Skip to main content

मांडणी

सेक्रेड गेम्स

लेखक बार्नी यांनी रविवार, 08/07/2018 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
सेक्रेड गेम्स sacred games काही महिन्यांपूर्वी नेटफ्लिक्स विक्रम चंद्रा च्या कादंबरीवर टीवी सिरीज बनविणार म्हणून समजले आणि मी उडालो. इंजिनीरिंग ला असताना मला विक्रम चंद्रा चे हे पुस्तक प्रचंड आवडलेले .

स्वैपाकघरातून पत्रे ३

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 30/06/2018 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय अन्नपूर्णा, तू जेव्हा कुणाला कौतुकाने सांगतेस ना, आज अठरा वर्षे झाली पण या किसणीची धार जश्शीच्या तश्शी आहे, तेव्हा माझे खवल्याखवल्याचे अंग मोहरून येते. माझ्यावर खराखरा होऊ लागले कि मुळा, काकडी, गाजरं, रताळी, बटाटे, खोबरं यांची मस्ती अशी जिरते, मला फार मज्जा वाटते. I enjoy it. तुम्ही लोक माझ्या नावाचा इंग्रजी किस’शी चाबरट संबंध जोडून, कोट्या करता ना........., मी ऐकते ते! आधी मला माहित नव्हते इंग्रजी ‘किस’ म्हणजे काय ते!

पॉझीटीव्ह

लेखक शिव कन्या यांनी सोमवार, 25/06/2018 20:56 या दिवशी प्रकाशित केले.
( सत्तर शब्दांची लघुतम कथा लिहिण्याचा प्रयोग. ) पॉझीटीव्ह ...... त्याने चादर डोक्यावर ओढली. गुडूप अंधार. जग संपले. आता फक्त झोप. तेवढ्यात मेसेजची रिंग वाजली. बघणे भागच होते. त्याने मोठ्या कष्टाने पांघरूण बाजूला केले. स्क्रीनवर तिचा मेसेज चमकत होता, ‘पॉझीटीव्ह’. ‘Abort.’ याने इकडून मेसेज पाठवला. रडण्याची स्मायली तिकडून. ‘Don’t cry. Me too positive.’ ‘What?’ ‘Just got the reports. HIV positive.’ त्याने सरळ फोन बंद केला. त्याला याक्षणी काहीच, कुणीच नको होते. चादर ओढली. गुडूप अंधार. जग संपले. आता फक्त झोप. - शिवकन्या

वाळवीची पावसाळी रात्र.

लेखक गवि यांनी सोमवार, 25/06/2018 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळ पुष्कळ झाली तसे वाळवीने आपले थकलेले दोन्ही डोळे तळव्यांनी दाबले. कार्यालयातले सर्व सहकामी कधीच निघून गेले होते. वाळवीने तिच्या मांडीमाथ्याच्या पडद्याकडे एक शेवटची नजर टाकली. काही नवीन ईडाक वरिष्ठांकडून आलेली नव्हती. क्षेत्रीय कार्यालये आणि केंद्रीय कार्यालय यांच्यातल्या संपर्कांबाबत वाळवीचं काम नेहमीच मरणरेषेवर चालत असे. उदेका किंचित जरी जास्त झाला तरी साप्ताहिक पुनरावलोकनात त्याचा उल्लेख होत असे. तिच्या कुंजी परिणाम क्षेत्रात हा उदेका मुख्य होता. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. स्थानिकेने आमटीपथ ते श्रीस्थानकापर्यंत जाताना मांडीमाथाथैली भिजली असती.

मृत्यू – समाधी, प्रायोपवेशन, बलिदान आत्महत्या वगैरे

लेखक आदित्य कोरडे यांनी शनिवार, 23/06/2018 06:46 या दिवशी प्रकाशित केले.
मृत्यू – समाधी, प्रायोपवेशन, बलिदान आत्महत्या वगैरे... सध्या भैयुजी महाराजांच्या आत्महत्येने बराच गोंधळ (फक्त सोशल मिडीयावर) चालू आहे. अगदि परवा परवा हिमांशू राय ह्यांनी दीर्घ आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली तेव्हा देखील एवढा गदारोळ मजला नव्हता, म्हणजे हळहळ सगळ्यानी व्यक्त केली पण हे भैयुजी महाराज पडले महाराज, राष्ट्रसंत वगैरे, मग संत, महाराज, बाबा वगैरे लोकांनी आत्महत्या करावी का असे प्रश्न विचारले जाऊ लागले . कसा काय कुठून पण समाधी घेणे म्हणजे एक प्रकारे आत्महत्या नाही काय, स्वा.सावरकरानी प्रायोपवेशनाने प्राणार्पण केले ती आत्महत्या नव्हती काय?

