Skip to main content

मांडणी

राष्ट्रीय दहशतवाद प्रतिबंधक केंद्र...

लेखक अमितसांगली यांनी मंगळवार, 13/03/2012 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
National Counter Terrorism Centre (NCTC)...राष्ट्रीय दहशतवाद प्रतिबंधक केंद्र.. दहशतवादी कारवायांना प्रतिबंध घालण्यासाठी १ मार्च २०१२ पासून राष्ट्रीय दहशतवाद प्रतिबंध केंद्र सुरु करण्याचा सरकारचा प्रयत्न होता.परंतु दहा राज्याच्या(गुजरात,बिहार ,तामिळनाडू, प. बंगाल .मध्यप्रदेश,पंजाब ,छत्तीसगड,ओरिसा,त्रिपुरा,हिमाचल प्रदेश) मुख्यमंत्र्यांनी तीव्र विरोध दर्शविल्यामुळे या प्रस्तावावर चालू अधिवेशनात चर्चा अपेक्षित आहे. NCTC हि दहशतवाद विरोधी यंत्रणा असून याचा मुख्य उद्देश भारत सरकारच्या विविध गुप्तहेर विभागांमध्ये माहितीची आदान-प्रदान करणे व त्यांना एकत्र आणणे हा आहे.

पुन्हा सालं 'वैचारिक'

लेखक यकु यांनी मंगळवार, 13/03/2012 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
हे सगळं कशासाठी सुरु आहे ? लोक का जन्माला येतात? लग्न का करतात? दु:खी का असतात ? या प्रश्नांची उत्तरं कुणीही समाधानकारकपणे देऊ शकत नाही. उत्तरं लाख मिळतात पण ती लागू पडत नाहीत. याचं कारण हे प्रश्न पडले असले तरी कुणीही उत्तरं मिळेपर्यंत त्यांना तडीस नेलेलं नाहीय. ज्यांनी नेलं ते गेले.. उलटून गेले.. त्यांचंही नेमकं काय झालं हे फक्त वर्णनं वाचून कळतं. वास्तविक आजूबाजूला जन्म, मृत्यू, लग्ने, संसार गतीमान असणे या सगळ्या प्रोसेसला बळ आहे फक्त विचाराच आणि समोर अफाट पसरलेल्या अंध:कारमय भविष्‍याचं, भावनांचं, आकांक्षांचं - शब्द कोणतेही आणि कितीही वापरा, परिणाम एकच होतो.

मला ईश्वर भेटला ....!

लेखक सस्नेह यांनी मंगळवार, 28/02/2012 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
मला ईश्वर भेटला ! कोपऱ्यावरचा बनिया नव्हे हो..! खराखुरा ईश्वर ! कसा ते ऐकायचंय ? अगदी अलीकडची आठवण म्हटली तर गेल्या आठवड्यातली गोष्ट. कामवाल्या सरूच्या ३ वर्षाच्या नातवाला बाळदमा आहे. ‘रातसारी खोकतोय हो पोर ताई !’ सरू म्हणत होती ‘औशीदबी लागू पडना.’ घरात एक सितोपलादी चुर्णाची बाटली होती. तिला दिली अन सकाळ संध्याकाळ पाव चमचा गरम पाण्यातून द्यायला सांगितलं. ४ दिवसांनी हसऱ्या चेहऱ्याने सरू सांगत आली ‘ताई, खोकला पार बंद झाला वो नातवाचा ! लई चांगलं औशीद दिलासा बगा .’ तेव्हा तिच्या हसऱ्या डोळ्यात मला ईश्वर भेटला ....! विनू माझ्या मुलाचा शाळूसोबती मित्र. चौथीनंतर शाळा बदललेल्या पण मैत्री कायम.

"!!.....मधुचंद्र......!!"

