Skip to main content

मांडणी

भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 13/07/2011 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा
              बालपणीच्या अशा फारच कमी आठवणी असतात की ज्या माणसाच्या आयुष्यभर सावलीसारख्या सोबत-सोबत चालतात. जीवनाने कितीही रंग बदललेत, आचार-विचारांच्या संरचनेत कितीही बदल झालेत तरीही त्या आठवणी मात्र वास्तवाचे कायम स्मरण करून देत असतात.

ते आहेत ना

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 02/07/2011 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
ते आहेत ना
मंगला ओक आपले अनुभव सांगताना – चंदननगरच्या डोळ्याच्या दवाखान्यात आई औषध घातल्याने डोळे मिटून होती, तेंव्हा मी आईला काही आठवणी सांगायला विनंती केली आणि मग आईच्या आठवणींचा खजिना उघडला. तो शब्दांकित...
ते आहेत ना येकंममरडी गावी कुलकर्णी म्हणून होते. त्यांच्या खेडेगावातील ते लहानसं देऊळ. पण फार जुनं. त्यांच्या पूर्वजांचं दोनशे-तीनशे वर्षांचं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते दत्ताचं जागृत देवस्थान होतं. लहानशीच मूर्ती होती. ते दरवर्षी तेथे दत्तजन्म करत असत. तिथे मी गेले.

बुद्धिवादी संस्थांचा व विचारांचा पराभव आधीच झाला आहे

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 29/06/2011 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र हो, आंतरऱाष्ट्रीय कीर्तीचे प्रख्यात बुद्धिवादी नाडीग्रंथांच्या संदर्भातील आपल्या कलुषित विचारांचे मत प्रदर्शन कसे करतात. याचा नमुना सोबत मराठीवाचकांसाठी प्रथमच प्रकाशित करत आहे. (संदर्भ- इंडियन स्केप्टिक मासिकाच्या नोव्हेंबर १९९६ मधील अंकात नाडी ग्रंथांवर केले गेलेले भाष्य) आत्तापर्यंत अनेक बुद्धिवाद्यांच्या संस्था व व्यक्तींच्या विचार प्रदर्शनाला नाडीग्रंथ केंद्रांतर्फे उत्तरे पाठवण्यात कोणत्याही नाडीकेंद्राने रस दाखवला नव्हता. मात्र यावेळी नाडीकेंद्रांतर्फे पुण्यातील केंद्र संचालक श्री.

आता गरज पाचव्या स्तंभाची

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 28/06/2011 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
आता गरज पाचव्या स्तंभाची सन २००९ मध्ये केंद्र सरकारने देशातील शेतकर्‍यांसाठी सुमारे ७० हजार कोटीची कर्जमाफी जाहीर केली तेव्हा बुद्धिजीवी अर्थतज्ज्ञांनी एकच गलका केला होता. त्यांच्या मतानुसार ७० हजार कोटी एवढी प्रचंड रक्कम शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्यात घालवली तर हा देश बुडणार होता. दोन वर्षापेक्षा जास्त काळ उलटला पण अजून देश काही बुडला नाही. समुद्राच्या पाण्याखाली दक्षिण भारताचा काही भाग बुडण्याची शक्यता निर्माण झाली होती पण ती त्सुनामीमुळे; कर्जमाफीमुळे नाही.

कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....!

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 13/06/2011 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! मा. कुलगुरू डॉ.व्यंकट मायंदे, पंजाबराव कृषी विद्यापीठ, अकोला. स.न.वि.वि दि. ६ जून २०११ च्या लोकसत्तामध्ये एक बातमी प्रकाशित झाली आहे. कृषी अधिकार्‍यांच्या तांत्रिक कार्यशाळेत "प्रकल्प आधारित शेती" या विषयावर मार्गदर्शन करताना "शेतकर्‍यांना फुकट काही देऊ नये, नुसते फुकट जर दिले तर शेतकरी फुकट घेण्यासाठीच बसलेले असतात, अशी शेतकर्‍यांची प्रवृत्तीच झाली आहे" अशा आशयाचे विधान केल्याचे प्रकाशित झाले आहे. डॉ. मायंदे साहेब, आपण एका विद्यापीठाच्या कुलगुरुपदी विराजमान आहात आणि कुलगुरू या शब्दाची महतीसुद्धा फार मोठी आहे.

शास्त्रीय नृत्याकडून ..... व्यायामाकडे

लेखक मृगनयनी यांनी शनिवार, 21/05/2011 02:57 या दिवशी प्रकाशित केले.
"शास्त्रीय नृत्याकडून व्यायामाकडे " ...... सामना'तील लिन्क इथे - शास्त्रीय नृत्य - एक व्यायाम : आपण सुन्दर, प्रमाणबद्ध असावं आणि दिसावं अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. आणि त्यासाठी काहीही करायची तिची तयारी असते. सुन्दर दिसण्यासाठी कॉस्मेटिक्स, आयुर्वेदिक औषधं, मेक-अप.. वगैरे पर्याय असतात. पण प्रमाणबद्ध शरीरयष्टीसाठी आणि आपले आरोग्य टिकवण्यासाठी मात्र व्यायामाशिवाय पर्याय नसतो. त्यासाठी लेडीज-जिम, स्लिमिन्ग सेन्टर्स, एरोबिक्स-क्लासेस जॉईन करण्याकडे बहुतेक जणींचा ओढा असतो.

टक्कल

लेखक utkarsh shah यांनी सोमवार, 02/05/2011 08:57 या दिवशी प्रकाशित केले.
त्याचं काय झालं.... (असा सुरुवात केल्याने सगळे लक्ष देऊन ऐकतात अस अनुभव आणि बहुधा पु. ल. देशपांडेनी पण सांगितलाय... असो.) परवा दिवशी PMT स्टॉपवर उभा होतो. सगळ्या PMT कचरा भरल्यासारखे वाहत होत्या... कोणतीच बस आमच्या स्टॉपवर थांबत नव्हती. रिक्षावाले इतके पैसे मागत होते की त्यात अजुन थोडे पैसे टाकले असते तर एक नेनो आली असती.तर तिथे आमचे एक काका भेटले.काका म्हणजे शेजारी राहत होते.

मदत करा

लेखक मीनाक्षी देवरुखकर यांनी बुधवार, 27/04/2011 09:57 या दिवशी प्रकाशित केले.
नम्स्कार, मी एथे नवीन अहे. मी सध्या सिद्नी मधे Southern Cross University मधे शीक्तेय मी खूप दिव्संपासून एकत फील करत होते नेत वर browse कर्ता कर्ता, मला हि सीत दिस्ली. एथे खूप वचाय्ला मिल्ट. (sorry i cant write marathi proper here ) मला अज, लिहावस वाटल, करण पर्वाच मझ्या एका मित्रावर इकडचे स्थानिक मित्र चोताश्या कार्णावरून भांड भांड भानडले, तोंडावर ठून्क्ले, मारल सुद्ध मी एथे एकटी राहते, सारखी भीती वाट्त राहते .... खूप कंटाळा येतो, शिकावस वाट्त नही . पैसे भरलेले वया जातील अशीच परत आले तर मी कय करू ? पोलीस सुध मदत करत नाहीत (i am helpless , cant manage this mental stress )