डेव्ह फर्नांडिस बुलेटिन - जुन २०१८

लेखक साहना यांनी शनिवार, 23/06/2018 01:42 या दिवशी प्रकाशित केले.
१. महाराष्ट्र शासनाने शनी शिंगणापूर ह्या हिंदू मंदिरावर कब्जा करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. [१] हिंदू स्वराज्याच्या स्थापने साठी नवीन राजसत्ता उभी करणाऱ्या शूरांच्या भूमीत सध्या शनिदेव सुद्धा शासनाच्या वक्रदृष्टीपासून वाचू शकत नाहीत. हिंदू भाविकांचा पैसे गिळंकृत करून शासन हा पैसा आपल्यावर आणि बाबू लोकांवर खर्च करणार आहे. (हल्लीच शिर्डी संस्थानचे ७१ कोटी रुपये सरकारी मेडिकल कॉलेजना काढून देण्यात आली) २.

निर्लेपच्या तव्यावर आपआपली पोळी

लेखक सुधीर मुतालीक यांनी सोमवार, 18/06/2018 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
निर्लेपची बातमी लोकसत्ताने अर्थकारण मध्ये न देता हेडलाईन टाकून कुचकट राजकीय फोडणी देण्याचे काम केले आहे. निर्लेप ब्रँडची भांडी हा विशेषतः मराठी माणसांसाठी अभिमानाचा विषय आहे. अडुसष्ट सालच्या सुमारास सरकारने स्टेनलेस स्टील आयात करण्यावर निर्बंध आणले त्यामुळे आताचे निर्लेपचे मालक श्री राम भोगले यांच्या वडिलांनी प्लास्टिकचे ( टेफ्लॉन ) कोटिंग असणारी भांडी बाजारात आणली. हा प्रयोग आपल्या देशात पहिलाच आणि अद्भुतच होता ! निर्लेप यंदा आपल्या उद्योगाचा सुवर्णमहोत्सव साजरे करतो आहे.

ए पावसा !

लेखक लौंगी मिरची यांनी मंगळवार, 12/06/2018 19:54 या दिवशी प्रकाशित केले.
ए पावसा ! थोडं थांबना .. मला जे सांगायचय ते तुला कळतय का सांगना ! सारखच काय ते बरसायचं सारखं आपलं भरायचं , आणि इथे येऊन सांडायचं तुला नाहि का वाटत , थोडा आराम करावासा,? आरामशीर ढगात बसुन खालचा हिरवा गालिचा पहावासा ? ए पावसा ! बास झालं बाबा आता , थोडं तरी ऐकना तुझ्या मनात नक्कि काय आहे ? एकदा तरी सांगना ! ऐकलीस का कुजबुज कधी , “ साला किचाट करतो पाऊस ह्याला कधीपण ढासळायची कसली ती भारी हौस ?? “ मला तु आवडतोस माझं काहिहि म्हणणं नै पण मला नै आवडत ब्वॉ तुला बोललेलं काइबाइ ! म्हणुन सांगते ..

निरोप

लेखक मकरंद घोडके यांनी मंगळवार, 12/06/2018 18:28 या दिवशी प्रकाशित केले.
भावनेची आर्तता भरभरून मांडणारा, सुटलेपणाची, तुटलेपणाची बोचणी देणारा- क्षणापूर्वी आपला असणारा आणि पुन्हा कधी अनुभवता येईल की नाही अशा साशंक वळणावरचा हा क्षण! कुणीतरी देण्यापूर्वी तो घेता यायला हवा असा हा अलौकिक क्षण- निरोप कधी अल्लड वयात घरभर नाचणारी सर्वांना आपलंसं करुन घेणारी लाडकी लेक मायेचा उंबरठा ओलांडून जेव्हा दूरदेशी वेशीपल्याड निघते तेव्हा आई बाबांच्या कापऱ्या हातांना अगदी घट्ट धरून हुंदके देत देत पोरसवदा भावनेने इच्छा नसताना एक निरोप घेते. तिला तो घ्यायचा नसतो आणि मायेच्या माणसांनाही तिला तो द्यायचा नसतो पण हा निरोप ठरलेला असतो.

मिरगाचा पाऊस -अप्लाईड खगोलशास्त्र

लेखक हेमंत ववले यांनी शुक्रवार, 08/06/2018 16:18 या दिवशी प्रकाशित केले.

तीन वर्षापुर्वी बांबु लागवडीच्या वेळी गावातील काही स्थानिकांशी या बाबतीत मार्गदर्शन घेण्यासाठी म्हणुन चर्चा केली. त्यावर त्यांनी एक सृष्टीचा एक अलिखित नियमच सांगितला. कोणतेही झाड, रोप लावायचे असेल तर ते मिरगात च लावायचे. मिरीग जरी कोरडा गेला तरी रोपांची लागवड मिरगातच करायची. त्यानुसार आम्ही आमच्या कॅम्पसाईटवर बांबुची लागवड मिरगामध्ये केली. ज्या बांबुच्या रोपाला पुढ्च्या वर्षी फुलोरा आला, तेवढे सोडुन जवळ जवळ ९५% बांबुची रोपे जगली व पुढच्या वर्षी अगदी एप्रिल मे महिन्यामध्ये सुध्दा आमच्या बांबुंना जमीनीमधुन नवीन कोंब आले.