लेखक जेनी... यांनी मंगळवार, 28/02/2012 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
शब्दाविना ओठातले .......... झंकार भावनांचे ........ एका नववधूच्या मनातले ......... संसाराची नुकतीच सुरुवात करण्याआधी आयुष्यभर साथ देण्याची ..सगळ काही वाटून घेण्याची , सुखात असो वा दुखःत ..कधीही एकट न सोडण्याची ..समजून घेण्याची अन समजून राहण्याची , अश्या बर्याच काही इच्छा नववधूच्या मनात असतात . त्याच संसाराच्या पहिल्याच पायरीवर तिच्यासाठी महत्वाचा असतो तो त्याचा सुखद सहवास .. त्याचा अंतरमनाला जोडणारा स्पर्श , खूप काही मनात येवून जातं .जुन्या आठवणीना उजाळा देवून जातं . क्षणात मन पलीकडे ..क्षणात अलीकडे येवून जातं ..थोडी चलबिचल ...थोडीशी हुरहूर ..थोडी उत्सुकता .. थोडस काहूर ..सगळच व्यस्त

तथाकथित ‘चमत्कारां’चे वैज्ञानिक संशोधन

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 28/02/2012 02:08 या दिवशी प्रकाशित केले.
तथाकथित ‘चमत्कारां’चे वैज्ञानिक संशोधन खालील कथन प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांच्या ‘विज्ञान आणि चमत्कार’ या ग्रंथातील संदर्भ टीप क्रमांक 2 वरून उद्धृत केले आहे. येथे ‘चमत्कारां’ना ‘तथाकथित’ हे विशेषण लावण्याचे कारण ‘चमत्कार’ नावाची गोष्ट अस्तित्वात नाही, हे आहे.

((मी सदस्य होणारच!))

लेखक अन्या दातार यांनी गुरुवार, 23/02/2012 19:58 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा: http://www.misalpav.com/node/20789 आमच्या एका मित्राला तुम्ही कुणीच ओळखत नाही. दरवेळी अडचणीत सापडला किंवा एखाद्या नवीन ध्येय धोरणाने पछाडला गेला की आमचा हा मित्र, हा सखा, सुहृद आमच्याकडे धाव घेत असतो. त्याच्या दृष्टीने तो म्हणजे सुदामा आणी मी म्हणजे कृष्ण, तो म्हणजे हृतीक आणि मी म्हणजे राकेश, तो म्हणजे ओमार अब्दुल्ला आणि मी म्हणजे शेख अब्दुल्ला, तो म्हणजे दीप दासगुप्ता आणि मी म्हणजे गांगुली असे बरेच काय काय आहे.

हेरवाडची भानामती आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीची शरणागती - प्रकरण 4

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 22/02/2012 00:38 या दिवशी प्रकाशित केले.
हेरवाडची भानामती आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीची शरणागती
विज्ञाऩ आणि अंधश्रद्धा निर्मुलन प्रकरण 4
14 ऑगस्ट 1993 च्या बेळगाव दै. तरुण भारतमधे बेडकीहाळ गावात भानामतीमुळे बालिकेच्या अंगावरील कपडे गायब – अंधश्रद्धा निर्मूलन समितीला आव्हान या मथळ्याची एक बातमी प्रसिद्ध झाली.

हद्दपार झालेली चिमणी

लेखक सस्नेह यांनी मंगळवार, 21/02/2012 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
परवा माझ्या ३ वर्षाच्या भाचीला सियाला गोष्ट सांगत होते 'एक होती चिमणी अन एक होता कावळा..' सिया म्हणाली 'आत्या मला चिमणी दाखव ना कशी असते ?' पाहिलं तर खरच कि एकाही झाडावर चिमणी दिसेना. आमच्या लहानपणी चिमण्या अन कावळे भरपूर असत झाडांवरून. त्यांची भांडणे पाहणे हा मस्त टाइम पास असायचा. बागेत पाणी सोडले असताना त्या फवाऱ्यात चिवचिव करत अंघोळ करण्याऱ्या चिमण्या पहायला खूप मजा येई. त्यांचे थवे या झाडावरून त्या झाडावर भुर्रकन उडताना माना वळवून वळवून दुखेपर्यंत पाहत राहायचो. मुठभर तांदूळ टाकले कि सगळा थवा भुर्रकन खाली येताना पाहण्यासाठी आईआजीच्या पाठी लागून सारखे तांदूळ आणत असू.