास होत चाललाय, तसाच ह्या पानांवर जेवण केरण्याचा ही, बरोबर आहे म्हणा! आता जागा नसते ना, जिथे जागा असते तिथे भलत्याच गोष्टींनी जागा घेतलेली आहे आज काल! असो... केळीच्या पानावरचे जेवण लहानपणी खूप अनुभवले, त्यावर तरंगणारे पाणी, अगदी बरोब्बर मध्ये असलेल्या लांब देठाचा मोठेपणा! मोठेपणा म्हणजे...

पण लक्षात घेत कोण ?

लेखक भटकीभिंगरी यांनी शनिवार, 22/04/2017 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
आपण नेहमी रिक्षाचालक रीक्षा बेजबाबदारपणेचालवतात असे म्हणतो .. कारण आपल्याला अनुभवही तसेच येतात . परवाचेच पहा ना .. मी मासुंदा तलावाच्या बाजूने ओव्हर ब्रीजामुळे बनलेल्या एका चिंचोळ्या रस्त्याने सायकलवरून जात होते. बाजूने जवळूनच एक रिक्षा निघून गेली. लगेचच माझ्या डोक्याच्या मागच्या बाजूला फटका बसला .एकाएकी काय झाले ते मला कळेचना केवळ नशिबानेच मी पडले नाही . वाचले. समोर पाहिले तर आत्ता जी रिक्षा शेजारून गेली तिच्यातून केळीचा घड लागलेले केळीचे झाड बाहेर आले होते.

नाशिकचा उद्योग ०३ : याज्ञिकीने तारले !

लेखक सुधीर मुतालीक यांनी शनिवार, 22/04/2017 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
औरंगजेबाच्या मृत्यू नंतर म्हणजे इस १७०७ नंतर काही वर्षांनी पेशवाईचा ऱ्हास होई पर्यंत म्हणजे इस १८१८ पर्यंत नाशकात संपूर्ण मराठयांची राजवट होती म्हणजे पेशवाई होती. पेशवाई अवतरणे हा सर्वार्थाने एक प्रचंड मोठा बदल होता. पेशव्यांचा एकूणच मराठी मुलुखाच्या औद्योगिक उत्कर्षासाठी कसून प्रयत्न सुरु होता असे दिसते. पण त्या प्रयत्नांची दिशा आजच्या संदर्भातच नव्हे पण तत्कालीन जागतिक संदर्भात सुद्धा जी होती ती तशी का होती असा प्रश्न पडतो. युरोपातला उद्योग ज्वालामुखी सारखा अगदी तोंडाशी येऊन खदखदत होता. फार पुढे नव्हे १७५० साल युरोपातल्या औद्योगिक क्रांतीचे पडघम वाजु लागले होते.